शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

गोवा अजून सुरक्षित, कोरोनाचा फैलाव नाही : मुख्यमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 19:41 IST

गोव्यातील पाच कोरोनाबाधित रुग्णांची स्थिती सुधारत आहे.

पणजी : राज्याच्या सीमा सील केल्यामुळे गोव्यात कोरोनाचा फैलाव झालेला नाही. गोवा अजून सुरक्षित आहे असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

गोव्यातील पाच कोरोनाबाधित रुग्णांची स्थिती सुधारत आहे. त्यांच्या संपर्कातील अनेकांना निगराणीखाली ठेवले आहे. गोव्यात आता मोठ्या प्रमाणात कसलाच तुटवडा नाही. फक्त औषधांचा तुटवडा आहे. त्यावरही उपाय काढला जाईल. अन्न धान्याचा पुरवठा सुरु झाला आहे. आमदारांना मतदारसंघात लोकांना धान्य वाटणे सुरक्षित व्हावे म्हणून चाळीसही आमदारांच्या प्रत्येकी दोनशे कार्यकर्त्यांना आम्ही पास दिले. त्यामागे काही राजकारण नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.

गोव्यात 268 टन भाजी फलोत्पादन विकास महामंडळाने उपलब्ध केली आहे. महामंडळाच्या 1200 दालनांमधून विक्री सुरू झाली आहे. मजुरांचीही काळजी आम्ही घेत आहोत. मी स्वतः पेडे येथे मजुरांच्या कॅम्पला भेट दिली व समस्या जाणून घेतल्या. काहीजणांना त्यांच्या गोव्यातीलच खोलीवर जाऊन रहायचे आहे त्याना जाऊ दिले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले 

 जिल्हा मिनरल निधीतून 52 कोटी रुपये खर्च करू कोरोनाविरोधी उपाययोजनांसाठी  सरकार जिल्हा मिनरल निधीतून 52 कोटी रुपये खर्च करील. केंद्रीय खाण मंत्रालयाने सर्व राज्यांना तशी सूचना केली आहे. त्यापैकीच सोळा कोटी रुपये खर्चून 200 वेन्टीलेटर्स खरेदी केले जातील. आमच्याकडे 40 वेन्टीलेटर्स आहेत असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

देऊळांनी मदत करावी राज्यातील देऊळांकडे प्रचंड पैसा आहे. मंदिरांनी आता कोरोनाविरोधी लढ्यात मोठे योगदान द्यावे. त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी कोविद फंडात जमा करावा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.  गिरण्या सुरु कराराज्यातील पिठाच्या गिरण्या बंद आहेत. त्यांनी त्या सुरू कराव्यात असेही आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.