शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बार वाचविण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा

By admin | Updated: April 2, 2017 02:26 IST

पणजी : राज्यातील महामार्गांच्या बाजूचे सगळे बार तसेच दारुविक्रीची दुकाने वाचविण्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र

पणजी : राज्यातील महामार्गांच्या बाजूचे सगळे बार तसेच दारुविक्रीची दुकाने वाचविण्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका सादर करावी, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षातर्फे मंत्री विजय सरदेसाई व जयेश साळगावकर यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केली. या वेळी गोवा फॉरवर्डचे खजिनदार सूरज लोटलीकरही उपस्थित होते. तावेर्न वगैरे गोव्याच्या संस्कृतीचा भाग आहे. ती आमची वारसास्थळे आहेत, असे नमूद करून सरदेसाई म्हणाले, की यापूर्वीच्या सरकारने न्यायालयात फेरविचार याचिका सादर करायला हवी होती. सिक्कीम व मेघालयाला न्याय मिळाला. आता तरी गोवा सरकारने न्यायालयात स्वतंत्र याचिका सादर करून गोव्याचे वेगळेपण न्यायालयासमोर मांडावे. बार बंद झाले तर गोव्याचा पर्यटन उद्योगही अडचणीत येईल.सरदेसाई म्हणाले, की गोमंतकीय दारू प्याले तरी ते जबाबदारीने वागतात. त्यामुळेच गोव्यातील महामार्गांवर दारू पिऊन अपघातात मृत्यू पावल्याचे वार्षिक प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर ही गोष्ट मांडणे गरजेचे आहे. गोवा फॉरवर्ड पक्ष हा ठामपणे दारू व्यावसायिकांसोबत आहे. येत्या सोमवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेईन आणि त्यांच्यासमोर हा विषय मांडेन. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आम्हाला मान्य नाही, तो एकतर्फी आहे.सरदेसाई म्हणाले, की दारू पिऊन वाहन चालविण्यास गोव्यात बंदीच आहे. जर कोणी मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्यास त्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई करावी. त्यासाठी अल्कोमीटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जावा. मुंबईत कोणीच दारू पिऊन गाडी चालवत नाही. पोलिसांकडून तिथे अडविले जाते. महामार्गांवर कारवाई करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. दारू दुकाने बंद करणे हा त्यावर उपाय नव्हे. दारूचा संबंध ‘गोंयकारपणा’शीही आहे व त्यामुळे आम्ही या विषयावर स्वस्थ बसणार नाही. ज्या महिलांकडून बारबंदीचे स्वागत केले जाते, त्यांनीही थोडा विचार करावा.(खास प्रतिनिधी)