शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

महागाईने खिसा कापला!

By admin | Updated: July 1, 2014 01:40 IST

महागाईने खिसा कापला!

पणजी : लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘अच्छे दिन आनेवाले है...’ अशा भूलथापा देउन सत्ता मिळविल्यानंतर केंद्रातील सरकारला महागाईने महिन्याभरातच चीतपट केले आहे. जीवनावश्यक दरांच्या किमती सातत्याने वाढत असताना महागाईवर नियंत्रण आणण्यात केंद्र व राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. सोमवारी पेट्रोल व डिझेलच्या दरांत वाढ करून केंद्र सरकारने सामान्यांच्या जखमेवर मीठ चोळले, तर राज्यात गोवा डेअरीने सर्व प्रकारच्या दुधाचे दर दोन रुपयांनी वाढविल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. नारळाचे दरही वाढले असून फलोत्पादन विकास महामंडळाला कांद्यावर दिल्या जाणाऱ्या अनुदानात सरकारने चाळीस टक्क्यांवरून पंचवीस टक्क्यांपर्यंत घट केली आहे. त्यामुळे कोथिंबिरीबरोबरच कांदाही स्वयंपाकघरातून हद्दपार होण्याची शक्यता आहे. कांद्याचा दर खुल्या बाजारात सध्या ४० रुपये प्रति किलो असा आहे. फलोत्पादन विकास महामंडळाच्या दालनांमध्ये कांदा ३२ रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. अगोदर कांद्यासाठी फलोत्पादन महामंडळास कांद्याच्या विक्रीवर सरकार चाळीस रुपयांचे अनुदान देत होते. त्यामुळे कांदा महामंडळाच्या दालनात स्वस्त वाटत होता. गेल्या फेब्रुवारीपासून सरकारने महामंडळाच्याच विनंतीवरून अनुदानाचे प्रमाण ४० टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर आणले आहे. त्यामुळे महामंडळ आता कमी दराने कांदा विकू शकत नाही. नारळाचे दर बाजारपेठांमध्ये वीस ते पंचवीस रुपये नग असा आहे. जी कोथिंबिर अगोदर दहा रुपयांना मिळत होती, त्यासाठी आता चाळीस रुपये मोजावे लागत आहेत. (प्रतिनिधी)