शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

गोव्याची अर्थव्यवस्था कोलमडली : काँग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 19:33 IST

राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली असून राज्य आर्थिक डबघाईला आले आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी सरकारच्या गेल्या वर्षातील कामाचा आढावा घेताना केली आहे

पणजी : राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली असून राज्य आर्थिक डबघाईला आले आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी सरकारच्या गेल्या वर्षातील कामाचा आढावा घेताना केली आहे. 

शांताराम म्हणतात की, मुळात हे सरकार घटनात्मक तरतुदी पायदळी तुडवून स्थापन करण्यात आलेले आहे. २0१६-१७ च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात ३१ मार्च २0१७ पर्यंत राज्याच्या डोक्यावरील कर्ज १२,0१८ कोटी दाखवण्यात आले आहे. गेल्या वर्षी ते १0,९४५ कोटी होते. २0१२ पासून आजपावेतो कर्जाचे प्रमाण ७४ .८८ टक्क्यांनी वाढले आहे. राज्याची आर्थिक तूटही झपाट्याने वाढत चालली आहे. २0१२-१३ साली ११३१ कोटी ३६ लाख रुपये इतकी आर्थिक तूट होती. २0१६-१७ मध्ये ती २00१ कोटी ८३ लाखांवर पोचली. सरकार कर्जाच्या खाईत बुडाले आहे. 

सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार ढेपाळलेला आहे. रस्ते बांधकामाच्या फाइल्स लाल फितीत अडकल्या आहेत. सरकारकडे निधी नसल्याने अनेक कामे रेंगाळली आहेत. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळात भ्रष्टाचार बोकाळला आहे. 

म्हादईच्या प्रश्नावर सरकारने गोमंतकीयांची फसवणूक केली आहे. केंद्रीय जहाजोद्योगमंत्री नीतीन गडकरी यांच्या दबावाखाली येऊन राज्यातील नद्या राष्टीयीकरणासाठी आंदण दिल्या. अदानी उद्योग समुहाचे चोचले पुरवण्यासाठी कोळसा हब आणला, असे आरोप करुत हे सरकार अजून प्रादेशिक आराखडा देऊ शकलेले नाही, अशी टीका त्यांनी केली. 

भाजपला जनता नव्हे तर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे सत्ता मिळवून देत आहेत, असा दावा करताना केंद्र सरकार, सर्वोच्च न्यायालय तसेच निवडणूक आयोगाने देशहितार्थ ही यंत्रे काढून टाकावीत, अशी मागणीही शांताराम यांनी केली आहे.

इतर न्यायालयांबरोबरच जिल्हाधिकारी, मामलेदार न्यायालयांमध्ये दहा-दहा वर्षे खटले रखडतात. न्यायासाठी लोकांना धावपळ करावी लागते. बांधकाम परवाने, भू रुपांतर सनदा देण्यासाठी विलंब लावला जात आहे, अशी टीकाही शांताराम यांनी केली आहे.