शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
2
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
3
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
4
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
5
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
6
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
7
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
8
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
9
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
10
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
11
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
12
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
13
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
14
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
15
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
16
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
17
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
18
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
19
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
20
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

३० मे पर्यंत गोव्याला शंभर टक्के साक्षर बनवू; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2025 12:08 IST

देशासाठी ठरणार रोल मॉडेल

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात शंभर टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारने ३० मे ही घटक राज्यदिनाची नवीन डेडलाइन निश्चित केली असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. पर्वरी येथे सोमवारी आयोजित 'उल्हास मेळा २०२५' न्यू इंडिया साक्षरता कार्यक्रमात ते बोलत होते. पूर्वी १९ डिसेंबर २०२४ पर्यंत राज्य शंभर टक्के साक्षर करण्याचे लक्ष्य होते. परंतु ९४ टक्केच साक्षरता झालेली आहे. उर्वरित ६ टक्के येत्या मेअखेरपर्यंत पूर्ण केली जाईल.

साक्षरता प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सहाजणांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. राज्यातील नगरपालिका आणि पंचायत या दोन्ही स्तरांवर साक्षरता कार्यक्रम राबविला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निरक्षर व्यक्तींना शोधतात आणि त्यांना मूलभूत साक्षरतेचे धडे देण्यासाठी नंतर वर्ग आयोजित केले जातात. गोव्यात राहणाऱ्या परप्रांतीय निरक्षरांनाही या साक्षरता उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले जाते.

कार्यक्रमास शिक्षण सचिव प्रसाद लोलयेंकर, नियोजन व सांख्यिकी खात्याचे संचालक विजय सक्सेना, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, एससीईआरटीच्या संचालक मेघना शेटगांवकर, शिक्षण विकास महामंडळाचे अध्यक्ष गोविंद पर्वतकर आदी उपस्थित होते.

...तर गोवा पहिले राज्य

मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारच्या न्यू इंडिया साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांचा शोध घेऊन त्यांना साक्षरतेचे धडे देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. निरक्षर लोक साक्षर झाले आहेत की नाहीत, हे तपासण्यासाठी एससीईआरटीच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या जातात. वाचन, लेखन आणि मूलभूत अंकांची कौशल्ये आत्मसात केली आहेत, याची खात्री केली जाते. येत्या ३० मेपर्यंत शंभर टक्के साक्षरता प्राप्त करणारे गोवा हे पहिले राज्य असेल. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत