शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"निर्यात वाढविणे, आयात घटविणे हा देशभक्ती आणि स्वदेशीचा मार्ग"

By वासुदेव.पागी | Updated: December 24, 2023 18:10 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे उद्गार.

पणजी: निर्यात वाढवणे आणि आयात कमी करणे हा देशभक्ती आणि "स्वदेशी"साठी नवा मार्ग आहे आणि पेट्रोल किंवा डिझेलची एक थेंबही आयात केली जाणार नाही तेव्हा हे भारतासाठी "नवे स्वातंत्र्य" असेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी सांगितले.

'पांचजन्य' साप्ताहिकाने आयोजित केलेल्या 'सागर मंथन २.० कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणाले की पेट्रोल आणि डिझेलची आयात थांबवणे हे जगातील दहशतवादाला अटकाव करण्याशी जोडलेले आहे. जोपर्यंत ही आयात थांबत नाही, तोपर्यंत जगभरातील दहशतवाद थांबणार नाही. पेट्रोल आणि डिझेलची आयात थांबवणे हे माझ्या जीवनाचे ध्येय आहे. पेट्रोल आणि डिझेलची एक थेंबही आयात होणार नाही त्या दिवशी आपल्या देशाला नव्याने स्वातंत्र्य मिळाले असे मी मानेन असेही ते म्हणाले.

"आपला देश १६ लाख कोटी रुपये रुपये पेट्रोल आणि डिझेलचे आयातावर खर्च करतो. जर आपण ही आयात कमी केली, तर आपण वाचवलेला पैसा गरिबी हटविण्यास वापरला जाऊ शकतो. म्हणूनच आम्ही बायो फ्युएलसारखे पर्यायी इंधन आणले आहे. आयात कमी करून त्यात वाढ होईल. २०१४ मध्ये भारतातील ऑटोमोबाईल उद्योगाचा आकार ७ लाख कोटी रुपये होता आणि आता तो १२.५ लाख कोटी रुपये होता, त्यामुळे या क्षेत्राने ४.५ कोटी लोकांना रोजगार दिला. राज्य सरकार आणि केंद्राला सर्वाधिक जीएसटी देणारा हा उद्योग आहे, असेही ते म्हणाले.

देशाचा ऑटोमोबाईल उद्योग येत्या पाच वर्षांत जगात पहिल्या क्रमांकावर येईल, या उद्योगात सर्वाधिक आयात होत आहे. जर आपल्याला विश्वगुरू आणि पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवायची असेल, तर आपण निर्यातीत नंबर वन व्हायलाच हवे असे गडकरी यांनी सांगितले.तीन महिन्यांपूर्वी भारताने ऑटोमोबाईल निर्यात क्षेत्रात जपानसारख्या पॉवरहाऊसला मागे टाकत सातव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली होती. आम्ही आत्मनिर्भर भारत आणि सुशासन या सारख्या आमच्या उपक्रमांच्या आधारे पुढील पाच वर्षांत प्रथम क्रमांकावर असू असा दावाही केंद्रीय मंत्र्यांनी केला.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी