शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गोव्याची अर्थव्यवस्था कोलमडली : काँग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 19:33 IST

राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली असून राज्य आर्थिक डबघाईला आले आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी सरकारच्या गेल्या वर्षातील कामाचा आढावा घेताना केली आहे

पणजी : राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली असून राज्य आर्थिक डबघाईला आले आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी सरकारच्या गेल्या वर्षातील कामाचा आढावा घेताना केली आहे. 

शांताराम म्हणतात की, मुळात हे सरकार घटनात्मक तरतुदी पायदळी तुडवून स्थापन करण्यात आलेले आहे. २0१६-१७ च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात ३१ मार्च २0१७ पर्यंत राज्याच्या डोक्यावरील कर्ज १२,0१८ कोटी दाखवण्यात आले आहे. गेल्या वर्षी ते १0,९४५ कोटी होते. २0१२ पासून आजपावेतो कर्जाचे प्रमाण ७४ .८८ टक्क्यांनी वाढले आहे. राज्याची आर्थिक तूटही झपाट्याने वाढत चालली आहे. २0१२-१३ साली ११३१ कोटी ३६ लाख रुपये इतकी आर्थिक तूट होती. २0१६-१७ मध्ये ती २00१ कोटी ८३ लाखांवर पोचली. सरकार कर्जाच्या खाईत बुडाले आहे. 

सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार ढेपाळलेला आहे. रस्ते बांधकामाच्या फाइल्स लाल फितीत अडकल्या आहेत. सरकारकडे निधी नसल्याने अनेक कामे रेंगाळली आहेत. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळात भ्रष्टाचार बोकाळला आहे. 

म्हादईच्या प्रश्नावर सरकारने गोमंतकीयांची फसवणूक केली आहे. केंद्रीय जहाजोद्योगमंत्री नीतीन गडकरी यांच्या दबावाखाली येऊन राज्यातील नद्या राष्टीयीकरणासाठी आंदण दिल्या. अदानी उद्योग समुहाचे चोचले पुरवण्यासाठी कोळसा हब आणला, असे आरोप करुत हे सरकार अजून प्रादेशिक आराखडा देऊ शकलेले नाही, अशी टीका त्यांनी केली. 

भाजपला जनता नव्हे तर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे सत्ता मिळवून देत आहेत, असा दावा करताना केंद्र सरकार, सर्वोच्च न्यायालय तसेच निवडणूक आयोगाने देशहितार्थ ही यंत्रे काढून टाकावीत, अशी मागणीही शांताराम यांनी केली आहे.

इतर न्यायालयांबरोबरच जिल्हाधिकारी, मामलेदार न्यायालयांमध्ये दहा-दहा वर्षे खटले रखडतात. न्यायासाठी लोकांना धावपळ करावी लागते. बांधकाम परवाने, भू रुपांतर सनदा देण्यासाठी विलंब लावला जात आहे, अशी टीकाही शांताराम यांनी केली आहे.