शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

भू-माफियांच्या हितासाठी कूळ कायदा दुरुस्ती : खलप

By admin | Updated: April 26, 2015 01:35 IST

पणजी : विरोधात असताना कूळ व मुंडकारांसाठी अतिरिक्त मामलेदारांची मागणी करणाऱ्या भाजपने सत्तेवर आल्यावर कूळ व मुंडकारांना

पणजी : विरोधात असताना कूळ व मुंडकारांसाठी अतिरिक्त मामलेदारांची मागणी करणाऱ्या भाजपने सत्तेवर आल्यावर कूळ व मुंडकारांना न्यायालयात उभे करून भू-माफियांसाठी पोषक वातावरण निर्माण केल्याचा आरोप कॉँग्रेसचे मीडिया विभागाचे अध्यक्ष अ‍ॅड. रमाकांत खलप यांनी केला. विरोधात असताना भाजपचे आमदार विद्यमान उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा आणि सांस्कृतिक मंत्री दयानंद मांद्रेकर मुंडकार आणि कूळ प्रकरणातील दावे निकालात काढण्यासाठी अतिरिक्त मामलेदारांची नियुक्ती करण्याची मागणी सातत्यने करीत होते. आता सरकारने कूळ व मुंडकारांना आपले हक्क सिद्ध करण्यासाठी न्यायालयाचा रस्ता दाखविला असतानाही हे मंत्री गप्प आहेत, असे खलप यांनी सांगितले. ते म्हणाले की, राज्याला विशेष दर्जा देण्याचे आमिष भाजपने लोकांना दिले, त्यासाठी घटनेत आवश्यक बदलही करण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात विशेष दर्जा तर दिला नाहीच; परंतु भू-माफियांना गोव्यात जमिनी घेण्यासाठी पोषक वातावरण मात्र तयार करून दिले. ‘गोव्यात शेतजमिनी पाहिजेत’ अशा आशयाच्या बेधडकपणे जाहिराती वृत्तपत्रातून छापून येत आहेत. शेतजमिनी मागण्याचे धाडस बिगर गोमंतकीय धनाढ्य लोक करू शकतात याचा अर्थ या जमिनी ताब्यात आल्यानंतर त्यांचे रूपांतर करण्याचे आश्वासन त्यांना मिळालेले असेल, असे ते म्हणाले. कुळांना आपल्या जमिनीचे हक्क मिळविण्यासाठी तसेच मुंडकारांनाही आपले हक्क प्रस्थापित करण्यासाठी न्यायालयात जाण्यास सरकारने सक्तीचे केले आहे. गरीब लोक न्यायालयीन लढाई लढू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे न्यायालयात पैसे खर्च करण्याऐवजी मिळेल ती रक्कम घेऊन जमिनी बड्या पैसेवाल्यांच्या घशात घालण्याकडे लोकांचा कल जाणे साहजिक आहे. त्यामुळे सरकारचा निर्णय हा केवळ शेतकरी आणि मुंडकार विरोधी नाही तर गोव्याला विनाशाकडे नेणारा आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)