शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

गोव्यात शॅकांमध्ये पाणी घुसण्याचे वाढते प्रकार; भरपाई मिळत नसल्याने व्यावसायिक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 22:25 IST

गोव्यातील किना-यांवर ठिकठिकाणी असलेल्या शॅकमध्ये पाणी घुसण्याचे प्रकार अलीकडे वाढल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत. सोमवारी मध्यरात्री समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने बागा, कळंगुटसह काही किना-यांवरील शॅकांमध्ये पाणी घुसून हानी झाली. 

पणजी : गोव्यातील किना-यांवर ठिकठिकाणी असलेल्या शॅकमध्ये पाणी घुसण्याचे प्रकार अलीकडे वाढल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत. सोमवारी मध्यरात्री समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने बागा, कळंगुटसह काही किना-यांवरील शॅकांमध्ये पाणी घुसून हानी झाली. 

अखिल गोवा शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ यांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ बागा किना-यावरच तब्बल २0 शॅकांमध्ये पाणी घुसले. कळंगुटसह अन्य किना-यांवरही शॅकमध्ये पाणी शिरले.  ते म्हणाले की, ‘गेल्या १८ आॅक्टोबर रोजी वादळामुळे पाण्याची पातळी वाढून असेच पाणी शॅकांमध्ये शिरले आणि हानी झाली. गेल्या वर्षी ४ डिसेंबर रोजी ‘ओखी’ वादळात पाण्याची पातळी वाढली आणि पाणी शॅकांमध्ये शिरल्याने व्यावसायिकांना मोठा फटका बसला.

नैसर्गिक आपत्ती असल्याने अनेकांनी सरकार दरबारी नुकसान भरपाईसाठी दावे केले परंतु त्यांना भरपाई मिळू शकली नाही. पर्यटन खाते शुल्काच्या स्वरुपात भरमसाट पैसे घेते. ६५ हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. परंतु अशाआपत्तीच्यावेळी काहीच भरपाई मिळत नाही. नुकसान भरपाईसाठी सरकारचे निकष तरी काय, हे स्पष्ट व्हायला हवे. 

पर्यटक संख्या घटली : कार्दोझदर वर्षाच्या तुलनेत यंदा राज्यात पर्यटकांची संख्या कमी आहे, याचे कारण मलेशिया, श्रीलंका, सिंगापूरमध्ये स्वस्तात पर्यटन उपलब्ध झाले आहे. गोव्यात तुलनेत महागाई आहे त्यामुळे पर्यटक पाठ फिरवतात. दुसरी बाब म्हणजे पर्यटकांच्या बाबतीत गुन्ह्यांचे प्रमाण राज्यात वाढलेले आहे. अलीकडेच काणकोण येथे विदेशी महिलेवर बलात्कार झाला. अशा अन्य घटनाही गेल्या काही काळात घडलेल्या आहेत त्यामुळे वाईट प्रतिमा निर्माण झालेली आहे, असे क्रुझ कार्दोझ यांनी सांगितले. 

‘हा परिणाम त्सुनामीचा नसावा’ राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे ज्येष्ठ शास्रज्ञ बबन इंगोले यांच्या मतें इंडोनेशियातील त्सुनामीचा हा परिणाम नसावा कारण त्सुनामीला दोन दिवस उलटून गेले आहेत. पूर्व किनारपट्टीवर वादळी वा-यामुळे हा प्रकार घडला असण्याची शक्यता आहे. पौर्णिमेचे दिवस असल्याने समुद्राला भरती आहे. अशा वेळी कुठेतरी वादळाचा तडाखा बसल्यास अशी परिस्थिती उद्भवू शकते. पाण्याची पातळी वाढल्यानंतर कुठेतरी पर्जन्यवृष्टीही होत असते. अलीकडच्या काळात पाण्याची पातळी वाढण्याचे प्रकार वाढलेले आहेत.  

टॅग्स :goaगोवा