शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

भू-माफियांच्या हितासाठी कूळ कायदा दुरुस्ती : खलप

By admin | Updated: April 26, 2015 01:35 IST

पणजी : विरोधात असताना कूळ व मुंडकारांसाठी अतिरिक्त मामलेदारांची मागणी करणाऱ्या भाजपने सत्तेवर आल्यावर कूळ व मुंडकारांना

पणजी : विरोधात असताना कूळ व मुंडकारांसाठी अतिरिक्त मामलेदारांची मागणी करणाऱ्या भाजपने सत्तेवर आल्यावर कूळ व मुंडकारांना न्यायालयात उभे करून भू-माफियांसाठी पोषक वातावरण निर्माण केल्याचा आरोप कॉँग्रेसचे मीडिया विभागाचे अध्यक्ष अ‍ॅड. रमाकांत खलप यांनी केला. विरोधात असताना भाजपचे आमदार विद्यमान उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा आणि सांस्कृतिक मंत्री दयानंद मांद्रेकर मुंडकार आणि कूळ प्रकरणातील दावे निकालात काढण्यासाठी अतिरिक्त मामलेदारांची नियुक्ती करण्याची मागणी सातत्यने करीत होते. आता सरकारने कूळ व मुंडकारांना आपले हक्क सिद्ध करण्यासाठी न्यायालयाचा रस्ता दाखविला असतानाही हे मंत्री गप्प आहेत, असे खलप यांनी सांगितले. ते म्हणाले की, राज्याला विशेष दर्जा देण्याचे आमिष भाजपने लोकांना दिले, त्यासाठी घटनेत आवश्यक बदलही करण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात विशेष दर्जा तर दिला नाहीच; परंतु भू-माफियांना गोव्यात जमिनी घेण्यासाठी पोषक वातावरण मात्र तयार करून दिले. ‘गोव्यात शेतजमिनी पाहिजेत’ अशा आशयाच्या बेधडकपणे जाहिराती वृत्तपत्रातून छापून येत आहेत. शेतजमिनी मागण्याचे धाडस बिगर गोमंतकीय धनाढ्य लोक करू शकतात याचा अर्थ या जमिनी ताब्यात आल्यानंतर त्यांचे रूपांतर करण्याचे आश्वासन त्यांना मिळालेले असेल, असे ते म्हणाले. कुळांना आपल्या जमिनीचे हक्क मिळविण्यासाठी तसेच मुंडकारांनाही आपले हक्क प्रस्थापित करण्यासाठी न्यायालयात जाण्यास सरकारने सक्तीचे केले आहे. गरीब लोक न्यायालयीन लढाई लढू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे न्यायालयात पैसे खर्च करण्याऐवजी मिळेल ती रक्कम घेऊन जमिनी बड्या पैसेवाल्यांच्या घशात घालण्याकडे लोकांचा कल जाणे साहजिक आहे. त्यामुळे सरकारचा निर्णय हा केवळ शेतकरी आणि मुंडकार विरोधी नाही तर गोव्याला विनाशाकडे नेणारा आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)