शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
5
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
6
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
8
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
9
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
10
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
11
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
12
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
13
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
14
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
15
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
16
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
17
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

३० मे पर्यंत गोव्याला शंभर टक्के साक्षर बनवू; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2025 12:08 IST

देशासाठी ठरणार रोल मॉडेल

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात शंभर टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारने ३० मे ही घटक राज्यदिनाची नवीन डेडलाइन निश्चित केली असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. पर्वरी येथे सोमवारी आयोजित 'उल्हास मेळा २०२५' न्यू इंडिया साक्षरता कार्यक्रमात ते बोलत होते. पूर्वी १९ डिसेंबर २०२४ पर्यंत राज्य शंभर टक्के साक्षर करण्याचे लक्ष्य होते. परंतु ९४ टक्केच साक्षरता झालेली आहे. उर्वरित ६ टक्के येत्या मेअखेरपर्यंत पूर्ण केली जाईल.

साक्षरता प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सहाजणांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. राज्यातील नगरपालिका आणि पंचायत या दोन्ही स्तरांवर साक्षरता कार्यक्रम राबविला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निरक्षर व्यक्तींना शोधतात आणि त्यांना मूलभूत साक्षरतेचे धडे देण्यासाठी नंतर वर्ग आयोजित केले जातात. गोव्यात राहणाऱ्या परप्रांतीय निरक्षरांनाही या साक्षरता उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले जाते.

कार्यक्रमास शिक्षण सचिव प्रसाद लोलयेंकर, नियोजन व सांख्यिकी खात्याचे संचालक विजय सक्सेना, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, एससीईआरटीच्या संचालक मेघना शेटगांवकर, शिक्षण विकास महामंडळाचे अध्यक्ष गोविंद पर्वतकर आदी उपस्थित होते.

...तर गोवा पहिले राज्य

मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारच्या न्यू इंडिया साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांचा शोध घेऊन त्यांना साक्षरतेचे धडे देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. निरक्षर लोक साक्षर झाले आहेत की नाहीत, हे तपासण्यासाठी एससीईआरटीच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या जातात. वाचन, लेखन आणि मूलभूत अंकांची कौशल्ये आत्मसात केली आहेत, याची खात्री केली जाते. येत्या ३० मेपर्यंत शंभर टक्के साक्षरता प्राप्त करणारे गोवा हे पहिले राज्य असेल. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत