शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

गोव्यातील खनिज खाणप्रश्नी शिष्टमंडळाने घेतली गडकरींची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 12:08 IST

गोव्यातील खनिज खाण व्यवसाय जलदगतीने नव्याने सुरू व्हावा म्हणून कायदेशीर उपाययोजना केली जावी अशी मागणी घेऊन दिल्लीला गेलेले गोवा सरकारचे शिष्टमंडळ गुरुवारी सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटले.

पणजी - गोव्यातील खनिज खाण व्यवसाय जलदगतीने नव्याने सुरू व्हावा म्हणून कायदेशीर उपाययोजना केली जावी अशी मागणी घेऊन दिल्लीला गेलेले गोवा सरकारचे शिष्टमंडळ गुरुवारी सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटले. गुरुवारी सायंकाळी या शिष्टमंडळाची पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपेंद्र मिश्र यांच्यासोबत बैठक होणार आहे.

शिष्टमंडळात र्पीकर सरकारमधील ज्येष्ठ मंत्री सुदिन ढवळीकर, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर,  लोकसभा खासदार नरेंद्र सावईकर, भाजपचे आमदार प्रमोद सावंत, निलेश काब्राल, सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर आदींचा समावेश आहे. शिष्टमंडळाने दिल्लीला जावे व प्रसंगी अॅटर्नी जनरल वेणूगोपाल यांचीही भेट घ्यावी असे सोमवारी ठरले होते. मंगळवारी रात्री उशिरा हे शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झाले. सकाळी केंद्रीय मंत्री गडकरी यांना शिष्टमंडळ भेटले तेव्हा गडकरी यांनी शिष्टमंडळाचे म्हणणो ऐकून घेतले व आपण सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी मिश्र यांना भेटूया असा सल्ला शिष्टमंडळाला दिला. गोव्यातील खनिज व्यवसायिकांनीही यापूर्वी स्वतंत्रपणो पंतप्रधान कार्यालयाला निवेदन दिलेले आहे. सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करावी असे केंद्र सरकारच्या पातळीवर यापूर्वी ठरलेले आहे. तथापि, जर फेरविचार याचिकेतून काही निष्पन्न होणार नसेल तर केंद्रीय खनिज कायदा दुरुस्त करणारा वटहुकूम जारी करून गोव्यातील खाणी लवकर नव्याने सुरू कराव्यात अशी मागणी काही आमदार करत आहेत. कायद्याच्या चौकटीत ही मागणी कितपत बसते याविषयी पंतप्रधान कार्यालय विचार करू शकते, असे सुत्रंनी सांगितले.

गोवा फॉरवर्डच्या मंत्र्यांनीही शिष्टमंडळासोबत दिल्लीला यावे असे अपेक्षित होते पण ऐनवेळी भेट ठरल्याने ते गेले नाहीत. गोव्याचे मुख्य सचिव धमेंद्र शर्मा हे बुधवारी देशाचे अॅटर्नी जनरल वेणूगोपाल यांना दिल्लीत भेटले पण ती प्राथमिक स्वरुपाची चर्चा होती. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या 7 फेब्रुवारी रोजी गोव्यातील सर्व खनिज लिजेस रद्द करणारा आदेश दिला. दि. 15 फेब्रुवारीपासून खनिज व्यवसाय बंद झाला. यामुळे खाणग्रस्त भागात सरकारविरुद्ध असंतोष वाढत असल्याने शिष्टमंडळ केंद्र सरकारला साकडे घालण्यास दिल्लीला गेले आहे. फेरविचार याचिकेचा मसुदा अजून तयार झालेला नाही.

दरम्यान, गोवा सरकार गडकरी यांनी घडविलेले असल्याने आम्ही गोमंतकीयांसमोर प्रश्न निर्माण होतो तेव्हा प्रथम गडकरी यांनाच भेटतो, असे मंत्री ढवळीकर यांचे म्हणणो आहे.

टॅग्स :goaगोवाNitin Gadakriनितिन गडकरीnewsबातम्या