शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
2
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
3
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
4
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
6
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
7
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
8
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
9
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
10
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
11
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
12
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
13
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
14
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
15
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
16
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
17
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
18
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
19
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
20
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 

“गोवा सरकार केंद्रातील भाजपचे गुलाम”; म्हादईसाठी आरजीची १०० किलोमीटर पदयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 15:55 IST

ठाणे सत्तरी ते उसगाव जागृती करणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: म्हादईसाठी आता रिव्होल्युशनरी गोवन्सकडून (आरजी) १०० किलोमीटरची पदयात्रा काढली जाणार आहे. २० ते २८ फेब्रुवारी दरम्यान ठाणे सत्तरी ते ऊसगाव अशी ही पदयात्रा होईल, अशी माहिती आरजीचे नेते मनोज परब यांनी दिली.

'कर्नाटक सरकारने कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी कर्नाटक सरकारने आपल्या अर्थसंकल्पात १ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यावरून या प्रकल्पांबाबत कर्नाटक सरकार गंभीर असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, गोवा सरकार हे केंद्रातील भाजप सरकारचे गुलाम झाले आहे. त्यामुळे ते म्हादईबाबत हालचाल करीत नाहीत अशी टीका परब यांनी केली.

ते म्हणाले की, 'सत्तरी तालुका हा म्हादईच्या पात्रात येतो. या तालुक्यातील लोक, शेती, जनावरे, पर्यावरण या सर्व बाबी म्हादईच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे तेथील लोकांमध्ये म्हादईबाबत जागृती करण्यासाठी ही पदयात्रा आयोजित केली आहे. यादरम्यान ठाणे सत्तरी ते ऊसगावअसे १०० किलोमीटर अंतर नऊ दिवसांत पार केले जाईल. दरदिवशी १० ते १२ किलोमीटर पदयात्रा संध्याकाळी ४:३० ते ८:३० अशी काढली. यावेळी लोकांना म्हादईचे महत्त्व पटवून दिले जाईल,' असे परब यांनी सांगितले.

पाणी टंचाईविषयी दाद मागणार : परब

सत्तरी, तसेच राज्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची समस्या भ आहे. त्यातच जर म्हादईचे पाणी वळवले, तर पाण्याची टंचाई अधिकच तीव्र होईल. अशा स्थितीत म्हादई वाचवण्यासाठी लढा देण्याची गरज आहे. या पदयात्रेदरम्यान सत्तरी तालुक्यातील ज्या गावांना पाणी समस्या भासत आहे, त्या गावांतील समस्या मिटवावी, असे निवेदन तयार करून सार्वजनिक बांधकाम खाते, तसेच संबंधित खात्यांना सादर केले जाईल, असे परब यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा