शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

सरकारी आधार स्कॅनरखाली

By admin | Updated: March 5, 2017 02:24 IST

पणजी : वर्षाला तीनशे कोटी रुपये खर्च होणाऱ्या गृहआधार आणि लाडली लक्ष्मी या योजनांची झडाझडती सरकार घेणार आहे. लोककल्याणासाठी

पणजी : वर्षाला तीनशे कोटी रुपये खर्च होणाऱ्या गृहआधार आणि लाडली लक्ष्मी या योजनांची झडाझडती सरकार घेणार आहे. लोककल्याणासाठी थेट दिली जाणारी ही रक्कम किती सत्कारणी लागते ते पाहण्याचे सरकारच्या नियोजन व सांख्यिकी खात्याने ठरवले आहे. त्यासाठीची पाहणी (सर्व्हेक्षण) केली जाणार आहे.गृहआधार योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा प्रत्येकी दीड हजार रुपयांचे अर्थसाह्य सरकार देत आहे. महागाईवर उतारा म्हणून पाच वर्षांपूर्वी सरकारने ही योजना सुरू केली होती. पाच वर्षांच्या कालावधीत महागाई कमी झाली नाही, उलट ती वाढल्यामुळेच सरकारने अर्थसाह्य दीड हजार रुपये केले. या दोन्ही योजनांचे मूल्यांकन पाच वर्षांत झालेले नाही. सरकारने मूल्यांकन करून घेण्यासाठी अगोदर पाहणी करावी, असे ठरविले. नियोजन व सांख्यिकी खात्याने त्यासाठी अर्थ खात्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. तो सरकारने मान्य केला आहे. यापूर्वी दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेची ेपाहणी केल्यानंतर काही बोगस लाभार्थी आढळले. शिवाय योजनेतील काही गैरप्रकारही उघड झाले. लाभार्थीचा मृत्यू झाल्यानंतरही बँकेत या योजनेखाली पैसे जमा होण्याचा प्रकारही उघड झाला होता. जे लोक निराधार नाहीत, त्यांनी देखील राजकीय वरदहस्ताने सरकारचा पैसा खाल्ल्याचे समोर आले होते. अशा हजारो लाभार्थींना नंतर सरकारच्या समाज कल्याण खात्याने नोटीस पाठवून काही कोटी रुपयांची वसुली केली होती. याच धर्तीवर गृहआधार आणि लाडली लक्ष्मी या योजनांच्या लाभार्थींची आता पाहणी होणार आहे. त्यासाठी महिला व बाल कल्याण खात्याचे कर्मचारी (फिल्ड वर्कर्स) गावांसह शहरांत जाऊन लाभार्थींशी संपर्क साधणार आहेत.