शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

म्हादईप्रश्नी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे न्या- सुदिन ढवळीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 20:04 IST

कर्नाटकचे केंद्रीय नेते प्रल्हाद जोशी यांच्यासह तेथील सगळे महत्त्वाचे नेते केंद्रीय जलशक्ती मंत्रलयाच्या मंत्र्यांना 26 रोजी भेटतात व दुसऱ्याच दिवशी म्हादई जलतंटा लवादाचा निवाडा अधिसूचित होतो.

पणजी : म्हादई पाणीप्रश्नी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्याहून सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे न्यावे अशी मागणी मगोपचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. गोव्याचे खासदार, केंद्रीय मंत्री, जलसंसाधन मंत्री वगैरे म्हादईप्रश्नी गोव्याचे हितरक्षण करण्यात पूर्ण अपयशी ठरले, अशी टीका ढवळीकर यांनी केली.

कर्नाटकचे केंद्रीय नेते प्रल्हाद जोशी यांच्यासह तेथील सगळे महत्त्वाचे नेते केंद्रीय जलशक्ती मंत्रलयाच्या मंत्र्यांना 26 रोजी भेटतात व दुसऱ्याच दिवशी म्हादई जलतंटा लवादाचा निवाडा अधिसूचित होतो. मात्र गोव्याचे खासदार, केंद्रीय मंत्री, जलसंसाधन मंत्री, मुख्यमंत्री कुणीच दिल्लीत जात नाही. म्हादईप्रश्नी गोव्याच्या मंत्री व मुख्यमंत्र्यांचे केंद्र सरकार काहीच ऐकून घेत नाही असा याचा अर्थ होतो, असे ढवळीकर म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी निदान आता गोव्यातील सर्वपक्षीयांकडून निवेदन तरी लिहून घ्यावे व कडक शब्दांतील निवेदन पंतप्रधानांना पाठवावे, असे ढवळीकर यांनी सूचविले. हा विषय गोव्याच्या हितरक्षणाचा आहे. म्हादईचे परिणाम एवढे गंभीर होतील की, दाबोससह सर्व पाणी पुरवठा योजना बंद पडतील. लोकांना रस्त्यावर उतरावे लागेल. प्रमोद सावंत सभापती होते तेव्हा त्यांनी म्हादईच्या खोऱ्याला भेट देऊन कर्नाटकच्या प्रयत्नांमुळे गोव्यातील गांजे उसगावची पाणी पुरवठा योजना अडचणीत येईल असे म्हटले होते, आता ते का गप्प आहेत ते कळत नाही. लवादाचा निवाडा अधिसूचित होणो म्हणजे केंद्राने पाणी वळविण्यास कर्नाटकला थेट एनओसी दिल्यासारखा अर्थ होतो, असे ढवळीकर म्हणाले.

सरकारची ढोंगबाजी : सावळ 

म्हादईचे पाणी कर्नाटकने काही प्रमाणात वळविल्यामुळे आताच डिचोली नदीचे पाणी कमी झाले आहे व आमठाणो धरणातही पाण्याची पातळी कमी होत असल्याचे माजी आमदार नरेश सावळ यांनी सांगितले. म्हादईप्रश्नी गोवा सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. म्हादई म्हणजे स्वत:ची आई आहे असे सरकारने सांगणो ही निव्वळ ढोंगबाजी आहे, असे सावळ म्हणाले.

म्हादईचे पाणी वळविण्याचे दुष्परिणाम पूर्ण गोव्याला पुढील दहा-पंधरा वर्षात दिसून येतील. येथील निसर्ग, पर्यावरण, जैवसंपदा नष्ट होईल. ज्या हिंटरलँड पर्यटनाच्या गोष्टी सरकार सांगते, ते ग्रामीण भागातील पर्यटनच संपुष्टात येईल, असे मिलिंद पिळगावकर यांनी सांगितले. कुडचिरे, म्हावळींगे सारख्या भागात म्हादईच्या उपनद्यांवर शेती, कुळागरे जगतात. यापुढे तेही नष्ट होईल, असे पिळगावकर म्हणाले. जिल्हा पंचायत निवडणुकीत लोकांनी भाजपला धडा शिकवावा, असे ढवळीकर म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा