शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

बेकायदा घरे लवकरच कायदेशीर

By admin | Updated: July 31, 2015 02:04 IST

पणजी : राज्यातील बेकायदा घरे निश्चितच कायदेशीर केली जातील. त्यासाठी सरकार शुल्क लागू करील. आम्ही कृती योजनाही तयार केली आहे,

पणजी : राज्यातील बेकायदा घरे निश्चितच कायदेशीर केली जातील. त्यासाठी सरकार शुल्क लागू करील. आम्ही कृती योजनाही तयार केली आहे, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गुरुवारी विधानसभेत जाहीर केले. काही लोकांनी स्वत:च्या जागेत बेकायदा बांधकामे केली आहेत. काहीजणांनी कुळांच्या जमिनीत बेकायदा घरे बांधली आहेत. काहीजणांनी कोमुनिदाद जमिनीत किंवा आफ्रामेन्तमध्ये अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. अशा प्रत्येक बेकायदा बांधकामाची आम्ही वर्गवारी करू. ज्यांनी स्वत:च्या जमिनीत बेकायदा घरे बांधली आहेत, अशी बांधकामे पहिल्या वर्गात येतील. ती लवकर कायदेशीर केली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सगळीच बांधकामे कायदेशीर केली, तर परप्रांतीयांनाच त्याचा लाभ मिळेल, असे विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे म्हणाले. परप्रांतीयांची बांधकामे कायदेशीर करू नका. लोक बेकायदा घरे का बांधतात, हे सरकारने अगोदर जाणून घ्यावे. लोकांना भू-रूपांतर सनद वगैरे देण्यास खाती खूप टाळाटाळ करतात. स्वत:च्या जमिनीतही लोकांना घरे बांधण्यासाठी अत्यंत किचकट प्रक्रिया पार पाडावी लागते. सरकारचा प्रादेशिक आराखडाही तयार नाही, असे राणे म्हणाले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी भू-रूपांतर सनद आणि बांधकामाविषयीची प्रक्रियाही सुलभ व सुटसुटीत बनविण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगितले. समांतरपणे ते कामही सुरू आहे व त्यासाठी अधिकाऱ्यांचे एक पथकही सरकारने नियुक्त केले आहे. प्रश्नोत्तराच्या तासावेळी हळदोणेचे आमदार ग्लेन टिकलो यांनी याबाबतचा मूळ प्रश्न मांडला होता. राज्यभर सरकारच्या जमिनींमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे झालेली आहेत. या जमिनींचा दर किती आहे, हे सरकारने कधी पाहिले आहे काय, अशी विचारणा आमदार टिकलो यांनी केली. पूर्ण राज्यातील ज्या सरकारी जमिनींवर अतिक्रमण झाले आहे, त्या सगळ्या जमिनींचे मूल्यांकन करायला खूप वेळ लागेल, असे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी सांगितले. अतिक्रमण झालेल्या अनेक जमिनी या शंभर चौरस मीटरपेक्षाही कमी क्षेत्रफळाच्या आहेत. अशी बांधकामे कायदेशीर व्हायला हवीत, असे आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर म्हणाले. (खास प्रतिनिधी)