शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

गोव्याची अर्थव्यवस्था कोलमडली : काँग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 19:33 IST

राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली असून राज्य आर्थिक डबघाईला आले आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी सरकारच्या गेल्या वर्षातील कामाचा आढावा घेताना केली आहे

पणजी : राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली असून राज्य आर्थिक डबघाईला आले आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी सरकारच्या गेल्या वर्षातील कामाचा आढावा घेताना केली आहे. 

शांताराम म्हणतात की, मुळात हे सरकार घटनात्मक तरतुदी पायदळी तुडवून स्थापन करण्यात आलेले आहे. २0१६-१७ च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात ३१ मार्च २0१७ पर्यंत राज्याच्या डोक्यावरील कर्ज १२,0१८ कोटी दाखवण्यात आले आहे. गेल्या वर्षी ते १0,९४५ कोटी होते. २0१२ पासून आजपावेतो कर्जाचे प्रमाण ७४ .८८ टक्क्यांनी वाढले आहे. राज्याची आर्थिक तूटही झपाट्याने वाढत चालली आहे. २0१२-१३ साली ११३१ कोटी ३६ लाख रुपये इतकी आर्थिक तूट होती. २0१६-१७ मध्ये ती २00१ कोटी ८३ लाखांवर पोचली. सरकार कर्जाच्या खाईत बुडाले आहे. 

सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार ढेपाळलेला आहे. रस्ते बांधकामाच्या फाइल्स लाल फितीत अडकल्या आहेत. सरकारकडे निधी नसल्याने अनेक कामे रेंगाळली आहेत. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळात भ्रष्टाचार बोकाळला आहे. 

म्हादईच्या प्रश्नावर सरकारने गोमंतकीयांची फसवणूक केली आहे. केंद्रीय जहाजोद्योगमंत्री नीतीन गडकरी यांच्या दबावाखाली येऊन राज्यातील नद्या राष्टीयीकरणासाठी आंदण दिल्या. अदानी उद्योग समुहाचे चोचले पुरवण्यासाठी कोळसा हब आणला, असे आरोप करुत हे सरकार अजून प्रादेशिक आराखडा देऊ शकलेले नाही, अशी टीका त्यांनी केली. 

भाजपला जनता नव्हे तर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे सत्ता मिळवून देत आहेत, असा दावा करताना केंद्र सरकार, सर्वोच्च न्यायालय तसेच निवडणूक आयोगाने देशहितार्थ ही यंत्रे काढून टाकावीत, अशी मागणीही शांताराम यांनी केली आहे.

इतर न्यायालयांबरोबरच जिल्हाधिकारी, मामलेदार न्यायालयांमध्ये दहा-दहा वर्षे खटले रखडतात. न्यायासाठी लोकांना धावपळ करावी लागते. बांधकाम परवाने, भू रुपांतर सनदा देण्यासाठी विलंब लावला जात आहे, अशी टीकाही शांताराम यांनी केली आहे.