शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

गोव्यात कायदा सुव्यवस्था नियंत्रणाबाहेर? खंडपीठाचा सरकारला प्रश्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 20:24 IST

राज्यात कायदा सुव्यवस्था नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे काय असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सरकारला केला. सेरुला कोमुनिदादची कार्यकारणीची निवडणूक गोंधळ घातल्यामुळे स्थगित करावी लागली होती. हा मुद्दा मंगळवारी सुनावणीसाठी आला असता खंडपीठाने हा प्रश्न केला. 

पणजी: राज्यात कायदा सुव्यवस्था नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे काय असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सरकारला केला. सेरुला कोमुनिदादची कार्यकारणीची निवडणूक गोंधळ घातल्यामुळे स्थगित करावी लागली होती. हा मुद्दा मंगळवारी सुनावणीसाठी आला असता खंडपीठाने हा प्रश्न केला. 

सेरुला कोमुनिदादची निवडणूक प्रक्रिया पोलीस संरक्षणात घेण्याचा न्यायालयाचा आदेश होता. त्यानुसार २७ जानेवारी रोजी कोमुनिदाद प्रशासकाच्या आदेशानुसार निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. कोमुनिदादचे दोन सरळ गट पडले असल्यामुळे  आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे हा मुद्दा न्यायालयासमोर आला होता. २७ जानेवारी रोजी ५९ पोलिसांच्या बंदोबस्तात निवडणूक प्रक्रिाय सुरू झाली तेव्हा कोमुनिदादच्या एका गटाने गोंधळ घालायला सुरूवात केली . त्यानंतर हा गोंधळ वाढून निवडणूक बंदच करावयास प्रशासकाला भाग पडले. या प्रकरणात अहवाल खंडपीठाने मागविला होता. 

अहवालातील नोंदी पाहून न्यायमूर्ती महेश सोनक व पृथ्विराज चौहान यांनी सरकारवर कडक ताशेरे ओढले. कोमुनिदादच्या निवडणुकाही शांततेत होवू शकत नाहीत. राज्यात कायदा  सुव्यवस्था नियंत्रणाबाहेर गेली आहे काय? असा प्रश्न सरकारी वकिलांना केला. या प्रकरणात स्पष्टीकरण देण्यासाठी तातडीने उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांनी संध्याकाळी २.३० वाजता हजर राहाण्याचा आदेशही त्यांनी दिला. परंतु नंतर या आदेशात दुरुस्ती करताना अधिक्षकांना बुधवारी उपस्थित राहण्यास सांगितली. त्यामुळे उत्तर गोव्याच्या अधीक्षक चंदन चौधरी यांना बुधवारी न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. 

अतिरिक्त सरकारी अभियोक्ते प्रवीण फळदेसाई यांनी खंडपीठाच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले, ‘एका कोमुनिदादची निवडणूक गोंधळामुळे स्थगिती ठेवावी लागली तर त्याला राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झाला असे म्हणता येणार नाही. तसेच कोमुनिदाग निवडणुकीसाठी  पोलिसांचा मोठा फौजफाटा देण्यासही मर्यादा पडतात. राज्यातील सर्व कोमुनिदाद ससमितींच्या निवडणुकीत असा पोलीस फौज फाटा पाठवावा काय ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Courtन्यायालय