शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कॉँग्रेस पक्षश्रेष्ठींचे युतीच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष भोवले

By admin | Updated: March 19, 2017 02:08 IST

मडगाव : विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्ड पक्षाशी काँग्रेसने निवडणूकपूर्व युती करावी, असा सल्ला मी पक्षश्रेष्ठींना दिला होता. मात्र,

मडगाव : विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्ड पक्षाशी काँग्रेसने निवडणूकपूर्व युती करावी, असा सल्ला मी पक्षश्रेष्ठींना दिला होता. मात्र, त्या वेळी माझा सल्ला दुर्लक्षित केला गेला. हा सल्ला मानला असता तर गोव्यात आज काँग्रेस सत्तेवर असती, असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी व्यक्त केले.कामत यांनी मडगावातील काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता त्यांनी हे मत व्यक्त केले. ते म्हणाले, गोव्यातील जनतेने काँग्रेसचे १७ आमदार निवडून आणून सत्ता आमच्या हाताशी आणून दिली होती. मात्र, काँग्रेस नेत्यांनी योग्य ते निर्णय घेतले नसल्यामुळेच काँग्रेसच्या मुखात आलेला सत्तेचा घास भाजपच्या तोंडी गेला.या वेळी कामत म्हणाले, गोवा फॉरवर्डशी काँग्रेसने युती केली असती तर किमान २४ जागा जिंकल्या असत्या. दुर्दैवाने ही युती झाली नाही. निवडणुकीनंतरही ज्या वेगाने हालचाली होणे अपेक्षित होते, त्याही झाल्या नाहीत. काँग्रेस सत्ता स्थापन करू न शकल्यामुळे मडगावात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये काहीसे नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कामत यांचा काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद झाला. या वेळी ते म्हणाले, शेवटच्या क्षणी मला विजय सरदेसार्इंशी बोलण्यास सांगितले होते; पण तोपर्यंत विजय भाजप नेत्यांकडे पोचले होते. त्यामुळे आता संपर्क साधणे शक्य नाही, असे मी कॉँग्रेस नेत्यांना सांगितले.यासंदर्भात कामत यांच्याशी संपर्क साधला असता, या सर्व होऊन गेलेल्या गोष्टी आहेत. त्यावर आता मला जास्त बोलायचे नाही, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. विजय सरदेसाई यांच्याशी बोलणी करण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते का, असे त्यांना विचारले असता, असे कुठलेही अधिकार मला दिले नव्हते, असे ते म्हणाले. मात्र, दिग्विजय सिंग आणि वेणुगोपाल हे दोघेही आदल्या दिवशी विजय सरदेसाई यांना भेटले होते. दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत मी कुठलाही निर्णय घेणार नाही, असे सरदेसाई यांनी या दोन्ही नेत्यांना सांगितले होते, असे यापैकी एका नेत्याकडून मला समजले, असे कामत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)