शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

प्रमोद सावंत सरकारकडून गोव्यात भंडारी समाजावर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 21:13 IST

किरण कांदोळकर यांच्याकडून आरोप: समाजात एक प्रकारची अस्वस्थता

सुशांत कुंकळयेकर

मडगाव: मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री असताना गोव्यात भाजप पक्षात भंडारी समाजाला जो मान होता तो आता नाहीसा झाला आहे . डॉ. प्रमोद सावंत सरकारने भंडारी समाजावर अन्याय केला आहे अशी तीव्र भावना समाजात तयार होऊ लागली आहे असे मत भाजपचे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी व्यक्त केले आहे.

भंडारी समाजातील प्रभावी नेते असलेले कांदोळकर यांनी मंगळवारी गोवा फोरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळीच भाजपातून काँग्रेस आमदार रवी नाईक यांच्या दोन्ही पुत्राना भाजपात प्रवेश दिला जाईल हे वृत्त प्रसारित झाले. राजकीय विश्लेषक या दोन्ही घटनांची एकामेकाशी सांगड घालीत आहेत. कांदोळकर भंडारी मतपेटी आपल्याकडे ओढू शकतील अशी भीती भाजपला वाटू लागली आहे.

या पार्श्वभूमीवर  कांदोळकर यांच्याशी संपर्क साधला असता, होय सध्या हा समाज भाजपात अस्वस्थ आहे आणि पुढच्या निवडणुकीत तो वेगळा विचार करू शकेल, असे ते म्हणाले.

ते म्हणाले, 2012 साली मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात 4 भंडारी मंत्री होते. 2017 साली ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर या समाजातील तिघांना मंत्रिपद मिळाले, खरे तर आता पार्रिकर यांचेच सरकार डॉ. सावंत पुढे चालवीत आहेत तरीही या मंत्रिमंडळात केवळ एकाच भंडारी मंत्री आहे. पर्रिकर  असताना या समाजालाया पुरेसे प्रतिनिधीत्व त्यांच्या मंत्रिमंडळात मिळायचे आता ते मिळत नाही, यामुळेच हा समाज दुखवला गेला आहे , असे ते म्हणाले.

विजय सरदेसाई याना भेटण्यासाठी ते का गेले असे विचारले असता ते म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत गोव्यात प्रादेशिक पक्षांचे सरकारच चांगले प्रशासन देऊ शकते असा माझा ठाम विश्वास आहे. मी स्वतः माझा पक्ष काढू पाहत आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांच्या पुढाऱ्यां मी सध्या भेटत आहे. यापूर्वी मी मगोचे  सुदिन ढवळीकर याना भेटलो होतो, लवकरच दयानंद नार्वेकर यांनाही भेटणार असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंत