शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बारावीचा निकाल यंदा एप्रिलमध्येच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2017 02:28 IST

पणजी : गोवा शालान्त मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल यंदा मे ऐवजी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर

पणजी : गोवा शालान्त मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल यंदा मे ऐवजी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्याचा मंडळाचा प्रयत्न राहील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी स्पर्धात्मक परीक्षा देता याव्यात यासाठी हा निर्णय घेतला आहे. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात शक्य झाले नाही तर शेवटच्या आठवड्यात मात्र निश्चितच निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती विशेष सूत्रांनी दिली. यंदा निकाल लवकर जाहीर करण्यासाठी सर्व कामे गतीने करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. पेपर तपासण्यापासून निकाल बनविण्यापर्यंतची सर्व कामे अधिक गतीने केली जातील, यासाठी विशेष नियोजन केले आहे. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षणही दिले आहे. दहावीचा निकाल मात्र दरवर्षीप्रमाणे मे मध्येच जाहीर केला जाईल. त्याबाबतीत वेळेत बदल केला जाणार नाही.बारावीचा निकाल लवकर लागणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे असते. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना अन्यथा अडचण होते. स्पर्धात्मक प्रवेश परीक्षांनाही त्यांना बसणे तसेच पसंतीच्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळविणेही सोयीचे व्हावे यासाठी निकाल एप्रिलमध्येच जाहीर करण्याचा निर्णय शालान्त मंडळाने घेतला आहे. यापूर्वीही बारावीचा निकाल अगोदर जाहीर करण्याचे प्रयत्न झाले होते; परंतु त्याला यश न आल्यामुळे ठरल्याप्रमाणेच मे मध्येच निकाल जाहीर करावा लागला होता. आता शालान्त मंडळ जास्त गंभीर झालेले आहे. दरम्यान, १ मार्चपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षा या १५ मार्च रोजी संपणार आहेत. यंदा या परीक्षेत आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढताना १६ हजार ९०२ विद्यार्थी बसले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी १२००ने अधिक आहेत. इयत्ता आठवीपर्यंत अनुत्तीर्ण (नापास) न करण्याचे धोरण सुरू झाल्यापासून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. यंदाची विक्रमी संख्याही नापास न करण्याच्या धोरणाचाच परिणाम असल्याचे शालान्त मंडळाकडून सांगितले जाते.