शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
2
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलिन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
3
"ज्यांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला..."; बाळा नांदगावकरांचा टोला
4
"मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले"; भाजपाचा ठाकरेंना टोला
5
निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य आणि 'या' शेअर्सना लागले पंख; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
7
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
8
Chandrapur Farmer : किडनी वीक पण कर्ज फेड ! सावकाराच्या सांगण्यावरून शेतकऱ्याने ८ लाखांना विकली किडनी; कंबोडियात जाऊन केले ऑपेरेशन
9
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
10
धक्कादायक! ७ वर्षांच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू, आईनेच खाली फेकल्याचा संशय  
11
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
12
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
13
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
14
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
15
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
16
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
17
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
18
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
19
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
20
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
Daily Top 2Weekly Top 5

म्हादईप्रश्नी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे न्या- सुदिन ढवळीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 20:04 IST

कर्नाटकचे केंद्रीय नेते प्रल्हाद जोशी यांच्यासह तेथील सगळे महत्त्वाचे नेते केंद्रीय जलशक्ती मंत्रलयाच्या मंत्र्यांना 26 रोजी भेटतात व दुसऱ्याच दिवशी म्हादई जलतंटा लवादाचा निवाडा अधिसूचित होतो.

पणजी : म्हादई पाणीप्रश्नी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्याहून सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे न्यावे अशी मागणी मगोपचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. गोव्याचे खासदार, केंद्रीय मंत्री, जलसंसाधन मंत्री वगैरे म्हादईप्रश्नी गोव्याचे हितरक्षण करण्यात पूर्ण अपयशी ठरले, अशी टीका ढवळीकर यांनी केली.

कर्नाटकचे केंद्रीय नेते प्रल्हाद जोशी यांच्यासह तेथील सगळे महत्त्वाचे नेते केंद्रीय जलशक्ती मंत्रलयाच्या मंत्र्यांना 26 रोजी भेटतात व दुसऱ्याच दिवशी म्हादई जलतंटा लवादाचा निवाडा अधिसूचित होतो. मात्र गोव्याचे खासदार, केंद्रीय मंत्री, जलसंसाधन मंत्री, मुख्यमंत्री कुणीच दिल्लीत जात नाही. म्हादईप्रश्नी गोव्याच्या मंत्री व मुख्यमंत्र्यांचे केंद्र सरकार काहीच ऐकून घेत नाही असा याचा अर्थ होतो, असे ढवळीकर म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी निदान आता गोव्यातील सर्वपक्षीयांकडून निवेदन तरी लिहून घ्यावे व कडक शब्दांतील निवेदन पंतप्रधानांना पाठवावे, असे ढवळीकर यांनी सूचविले. हा विषय गोव्याच्या हितरक्षणाचा आहे. म्हादईचे परिणाम एवढे गंभीर होतील की, दाबोससह सर्व पाणी पुरवठा योजना बंद पडतील. लोकांना रस्त्यावर उतरावे लागेल. प्रमोद सावंत सभापती होते तेव्हा त्यांनी म्हादईच्या खोऱ्याला भेट देऊन कर्नाटकच्या प्रयत्नांमुळे गोव्यातील गांजे उसगावची पाणी पुरवठा योजना अडचणीत येईल असे म्हटले होते, आता ते का गप्प आहेत ते कळत नाही. लवादाचा निवाडा अधिसूचित होणो म्हणजे केंद्राने पाणी वळविण्यास कर्नाटकला थेट एनओसी दिल्यासारखा अर्थ होतो, असे ढवळीकर म्हणाले.

सरकारची ढोंगबाजी : सावळ 

म्हादईचे पाणी कर्नाटकने काही प्रमाणात वळविल्यामुळे आताच डिचोली नदीचे पाणी कमी झाले आहे व आमठाणो धरणातही पाण्याची पातळी कमी होत असल्याचे माजी आमदार नरेश सावळ यांनी सांगितले. म्हादईप्रश्नी गोवा सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. म्हादई म्हणजे स्वत:ची आई आहे असे सरकारने सांगणो ही निव्वळ ढोंगबाजी आहे, असे सावळ म्हणाले.

म्हादईचे पाणी वळविण्याचे दुष्परिणाम पूर्ण गोव्याला पुढील दहा-पंधरा वर्षात दिसून येतील. येथील निसर्ग, पर्यावरण, जैवसंपदा नष्ट होईल. ज्या हिंटरलँड पर्यटनाच्या गोष्टी सरकार सांगते, ते ग्रामीण भागातील पर्यटनच संपुष्टात येईल, असे मिलिंद पिळगावकर यांनी सांगितले. कुडचिरे, म्हावळींगे सारख्या भागात म्हादईच्या उपनद्यांवर शेती, कुळागरे जगतात. यापुढे तेही नष्ट होईल, असे पिळगावकर म्हणाले. जिल्हा पंचायत निवडणुकीत लोकांनी भाजपला धडा शिकवावा, असे ढवळीकर म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा