शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

दामोदर मावजो यांना ज्ञानपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 19:27 IST

मावजो हे लघू कथाकार व कादंबरीकार म्हणून प्रसिध्द आहेत. गेली चार दशके त्यांनी विपुल कोकणी लेखन केले आहे.

 

पणजी : गोव्याचे ज्येष्ठ कोकणी साहित्यिक दामोदर मावजो (वय ७७) यांना साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ५७ वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. मावजो हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे गोमंतकीय सुपुत्र ठरले आहेत. याआधी २00८ साली दिवंगत रवींद्र केळेकर यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

मावजो हे लघू कथाकार व कादंबरीकार म्हणून प्रसिध्द आहेत. गेली चार दशके त्यांनी विपुल कोकणी लेखन केले आहे. कथासंग्रह, कादंबºया, पटकथालेखन, स्तंभ लेखन, नाट्य लेखन केले आहे. मावजो यांना ज्ञानपीठ जाहीर झाल्याने सर्व थरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला.

मावजो यांना १९८३ साली कार्मेलिन या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. ‘कार्मेलिन’ ही त्यांची गाजलेली कादंबरी होय. डझनभराहून अधिक भाषांमधून या कादंबरीचा अनुवाद करण्यात आला. कोकणीतील त्यांच्या कथा अनुवादित करुन अनेक भाषांमधून राष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकांमधून प्रसिध्द झालेल्या आहेत. त्यांच्या काही कथांचा इंग्रजी, पोर्तुगीज व फ्रेंचमधून अनुवाद झालेला आहे.

मावजो यांनी साहित्यातील अनेक पुरस्कार प्राप्त केले. १९८८ साली सर्जनशील फिक्शनसाठीचा कथा पुरस्कार, १९९७ साली गोवा राज्य फिल्म महोत्सवात उत्कृष्ट संवाद लेखनाचा पुरस्कार, कला अकादमी पुरस्कार, कोकणी भाषा मंडळ पुरस्कार मिळाला. २0११-१२ साली त्यांना केंद्रीय संस्कृती मंत्रालयाची फेलोशिप मिळाली. २0११ साली ‘त्सुनामी सायमन’ या कादंबरीसाठी त्यांना विमला पै विश्व कोकणी साहित्य पुरस्कार मिळाला. त्यांच्या ‘तेरेसाज मॅन अ‍ॅण्ड अदर स्टेरीज फ्रॉम गोवा’या कथासंग्रहाला २0१५ साली फ्र ँक ओ कॉनोर आंतरराष्ट्रीय  पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. साहित्य अकादमीवर त्यांनी अनेक पदे भूषविली आहेत. साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळावर ते सदस्यही होते.

२0१५ साली एम. एम. कलबर्गी यांचा कर्नाटकात खून झाला त्यावेळी त्यांनी उघडपणे आपले विचार मांडत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करणाºयांवर आगपाखड केली होती. पत्रकार गौरी लंकेश खून प्रकरणानंतर मावजो यांच्या जीवालाही त्यावेळी धोका असल्याचे कर्नाटक पोलिसांना आढळून आले होते.

१९७५ साली त्यांची ‘सूड’ ही कादंबरी प्रसिध्द झली त्यानंतर १९८१ साली कार्मेलिन, २00९ साली त्सुनामी सायमन व २0२0 साली ‘जीव दिंव काय च्या मारु ’ ही कादंबरी प्रकाशित झाली. गांथन, जागरणां, रुमडफूल, भुरगीं म्हगेली ती, सपनमोगीं, तिष्टावणी हे त्यांचे गाजलेले कथासंग्रह होत.