शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

दामोदर मावजो यांना ज्ञानपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 19:27 IST

मावजो हे लघू कथाकार व कादंबरीकार म्हणून प्रसिध्द आहेत. गेली चार दशके त्यांनी विपुल कोकणी लेखन केले आहे.

 

पणजी : गोव्याचे ज्येष्ठ कोकणी साहित्यिक दामोदर मावजो (वय ७७) यांना साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ५७ वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. मावजो हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे गोमंतकीय सुपुत्र ठरले आहेत. याआधी २00८ साली दिवंगत रवींद्र केळेकर यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

मावजो हे लघू कथाकार व कादंबरीकार म्हणून प्रसिध्द आहेत. गेली चार दशके त्यांनी विपुल कोकणी लेखन केले आहे. कथासंग्रह, कादंबºया, पटकथालेखन, स्तंभ लेखन, नाट्य लेखन केले आहे. मावजो यांना ज्ञानपीठ जाहीर झाल्याने सर्व थरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला.

मावजो यांना १९८३ साली कार्मेलिन या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. ‘कार्मेलिन’ ही त्यांची गाजलेली कादंबरी होय. डझनभराहून अधिक भाषांमधून या कादंबरीचा अनुवाद करण्यात आला. कोकणीतील त्यांच्या कथा अनुवादित करुन अनेक भाषांमधून राष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकांमधून प्रसिध्द झालेल्या आहेत. त्यांच्या काही कथांचा इंग्रजी, पोर्तुगीज व फ्रेंचमधून अनुवाद झालेला आहे.

मावजो यांनी साहित्यातील अनेक पुरस्कार प्राप्त केले. १९८८ साली सर्जनशील फिक्शनसाठीचा कथा पुरस्कार, १९९७ साली गोवा राज्य फिल्म महोत्सवात उत्कृष्ट संवाद लेखनाचा पुरस्कार, कला अकादमी पुरस्कार, कोकणी भाषा मंडळ पुरस्कार मिळाला. २0११-१२ साली त्यांना केंद्रीय संस्कृती मंत्रालयाची फेलोशिप मिळाली. २0११ साली ‘त्सुनामी सायमन’ या कादंबरीसाठी त्यांना विमला पै विश्व कोकणी साहित्य पुरस्कार मिळाला. त्यांच्या ‘तेरेसाज मॅन अ‍ॅण्ड अदर स्टेरीज फ्रॉम गोवा’या कथासंग्रहाला २0१५ साली फ्र ँक ओ कॉनोर आंतरराष्ट्रीय  पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. साहित्य अकादमीवर त्यांनी अनेक पदे भूषविली आहेत. साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळावर ते सदस्यही होते.

२0१५ साली एम. एम. कलबर्गी यांचा कर्नाटकात खून झाला त्यावेळी त्यांनी उघडपणे आपले विचार मांडत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करणाºयांवर आगपाखड केली होती. पत्रकार गौरी लंकेश खून प्रकरणानंतर मावजो यांच्या जीवालाही त्यावेळी धोका असल्याचे कर्नाटक पोलिसांना आढळून आले होते.

१९७५ साली त्यांची ‘सूड’ ही कादंबरी प्रसिध्द झली त्यानंतर १९८१ साली कार्मेलिन, २00९ साली त्सुनामी सायमन व २0२0 साली ‘जीव दिंव काय च्या मारु ’ ही कादंबरी प्रकाशित झाली. गांथन, जागरणां, रुमडफूल, भुरगीं म्हगेली ती, सपनमोगीं, तिष्टावणी हे त्यांचे गाजलेले कथासंग्रह होत.