शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

सरकारी आधार स्कॅनरखाली

By admin | Updated: March 5, 2017 02:23 IST

पणजी : वर्षाला तीनशे कोटी रुपये खर्च होणाऱ्या गृहआधार आणि लाडली लक्ष्मी या योजनांची झडाझडती सरकार घेणार आहे. लोककल्याणासाठी

पणजी : वर्षाला तीनशे कोटी रुपये खर्च होणाऱ्या गृहआधार आणि लाडली लक्ष्मी या योजनांची झडाझडती सरकार घेणार आहे. लोककल्याणासाठी थेट दिली जाणारी ही रक्कम किती सत्कारणी लागते ते पाहण्याचे सरकारच्या नियोजन व सांख्यिकी खात्याने ठरवले आहे. त्यासाठीची पाहणी (सर्व्हेक्षण) केली जाणार आहे.गृहआधार योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा प्रत्येकी दीड हजार रुपयांचे अर्थसाह्य सरकार देत आहे. महागाईवर उतारा म्हणून पाच वर्षांपूर्वी सरकारने ही योजना सुरू केली होती. पाच वर्षांच्या कालावधीत महागाई कमी झाली नाही, उलट ती वाढल्यामुळेच सरकारने अर्थसाह्य दीड हजार रुपये केले. या दोन्ही योजनांचे मूल्यांकन पाच वर्षांत झालेले नाही. सरकारने मूल्यांकन करून घेण्यासाठी अगोदर पाहणी करावी, असे ठरविले. नियोजन व सांख्यिकी खात्याने त्यासाठी अर्थ खात्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. तो सरकारने मान्य केला आहे. यापूर्वी दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेची ेपाहणी केल्यानंतर काही बोगस लाभार्थी आढळले. शिवाय योजनेतील काही गैरप्रकारही उघड झाले. लाभार्थीचा मृत्यू झाल्यानंतरही बँकेत या योजनेखाली पैसे जमा होण्याचा प्रकारही उघड झाला होता. जे लोक निराधार नाहीत, त्यांनी देखील राजकीय वरदहस्ताने सरकारचा पैसा खाल्ल्याचे समोर आले होते. अशा हजारो लाभार्थींना नंतर सरकारच्या समाज कल्याण खात्याने नोटीस पाठवून काही कोटी रुपयांची वसुली केली होती. याच धर्तीवर गृहआधार आणि लाडली लक्ष्मी या योजनांच्या लाभार्थींची आता पाहणी होणार आहे. त्यासाठी महिला व बाल कल्याण खात्याचे कर्मचारी (फिल्ड वर्कर्स) गावांसह शहरांत जाऊन लाभार्थींशी संपर्क साधणार आहेत.