शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

"निर्यात वाढविणे, आयात घटविणे हा देशभक्ती आणि स्वदेशीचा मार्ग"

By वासुदेव.पागी | Updated: December 24, 2023 18:10 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे उद्गार.

पणजी: निर्यात वाढवणे आणि आयात कमी करणे हा देशभक्ती आणि "स्वदेशी"साठी नवा मार्ग आहे आणि पेट्रोल किंवा डिझेलची एक थेंबही आयात केली जाणार नाही तेव्हा हे भारतासाठी "नवे स्वातंत्र्य" असेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी सांगितले.

'पांचजन्य' साप्ताहिकाने आयोजित केलेल्या 'सागर मंथन २.० कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणाले की पेट्रोल आणि डिझेलची आयात थांबवणे हे जगातील दहशतवादाला अटकाव करण्याशी जोडलेले आहे. जोपर्यंत ही आयात थांबत नाही, तोपर्यंत जगभरातील दहशतवाद थांबणार नाही. पेट्रोल आणि डिझेलची आयात थांबवणे हे माझ्या जीवनाचे ध्येय आहे. पेट्रोल आणि डिझेलची एक थेंबही आयात होणार नाही त्या दिवशी आपल्या देशाला नव्याने स्वातंत्र्य मिळाले असे मी मानेन असेही ते म्हणाले.

"आपला देश १६ लाख कोटी रुपये रुपये पेट्रोल आणि डिझेलचे आयातावर खर्च करतो. जर आपण ही आयात कमी केली, तर आपण वाचवलेला पैसा गरिबी हटविण्यास वापरला जाऊ शकतो. म्हणूनच आम्ही बायो फ्युएलसारखे पर्यायी इंधन आणले आहे. आयात कमी करून त्यात वाढ होईल. २०१४ मध्ये भारतातील ऑटोमोबाईल उद्योगाचा आकार ७ लाख कोटी रुपये होता आणि आता तो १२.५ लाख कोटी रुपये होता, त्यामुळे या क्षेत्राने ४.५ कोटी लोकांना रोजगार दिला. राज्य सरकार आणि केंद्राला सर्वाधिक जीएसटी देणारा हा उद्योग आहे, असेही ते म्हणाले.

देशाचा ऑटोमोबाईल उद्योग येत्या पाच वर्षांत जगात पहिल्या क्रमांकावर येईल, या उद्योगात सर्वाधिक आयात होत आहे. जर आपल्याला विश्वगुरू आणि पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवायची असेल, तर आपण निर्यातीत नंबर वन व्हायलाच हवे असे गडकरी यांनी सांगितले.तीन महिन्यांपूर्वी भारताने ऑटोमोबाईल निर्यात क्षेत्रात जपानसारख्या पॉवरहाऊसला मागे टाकत सातव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली होती. आम्ही आत्मनिर्भर भारत आणि सुशासन या सारख्या आमच्या उपक्रमांच्या आधारे पुढील पाच वर्षांत प्रथम क्रमांकावर असू असा दावाही केंद्रीय मंत्र्यांनी केला.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी