शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
2
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी
3
Netherlands vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने श्रीलंकेचा उडवला धुव्वा
4
Fact Check : बीबीसीचा 'हा' व्हिडीओ २०२४ च्या निवडणुकीतील नाही; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
5
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
6
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
7
'त्या' घटनेनंतर पुन्हा एक अब्जाधीश टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणार; जाणून घ्या कोण आहेत?
8
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
9
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास रॉकेट बनतील 'हे' 'Modi Stocks', होऊ शकते बंपर वाढ
10
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले
11
तलावाच्या खोदकामात JCB च्या खोऱ्यात अडकलं पोतं; उघडून पाहताच पैशाचं घबाड
12
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'
13
"तुम्हाला जमत नसेल तर गृहखातं माझ्याकडे द्या’’, सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला 
14
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
15
T20 World Cup 2024 : ...म्हणून यंदाही भारताचाच दबदबा; IND vs PAK मध्ये टीम इंडिया ठरू शकते वरचढ
16
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
17
"नरेंद्र मोदी आपले निवृत्त जीवन...", पंतप्रधानांच्या दौऱ्यावर जयराम रमेश यांची खोचक टीका
18
३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी; पुणे अपघात प्रकरणात सरकारचा निर्णय
19
राज्यातील १०४७ पोलिसांना मतदान करण्याची परवानगी द्या, खासदाराची निवडणूक आयोगाला विनंती
20
'या' आलिशान क्रूझवर होतेय अनंत-राधिका यांची प्री वेडिंग सेरेमनी; किंमत, खासियत पाहून व्हाल अवाक्

गोव्यात मिरामार किनारी जहाज रुतले, चौघे कर्मचारी जखमी

By admin | Published: July 16, 2017 7:17 PM

मांडवी नदीतील सहावा कसिनो अशी ओळख होत असलेले जहाज हार्बरहून मांडवीत आणले जात असता जोरदार वाऱ्या-पावसामुळे भरकटून मिरामार समुद्रकिनारी अडकले

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 16 - वादग्रस्त ‘एमव्ही लकी सेव्हन’ म्हणजेच मांडवी नदीतील सहावा कसिनो अशी ओळख होत असलेले जहाज हार्बरहून मांडवीत आणले जात असता जोरदार वाऱ्या-पावसामुळे भरकटून मिरामार समुद्रकिनारी अडकले. किनाऱ्यापासून केवळ १00 मीटरवर समुद्रात वाळूच्या पट्ट्यात जहाज अडकले. परिणामी किनाऱ्यावर तेल गळतीचा धोका निर्माण झाला आहे. या कसिनो जहाजावर १७ कर्मचारी होते. पैकी चारजण या दुर्घटनेत जखमी झाले. तटरक्षक दलाच्या जवानांनी हेलिकॉप्टर आणि पाणबुड्यांच्या साहाय्याने त्यांची सुटका केली. शनिवारी ही घटना घडली. या घटनेमुळे सरकारी अनास्थेविषयी संताप व्यक्त होत आहे. विरोधी काँग्रेसमध्येही याचे तीव्र पडसाद उमटले. उद्यापासून सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात हा विषय गाजण्याची चिन्हे आहेत. हरियाणाचे माजी मंत्री गोपाल कांडा यांच्या गोल्डन ग्लोब कंपनीचा हा कॅसिनो दोन टगच्या साहाय्याने मांडवीत आणला जाताना नदीच्या मुखावर निर्माण झालेल्या वाळूच्या पट्ट्यात अडकला. जोरदार वाऱ्यामुळे तो भरकटत असता वायर रोपने नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले; परंतु ते फोल ठरले. मांडवीच्या मुखाजवळ पाण्याखाली वाळूचे बेट निर्माण झाले आहे. तेथेच हा कसिनो अडकला. बंदर कप्तान खात्याने सहाव्या कॅसिनोला परवानगी नाकारली होती, तरीदेखील सरकारने त्याला परवानगी दिली. मांडवीच्या मुखावर समुद्रात निर्माण झालेले वाळूचे बेट जलवाहतुकीस धोकादायक बनले असल्याचे बंदर कप्तान खात्याने सरकारच्या निदर्शनास आणले होते; परंतु शेवटी हा कसिनो आलाच. या कसिनोवरील जुगार व अन्य उद्योग अजून सुरू झालेले नसल्याने ग्राहक नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. १२ हजार लिटर इंधन या जहाजात तब्बल १२ हजार लिटर इंधन असल्याचे सांगितले जाते. दोन टगच्या साहाय्याने तो मांडवी नदीत आणताना ही घटना घडली. त्यावर नियंत्रण आणण्याच्या प्रयत्नात चौघे जखमी झाले; परंतु भरतीमुळे त्यांच्यापर्यंत वैद्यकीय मदत पोहचू शकली नाही. त्यांना हेलिकॉप्टर व पाणबुड्यांच्या मदतीने रविवारी सकाळी सुखरूप बाहेर काढण्यात आले. चौघाजणांना वैद्यकीय उपचारार्थ येथील एका खासगी इस्पितळात दाखल केले होते; परंतु नंतर त्यांना घरी जाऊ देण्यात आले. पुढील १५ दिवस तरी अशक्यसमुद्रात अडकून पडलेल्या बोटींची सुटका करणारे माडगावकर साल्वेज कंपनीचे आनंद माडगावकर यांनी, जहाजाच्या कप्तानाची काही चूक नाही. मान्सूनमुळे खराब वातावरण असून जोरदार वारे तसेच भरतीमुळे पुढील १५ दिवस तरी हे जहाज काढणे शक्य नाही, असे सांगितले. अशा स्थितीत ते काढण्याचा प्रयत्न झाल्यास तेल गळतीही होऊ शकते आणि तसे झाल्यास मिरामार ते करंजाळेपर्यंतचा संपूर्ण किनारा काळवंडण्याचा धोका आहे.