शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

गोवा विसरणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2024 12:38 IST

प्रेमाताईंचा जन्म गोव्यातल्या पोर्तुगीज राजवटीतला, त्या काळात सत्तरी तालुक्याचा ग्रामीण भाग सर्वबाबतीत अतिशय मागे होता.

प्रेमा पुरव यांचे निधन झाल्याची बातमी पुण्याहून गोव्यात बंदुकीच्या गोळीसारखी आली. या गोळीने प्रेमाताईंचे काम ज्यांना ठाऊक आहे, अशा संवेदनशील गोंयकारांच्या मनाचा ठाव घेतला. होय, आजच्या नव्या पिढीतील अनेकांना प्रेमाताईंच्या कार्याची ओळख नसेल. मात्र जुन्या काळातील सर्वांना त्यांचे योगदान ठाऊक आहे आणि गोव्यापेक्षा महाराष्ट्राला त्यांच्या कार्याचा जास्त परिचय आहे. पर्ये मतदारसंघात येणारा खोडयें हा अत्यंत निसर्गसुंदर गाव. स्वर्गीय सदानंद उर्फ भाई तेंडुलकर, स्व. शांती तेंडुलकर, सुहासिनी तेंडुलकर आदींमुळे पूर्वी या गावात अनेकजण जायचे, प्रेमाताई पुरव याच गावातल्या आणि याच तेंडुलकर कुटुंबातल्या. लहानपणी त्यांचे घर सुटले. 

प्रेमाताईंचा जन्म गोव्यातल्या पोर्तुगीज राजवटीतला, त्या काळात सत्तरी तालुक्याचा ग्रामीण भाग सर्वबाबतीत अतिशय मागे होता. मात्र पोर्तुगीजांविरुद्ध लढण्याची जिद्द अनेकांकडे होती. प्रेमाताईंनीही गोवा मुक्ती लढ्यात भाग घेतला होता. कधी भूमीगत होऊन तर कधी उघडपणे त्यांनी गोवा मुक्ती चळवळीत काम केले. गोवा, बेळगाव, मुंबईत राहून काम केले. त्या कम्युनिस्टांच्याही संपर्कात आल्या होत्या. मुंबईतच त्यांचा विवाह झाला आणि जीवनाचा एक वेगळा प्रवास सुरू झाला. 

प्रेमाताई तेंडुलकर लग्नानंतर पुरव झाल्या. त्यांनी महिलांच्या कल्याणासाठी काम केले. प्रेमाताईसारखी अनेक मोठी माणसे महाराष्ट्रात होऊन गेली. त्यापैकी अनेकांचे मूळ गोव्यात आढळते. प्रेमाताईंना पद्मश्री मिळाली होती. सदानंद तेंडुलकर अनेकदा अभिमानाने प्रेमाताईच्या गोष्टी सांगायचे. त्या खूप प्रसिद्ध झाल्यानंतरच्या काळात काहीवेळा गोवा भेटीवर येऊन गेल्या. त्यांच्या मुलाखतींचे कार्यक्रमही झाले. खानावळवाल्या महिलांची संघटना बांधण्याबाबतचे अनुभव वगैरे त्यांनी पूर्वी जाहीरपणे अनेकदा सांगितले आहेत. गोव्यातील अनेक महिलांना प्रेमाताईंविषयी कायम आदर राहिला. कारण त्यांचे अन्नपूर्णा उद्योगाच्या माध्यमातून झालेले कार्य समस्त महिला वर्गाला जास्त आवडले. अगोदर अन्नपूर्णा महिला मंडळ व मग पुढे अन्नपूर्णा उद्योग झाला, प्रेमाताईंच्या जीवनाला खरा आकार हा बेळगाव व मुंबईतच मिळाला. कम्युनिस्टांकडून त्या अनेक गोष्टी शिकल्या. कामगार चळवळींचा अनुभव घेतला. पती कॉम्रेड नरेंद्र पुरव यांच्यासोबत त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही भाग घेतला होता.

प्रेमाताईसारखे महिलांसाठी व्यापक कार्य गोव्यात राहून गोव्यातील कुणी महिला करू शकलेल्या नाहीत. प्रेमाताईंसारखा लढाऊ बाणा गोंयकार महिलांनी दाखवत एखादी मोठी संघटना बांधण्याची गरज आहे. महिला शक्त्ती संघटीत झाली तरच गोव्यातील कसिनो जुगारांसारखे अड्डे रोखता येतील. दारू पिऊन ग्रामीण भागात अनेक गोंयकार मरण पावतात, कमी वयात महिलांच्या वाट्याला हालअपेष्टा येतात. त्यांच्यासाठी काम करू शकेल अशा कुणी प्रेमा पुरव गेल्या पंचवीस वर्षांत तरी गोव्यात झाल्या नाहीत, ही खंत येथे नमूद करावीच लागेल. गोव्यातील अनेक महिला काही राजकीय पक्षांचेच काम करण्यात धन्यता मानतात, भाऊंचा विजय असो आणि भाईचा विजय असो या पलिकडे अलिकडे बऱ्याच महिला जात नाहीत. अर्थात हा विषय वेगळा, पण प्रेमाताई पुरव यांना गोव्याने कधी विसरू नये. गोवा सरकारने पुढाकार घेऊन त्यांचे एखादे स्मारक गोव्यातही उभे करायला हवे. गेली काही वर्षे प्रेमाताई पुण्यात राहायच्या. वय झाल्याने त्या अलिकडे सक्रिय नव्हत्या. पुण्याला आपल्या विवाहित मुलीच्या घरी त्या राहायच्या. त्यांच्या निधनाच्या बातमीने विशेषतः महाराष्ट्रातील अनेक महिलांच्या घशात हुंदका दाटून आला असेल. 

आज काळ असा आलाय की शेजारच्या घरात पती जर बायकोला मारबडव करत असेल तर कुणी विचारण्यासाठी देखील जात नाहीत, सगळेजण आपापल्या फ्लॅटमध्ये दार बंद करून असतात. टीव्हीवरील क्रिकेटचे सामने पाहण्यात मग्न असतात. प्रेमा पुरव यांच्या सक्रियतेच्या काळात मात्र स्थिती वेगळी होती. त्यांनी पीडित, शोषित महिलांना धीर दिला. आत्मबळ दिले. लढाऊ वृत्ती दिली, नेतृत्व व आवाज दिला, अन्याय सहन करू नका, त्याविरुद्ध संघर्ष करा असे प्रेमाताईंनी गोरगरीब महिलांना सांगितले, त्यांचा सल्ला अनेकींनी ऐकला, २०२२ साली त्यांना पद्मश्री मिळाली तेव्हा देशातील अनेक महिला खूश झाल्या होत्या. त्यांना अनेक पुरस्कार, अनेकांचे प्रेम व आशीर्वाद मिळाले. तिच त्यांची संपत्ती ठरली. प्रेमाताईंना गोव्याच्यावतीने श्रद्धांजली.

 

टॅग्स :goaगोवा