शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

गोव्यात कायदा सुव्यवस्था नियंत्रणाबाहेर? खंडपीठाचा सरकारला प्रश्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 20:24 IST

राज्यात कायदा सुव्यवस्था नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे काय असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सरकारला केला. सेरुला कोमुनिदादची कार्यकारणीची निवडणूक गोंधळ घातल्यामुळे स्थगित करावी लागली होती. हा मुद्दा मंगळवारी सुनावणीसाठी आला असता खंडपीठाने हा प्रश्न केला. 

पणजी: राज्यात कायदा सुव्यवस्था नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे काय असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सरकारला केला. सेरुला कोमुनिदादची कार्यकारणीची निवडणूक गोंधळ घातल्यामुळे स्थगित करावी लागली होती. हा मुद्दा मंगळवारी सुनावणीसाठी आला असता खंडपीठाने हा प्रश्न केला. 

सेरुला कोमुनिदादची निवडणूक प्रक्रिया पोलीस संरक्षणात घेण्याचा न्यायालयाचा आदेश होता. त्यानुसार २७ जानेवारी रोजी कोमुनिदाद प्रशासकाच्या आदेशानुसार निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. कोमुनिदादचे दोन सरळ गट पडले असल्यामुळे  आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे हा मुद्दा न्यायालयासमोर आला होता. २७ जानेवारी रोजी ५९ पोलिसांच्या बंदोबस्तात निवडणूक प्रक्रिाय सुरू झाली तेव्हा कोमुनिदादच्या एका गटाने गोंधळ घालायला सुरूवात केली . त्यानंतर हा गोंधळ वाढून निवडणूक बंदच करावयास प्रशासकाला भाग पडले. या प्रकरणात अहवाल खंडपीठाने मागविला होता. 

अहवालातील नोंदी पाहून न्यायमूर्ती महेश सोनक व पृथ्विराज चौहान यांनी सरकारवर कडक ताशेरे ओढले. कोमुनिदादच्या निवडणुकाही शांततेत होवू शकत नाहीत. राज्यात कायदा  सुव्यवस्था नियंत्रणाबाहेर गेली आहे काय? असा प्रश्न सरकारी वकिलांना केला. या प्रकरणात स्पष्टीकरण देण्यासाठी तातडीने उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांनी संध्याकाळी २.३० वाजता हजर राहाण्याचा आदेशही त्यांनी दिला. परंतु नंतर या आदेशात दुरुस्ती करताना अधिक्षकांना बुधवारी उपस्थित राहण्यास सांगितली. त्यामुळे उत्तर गोव्याच्या अधीक्षक चंदन चौधरी यांना बुधवारी न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. 

अतिरिक्त सरकारी अभियोक्ते प्रवीण फळदेसाई यांनी खंडपीठाच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले, ‘एका कोमुनिदादची निवडणूक गोंधळामुळे स्थगिती ठेवावी लागली तर त्याला राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झाला असे म्हणता येणार नाही. तसेच कोमुनिदाग निवडणुकीसाठी  पोलिसांचा मोठा फौजफाटा देण्यासही मर्यादा पडतात. राज्यातील सर्व कोमुनिदाद ससमितींच्या निवडणुकीत असा पोलीस फौज फाटा पाठवावा काय ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Courtन्यायालय