शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

घाऊक फुटीच्या पार्श्वभूमीवर गोवा राष्ट्रवादीची बैठक

By admin | Updated: May 15, 2016 19:11 IST

राष्ट्रवादीतील घाऊक फुटीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेश निरीक्षक नवाब मलिक सोमवारी गोव्यात दाखल होत असून पक्ष कार्यकारिणीची बैठक त्यांच्या उपस्थितीत होणार आहे

 पणजी : राष्ट्रवादीतील घाऊक फुटीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेश निरीक्षक नवाब मलिक सोमवारी गोव्यात दाखल होत असून पक्ष कार्यकारिणीची बैठक त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. पक्षातील गळती रोखण्यास अपयशी ठरल्याने प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांना जबाबदार धरले जात असून अध्यक्ष पदावरून त्यांना दूर करण्याची मागणीही या बैठकीत होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक केवळ आठ ते दहा महिन्यांवर येऊन ठेपली असताना तसेच पक्षाला खरी गरज असताना माजी अध्यक्ष नीळकंठ हळर्णकर, ज्येष्ठ उपाध्यक्ष ट्रोजन डिमेलो यांच्यासह तब्बल ११ पदाधिकाऱ्यांनी केलेला काँग्रेस प्रवेश राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींनीही गंभीरपणे घेतला आहे. या पार्श्वभूमीवरच गोवा निरीक्षक मलिक हे आज दाखल होत आहेत. पक्षात असंतोष आहे हे माहीत असतानाही तसेच स्थिती हाताबाहेर जात असतानाही प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून ठेवण्यातच प्रदेशाध्यक्षांचे खरे कसब होते; परंतु यात ते पूर्णपणे अपयशी ठरले, अशी श्रेष्ठींचीही भावना बनलेली आहे. या उलथापालथीनंतर राष्ट्रवादी गट समित्यांचे काही पदाधिकारीही काँग्रेसच्या वाटेवर आहेत. गट समित्यांच्या या पदाधिकाऱ्यांनी हळर्णकर तसेच ट्रोजन यांच्यामार्फत काँग्रेसशी संपर्क साधला आहे. त्यांना रोखण्यासाठी तसेच डॅमेज कंट्रोलसाठी निरीक्षकांच्या उपस्थितीत कार्यकारिणी बैठकीत चर्चा होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेतेच काँग्रेसमध्ये प्रवेश करू लागल्याने आगामी निवडणुकीत युतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्याचा विकास काँग्रेसच करू शकतो. त्यामुळे हाच पक्ष बळकट करण्याची गरज वाटली. त्यामुळेच काँग्रेस प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, हे हळर्णकर यांचे विधान त्यादृष्टीने बरेच बोलके आहे. (प्रतिनिधी) बॉक्स - स्वार्थासाठीच पक्षबदल : देवानंद नाईक पक्षाचे उपाध्यक्ष देवानंद नाईक यांना विचारले असता, सोमवारी राज्य कार्यकारिणीची बैठक होत असल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांची यात काहीच चूक नसल्याचा दावा करून जे कोणी पक्ष सोडून गेले आहेत, ते स्वार्थासाठीच गेल्याचे ते म्हणाले. हळर्णकर यांनी राष्ट्रवादीत असताना मंत्रिपद तसेच अध्यक्षपदही भोगले. ट्रोजन यांनी मध्यंतरी राष्ट्रवादी सोडून नंतर पुन्हा पक्षात प्रवेश केला, असे ते म्हणाले.