शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

बारावीचा निकाल यंदा एप्रिलमध्येच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2017 02:28 IST

पणजी : गोवा शालान्त मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल यंदा मे ऐवजी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर

पणजी : गोवा शालान्त मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल यंदा मे ऐवजी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्याचा मंडळाचा प्रयत्न राहील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी स्पर्धात्मक परीक्षा देता याव्यात यासाठी हा निर्णय घेतला आहे. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात शक्य झाले नाही तर शेवटच्या आठवड्यात मात्र निश्चितच निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती विशेष सूत्रांनी दिली. यंदा निकाल लवकर जाहीर करण्यासाठी सर्व कामे गतीने करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. पेपर तपासण्यापासून निकाल बनविण्यापर्यंतची सर्व कामे अधिक गतीने केली जातील, यासाठी विशेष नियोजन केले आहे. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षणही दिले आहे. दहावीचा निकाल मात्र दरवर्षीप्रमाणे मे मध्येच जाहीर केला जाईल. त्याबाबतीत वेळेत बदल केला जाणार नाही.बारावीचा निकाल लवकर लागणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे असते. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना अन्यथा अडचण होते. स्पर्धात्मक प्रवेश परीक्षांनाही त्यांना बसणे तसेच पसंतीच्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळविणेही सोयीचे व्हावे यासाठी निकाल एप्रिलमध्येच जाहीर करण्याचा निर्णय शालान्त मंडळाने घेतला आहे. यापूर्वीही बारावीचा निकाल अगोदर जाहीर करण्याचे प्रयत्न झाले होते; परंतु त्याला यश न आल्यामुळे ठरल्याप्रमाणेच मे मध्येच निकाल जाहीर करावा लागला होता. आता शालान्त मंडळ जास्त गंभीर झालेले आहे. दरम्यान, १ मार्चपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षा या १५ मार्च रोजी संपणार आहेत. यंदा या परीक्षेत आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढताना १६ हजार ९०२ विद्यार्थी बसले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी १२००ने अधिक आहेत. इयत्ता आठवीपर्यंत अनुत्तीर्ण (नापास) न करण्याचे धोरण सुरू झाल्यापासून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. यंदाची विक्रमी संख्याही नापास न करण्याच्या धोरणाचाच परिणाम असल्याचे शालान्त मंडळाकडून सांगितले जाते.