शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

कोल्हापूरहून नऊ मुले विनापरवाना आणली गोव्यात

By admin | Updated: April 26, 2015 01:35 IST

पणजी : कोल्हापूरहून नऊ मुले विनापरवाना गोव्यात आणल्याची घटना उघडकीस आली आहे.

पणजी : कोल्हापूरहून नऊ मुले विनापरवाना गोव्यात आणल्याची घटना उघडकीस आली आहे. आश्रय व निवारा देण्याच्या नावाखाली आणलेल्या या मुलांना सांताक्रुझ येथील एका घरात ठेवले होते व त्यासाठी बालकल्याण समितीची परवानगीही घेतली नव्हती. गोवा पोलिसांनी कारवाई करून मुलांना अपना घरमध्ये पाठविले आहे. ही मुले कोल्हापूर येथील ‘माय फादर्स हाउस’ या बिगर सरकारी संस्थेच्या आश्रयगृहात होती. अमान्युएल गायकवाड आणि कोरियन नागरिक कुकु किमो ऊर्फ डेव्हीड ही बिगर सरकारी संस्था चालवित होते. त्यांना २०१४ मध्ये गोव्यात आणले होते. सांताक्रुझ येथील एका इमारतीत त्यांना ठेवण्यात आले होते. त्यानंतर या ठिकाणी काही देशी विदेशी लहान मुले दिसू लागल्यामुळे स्थानिकांनी याची माहिती ‘अर्ज’ या बिगर सरकारी संस्थेला दिली. या संस्थेकडून पणजी पोलिसांना याची माहिती देण्यात आली आणि १६ मार्च रोजी पणजी पोलिसांनी या वास्तूवर छापा टाकला. त्या वेळी इंग्लंड येथील तिमोती जेडेस नामक व्यक्तीच्या आश्रयाला असलेल्या ९ मुलांना ताब्यात घेण्यात आले. जेडेस यांनी त्यांची स्वयंसेवी संस्था असल्याचे सांगितले तसेच काही अडचणी असलेल्या मुलांना ते आश्रय देत असल्याचे सांगितले; परंतु मुलांना गोव्यात आणताना आवश्यक असलेला बालकल्याण समितीचा परवाना त्यांना सादर करता आला नाही. त्यामुळे त्यांचे हे स्वयंसेवी काम असले तरी ते बेकायदा ठरत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.पोलिसांनी जेडेस यांचा पासपोर्ट जप्त केला आहे; परंतु त्यांना अटक करण्यात आलेली नाही. मुलांना सध्या अपना घरमध्ये ठेवण्यात आले आहे. ९ पैकी दोन मुले ही एचआयव्ही बाधित असल्याचीही माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)