शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

भाजपवाचून गोव्याचे काहीच अडणार नाही!

By admin | Updated: May 3, 2016 01:57 IST

पणजी : गोव्यात भाजपला सत्ता मिळाली नाही म्हणून काहीच बिघडणार नाही. यापूर्वीही इतर पक्षांचे सरकार या राज्यात होते,

पणजी : गोव्यात भाजपला सत्ता मिळाली नाही म्हणून काहीच बिघडणार नाही. यापूर्वीही इतर पक्षांचे सरकार या राज्यात होते, तेव्हाही काही बिघडले नव्हते आणि यापुढेही बिघडणार नाही, असे संघचालक सुभाष वेलिंगकर यांनी स्थानिक टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. भाजपने सत्तेसाठी तत्त्वांशी सौदा केल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपशिवाय गोव्याचे काही खरे नाही किंवा आता सत्ता मिळाली म्हणजे ते सांगतील ती पूर्व दिशा, अशी समजूत कुणी करून घेण्याची अजिबात गरज नाही. राज्याने यापूर्वीही अनेक राजवटी पाहिलेल्या आहेत. काँग्रेस व मगो राजवटही पाहिलेली आहे. तेव्हा भाजप नव्हता आणि तेव्हा काहीच बिघडले नव्हते, असे ते म्हणाले. गोव्यातील सर्वसाधारण ख्रिस्ती माणूस कोणत्याही चिथावण्यांना बळी न पडता आपल्या विवेकबुद्धीने मतदान करतो. भाजपने वेगळी भूमिका घेऊन ख्रिस्ती मतदारांना सामावून घेतले किंवा मॅनेज केले, असे जे चित्र उभे केले जात आहे, ते अत्यंत चुकीचे आहे. गोवा भाजपने या समाजाला मॅनेज केले असते, तर लोकसभा निवडणुकीत चर्चचा सल्ला ऐकून व फादर सेड्रिक प्रताप यांच्यासारख्यांचा प्रचार ऐकून लोकांनी भाजपविरोधात मते दिली असती; परंतु प्रचंड मतांनी दोन्हीही खासदार निवडून आले, त्याची आठवणही वेलिंगकर यांनी करून दिली. (प्रतिनिधी)