शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

खाणी सरकारनेच चालवाव्यात : येचुरी

By admin | Updated: December 1, 2014 02:11 IST

पणजी : खाणी सरकारनेच ताब्यात घेऊन चालवाव्यात, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य तथा राज्यसभा खासदार सीताराम येचुरी यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

 पणजी : खाणी सरकारनेच ताब्यात घेऊन चालवाव्यात, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य तथा राज्यसभा खासदार सीताराम येचुरी यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केली. खनिज संपत्तीचा अधिकाधिक स्थानिक वापर व्हावा, असेही ते म्हणाले. जागतिक शांतता परिषदेसाठी येचुरी येथे आले होते. भारताने इस्रायलकडून शस्त्रास्त्र खरेदी करू नये, असे आवाहन करून ते म्हणाले की, शस्त्रास्त्र व्यवहारातून मिळणारा पैसा इस्रायलकडून पॅलेस्टिनींवर अत्याचारांसाठी वापरला जातो. पॅलेस्टिनींवरील हल्ले थांबले पाहिजेत. नव्यानेच संरक्षणमंत्री बनलेले मनोहर पर्रीकर यांनी इस्रायलशी शस्त्रास्त्र व्यवहार थांबविण्याबाबत गंभीरपणे विचार करावा. या पक्षाचे अन्य एक पॉलिट ब्युरो सदस्य नीलोत्पल बसू यांनी इस्रायलशी लष्करी व्यवहार करणाऱ्या देशांना सर्व गोष्टी कळून चुकल्या आहेत, असा दावा केला. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी दिलेली आश्वासने पाळत नाहीत. मोदी सरकारची स्थिती संपुआसारखीच आहे. भाजपच्या राज्यात अच्छे दिन नाहीच, अशी टीका येचुरी यांनी केली. ‘वर्ल्ड पीस कौन्सिल आणि आॅल इंडिया पीस अ‍ॅण्ड सॉलिडॅरिटी आॅर्गनायझेशन’ या संस्थेतर्फे शातंता परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत चार महत्त्वाचे ठराव करण्यात आले. केंद्रात भाजप सरकार त्यांना निवडणुकीत ज्या बड्या उद्योगांनी मदत केली त्यांना खुश करण्याच्या प्रयत्नात आहे. भाजपच्या प्रचार मोहिमेवर १५,000 कोटी खर्च करण्यात आले. इतके पैसे आणले कुठून, असा सवाल येचुरी यांनी केला. पुढील वर्षी प्रजासत्ताकदिनाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना निमंत्रित करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर त्यांनी टीका केली. मोदी सरकार आर्थिक आघाड्यांवर अपयशी ठरले आहे, अशी टीका करताना भाजपकडून जातीयतेवर लोकांचे ध्रुवीकरण करण्याचे काम चालू आहे, असा आरोप येचुरी यांनी केला. लोकचळवळीतून याला विरोध झाला पाहिजे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)