शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

अनुसूचित जातींचा आरक्षण कोटा वाढवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2017 02:07 IST

पणजी : राज्यातील अनुसूचित जातींमधील (एससी) लोकांनी खूप मोठा त्याग केला आहे. अनुसूचित जमातींपेक्षाही (एसटी) जास्त

पणजी : राज्यातील अनुसूचित जातींमधील (एससी) लोकांनी खूप मोठा त्याग केला आहे. अनुसूचित जमातींपेक्षाही (एसटी) जास्त त्याग एससी लोकांनी केलेला असतानाही सरकारने यापूर्वीच्या काळात त्यांच्या आरक्षण कोट्यात कपात केली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अनुसूचित जातींना हा कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी पर्यटन खात्याचे मंत्री बाबू आजगावकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केली.येथील आंबेडकर उद्यानात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा शासकीय सोहळा शुक्रवारी पार पडला. त्या वेळी आजगावकर म्हणाले, की गोव्यातील अनुसूचित जातींवर नेहमीच अन्याय होत आला आहे. अन्य समाजांनी त्यांच्यावर अन्याय केला. अनेक अत्याचार त्यांनी सोसले. मात्र, कधीच स्वत:चा हिंदू धर्म सोडला नाही. अन्य समाजांसाठी अनुसूचित जातींचा आरक्षण कोटा कमी करण्याचा प्रयत्न मध्यंतरी झाला. विद्यमान मुख्यमंत्री पर्रीकर हे हुशार आहेत. ते तज्ज्ञ आहेत. त्यांनी तोडगा काढावा. मंत्री आजगावकर यांनी एससी समाजातील अधिकाऱ्यांवर अन्याय होऊ नये, अशीही अपेक्षा व्यक्त केली. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी आपल्या भाषणावेळी सांगितले, की मी कुणावरच अन्याय होऊ देणार नाही. कधीही कुणी जर माझ्या नजरेस विषय आणून दिला तर मी तोडगा काढीन. कुणीही मला पत्र लिहून पाठवावे. पत्राची दखल घेऊन पावले उचलीन. मुख्यमंत्री म्हणाले, की शिवाजी महाराज हे माझे गुरू आहेत. मी लोकांमध्ये भेदभाव करत नाही. ज्यांनी आपल्याला मते दिली नाहीत, त्यांची देखील कामे करतो. जातीवरून फरक करत नाही. मी प्रत्येकाची कार्यक्षमता पाहतो. जे अधिकारी आरक्षणाच्या माध्यमातून पुढे आले, त्यापैकी अनेकजण खरेच हुशार आहेत. याचाच अर्थ असा की, हुशारी व बुद्धी ही कोणत्या तरी एकाच समाजाकडे असते असे नाही. प्रत्येकाला जर संधी मिळाली तर, ज्ञान व बुद्धीद्वारे चमक दाखविता येते. मला आडनावांवरून अनेकवेळा कुणाची जात देखील कळत नाही. मला त्यात स्वारस्यही नाही. मुख्यमंत्री म्हणाले, की आंबेडकरांना देवत्व देणाऱ्यांनी त्यांचे गुण आत्समात करावेत. त्यांच्या गुणांना देवत्व द्यावे. आंबेडकर हे महानच होते. त्यांची महानता मला दिल्लीत गेल्यानंतर आणखी जास्त प्रमाणात कळाली. पंतप्रधान मोदी यांच्याकडून मला आंबेडकरांविषयीची जास्त माहिती प्राप्त झाली. ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे यांचे या वेळी भाषण झाले. पतंगे यांनी आंबेडकर यांचे विविध पैलू प्रेक्षकांसमोर मांडले. या वेळी मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा हेही व्यासपीठावर होते. सूत्रनिवेदन डॉ. दयानंद राव यांनी केले. (खास प्रतिनिधी)