शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरस महिलांसाठी महत्त्वपूर्ण: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; बँकेच्या माध्यमातून ३३१.९९ कोटी रुपयांचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 12:16 IST

आतापर्यंत याच सरस बाजाराच्या माध्यमातून राज्यातील अनेक महिला लखपती बनल्या आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'स्वयंपूर्ण गोवा सरस' या बाजाराला खुप महत्व आहे. या बाजाराच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेली उत्पादनांची विक्री करण्यास एक व्यासपीठ मिळत असते. संस्कृती आणि व्यापाराचे आगळे वेगळे दर्शन येथे घडत असते. आतापर्यंत याच सरस बाजाराच्या माध्यमातून राज्यातील अनेक महिला लखपती बनल्या आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

कला अकादमीच्या दर्या संगमवर आयोजित स्वयंपूर्ण गोवा सरस या बाजारच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत ग्रामीण विकास मंत्री गोविंद गावडे, खात्याच्या संचालिका दीपाली नाईक, प्रेमराज शिरोडकर उपस्थित होते. राज्यातील अर्थव्यावस्थेत स्वयंसेवी गटांचा मोठा वाटा आहे. स्वयंसेवी गटांमध्ये ग्रामीण भागातील महिलांचा जास्त समावेश असतो. त्यांचा होणारा विकास हा खूप थक्क करणारा आहे. आम्ही त्यांना कमी व्याजासह कर्ज देत असतो, पण आपल्या कष्टाने त्या मोठ्या झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर २५ ते ३० महिलांचा सत्कार केला आहे. तसेच कमी व्याज दराने १० महिलांना ई-बाईक देखील व्यावसाय करण्यासाठी प्रदान केल्या आहेत, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

महिलांमध्ये व्यावसायिक शक्ती

ग्रामीण विकास खात्याकडे सुमारे ३२०० स्वयंसेवी गटांची नोंदणी आहे. या स्वयंसेवी गटांच्या माध्यमातून ४२ हजार महिला खात्याशी संलग्न आहेत. क्लस्टर स्तरावरील १८ फेडरशनचे नेतृत्व गोमंतकीय महिला करत आहेत. आतापर्यंत स्वयंसेवी गटांना ८.२८ लाख रुपये वाटप करण्यात आले आहे. स्टार्ट अप फंड म्हणून केवळ ग्रामीण भागातील संघटनांना १.३८ लाख रुपये दिले आहे. तर समुदाय गुंतवणूक म्हणून २१०५ लाख रुपये आतापर्यंत दिले आहे. एवढेच नाही तर बँकच्या माध्यमातून महिला व्यावसायिकांना ३३१.९९ कोटी रुपये प्रदान केले आहे. त्यांनी बऱ्यापैकी हे पैसे आपला फायदा करुन परत केले आहे, यातून महिला व्यावसायिकांची शक्ती दिसून येते, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.

खात्याने नवे लक्ष्य ठेवावे

ग्रामीण विकास खात्याने ३३८ कोटी रुपयांचा लक्ष्य पूर्ण केले आहे. त्यामुळे आता त्यांनी नवीन लक्ष्य निश्चित करावे. सध्या जे स्वयंसेवी गट आहेत, त्यांना तीन हजारांवरुन २०२७पर्यंत पाच हजार करावे. तसेच खात्याशी सलग्न ४२ हजार महिलांचा आकडा तो वाढवून एक लाख पर्यंत करावा. महिलांची प्रगती पाहता हे शक्य आहे, असे डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले. सोबत उद्योजक बनण्यासाठी सराकरा करत असलेल्या योजानांची माहिती दिली.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत