शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

“गोवा सरकार केंद्रातील भाजपचे गुलाम”; म्हादईसाठी आरजीची १०० किलोमीटर पदयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 15:55 IST

ठाणे सत्तरी ते उसगाव जागृती करणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: म्हादईसाठी आता रिव्होल्युशनरी गोवन्सकडून (आरजी) १०० किलोमीटरची पदयात्रा काढली जाणार आहे. २० ते २८ फेब्रुवारी दरम्यान ठाणे सत्तरी ते ऊसगाव अशी ही पदयात्रा होईल, अशी माहिती आरजीचे नेते मनोज परब यांनी दिली.

'कर्नाटक सरकारने कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी कर्नाटक सरकारने आपल्या अर्थसंकल्पात १ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यावरून या प्रकल्पांबाबत कर्नाटक सरकार गंभीर असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, गोवा सरकार हे केंद्रातील भाजप सरकारचे गुलाम झाले आहे. त्यामुळे ते म्हादईबाबत हालचाल करीत नाहीत अशी टीका परब यांनी केली.

ते म्हणाले की, 'सत्तरी तालुका हा म्हादईच्या पात्रात येतो. या तालुक्यातील लोक, शेती, जनावरे, पर्यावरण या सर्व बाबी म्हादईच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे तेथील लोकांमध्ये म्हादईबाबत जागृती करण्यासाठी ही पदयात्रा आयोजित केली आहे. यादरम्यान ठाणे सत्तरी ते ऊसगावअसे १०० किलोमीटर अंतर नऊ दिवसांत पार केले जाईल. दरदिवशी १० ते १२ किलोमीटर पदयात्रा संध्याकाळी ४:३० ते ८:३० अशी काढली. यावेळी लोकांना म्हादईचे महत्त्व पटवून दिले जाईल,' असे परब यांनी सांगितले.

पाणी टंचाईविषयी दाद मागणार : परब

सत्तरी, तसेच राज्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची समस्या भ आहे. त्यातच जर म्हादईचे पाणी वळवले, तर पाण्याची टंचाई अधिकच तीव्र होईल. अशा स्थितीत म्हादई वाचवण्यासाठी लढा देण्याची गरज आहे. या पदयात्रेदरम्यान सत्तरी तालुक्यातील ज्या गावांना पाणी समस्या भासत आहे, त्या गावांतील समस्या मिटवावी, असे निवेदन तयार करून सार्वजनिक बांधकाम खाते, तसेच संबंधित खात्यांना सादर केले जाईल, असे परब यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा