शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

कलाकारांचे काळीज रडते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2024 07:50 IST

'गोवा कला अकादमी'ची वेदनाही अधिक तीव्र आहे.

राजधानी पणजी शहराच्या वेदना ऐकून गोवा सरकारचे कान कधीच डब्ब किंवा निर्जीव झाले आहेत. सत्ताधाऱ्यांना पणजीचे दुखणे कधीच कळले नाही. 'स्मार्ट सिटी'च्या नावाखाली लोकांनी सगळे काही सोसले. यावेळी लोकसभा निवडणुकीवेळी पणजीत मतदानदेखील जास्त झाले नाही. भाजपच्या बालेकिल्ल्यात फक्त ६८ टक्के मतदान झाले. राजकीय नेते अपेक्षाभंग करीत असल्याने निवडणुकांबाबत मतदार निरुत्साही आहेत. भ्रष्टाचार निपटून काढू असे सांगत सत्तेत येणारे अनेकजण मग भ्रष्टाचाराची नवी व्याख्या अस्तित्वात आणतात. 'गोवा कला अकादमी'ची वेदनाही अधिक तीव्र आहे. कलाकारांचे काळीज रडतेय.

ज्या प्रकल्पाच्या नूतनीकरणावर ५०-६० कोटी रुपये खर्च करण्यात आले, त्या प्रकल्पाला पावसाच्या पहिल्याच सरींमध्ये गळती लागली. पाणीच पाणी चोहीकडे अशी कला अकादमीची मे महिन्यातच स्थिती आहे मग जून-जुलैमध्ये धो-धो पाऊस कोसळेल तेव्हा या प्रकल्पाचे काय होईल? सार्वजनिक बांधकाम खात्याला याबाबत जबाबदार धरावे लागेल. परवाच्या रविवारी दोन तास पडलेल्या पावसात कला अकादमीच्या बांधकामाच्या मर्यादा उघड झाल्या, नूतनीकरणासाठी जो खर्च केला गेला, त्या खर्चाच्या विनियोगावर व कामाच्या दर्जावर कुणी लक्षच ठेवले नव्हते काय, असा प्रश्न पडतो. 

दरवेळी कला अकादमीत पाणी आले की, वेगवेगळी कारणे दिली जातात. एकदा कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी भेट दिली व स्थितीची पाहणी केली. झाडाची पाने वगैरे पाचोळा साचला होता, तिथून पाणी आले असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. परवा बांधकाम खात्याच्या काही वरिष्ठ अभियंत्यांनी पाहणी केली. त्यांनी वातानुकूलित यंत्रणा जिथे बसवली आहे, तेथील एका पाइपच्या जागेतून पाणी आले असा दावा केला आहे. 

अकादमीच्या साउंड सिस्टीमविषयी यापूर्वी एक-दोन कलाकारांनी सोशल मीडियावरून आवाज उठवला. त्यावर मंत्री गावडे यांनी ध्वनी यंत्रणा अगदी ठीक आहे, असे सांगितले. अर्थात, तो तांत्रिक मुद्दा झाला, ध्वनी व्यवस्था कदाचित ठीक असेलही; पण कलाकारांच्या समितीने त्याबाबतचे प्रमाणपत्र द्यायला हवे. राज्यातील ज्येष्ठ, अनुभवी आणि तटस्थ कलाकारांची समिती मुख्यमंत्र्यांनी आता खरेच स्थापन करावी. या समितीने अकादमीची पूर्णपणे पाहणी करावी आणि मग अकादमीत अजून कोणत्या त्रुटी राहिल्या आहेत ते समजून घेऊन सरकारला त्याविषयी अहवाल द्यावा. हा कुणीच अहंकाराचा विषय बनवू नये. सरकारने शेवटी अकादमीवर लोकांचे पैसे खर्च केले आहेत. 

५०-६० कोटी रुपये ही लहान रक्कम नव्हे. २००३ मध्ये पर्रीकर सरकारच्या काळात २३ कोटी रुपये खर्चुन अकादमीचे नूतनीकरण केले गेले होते. त्यावेळी ब्लॅक बॉक्सची वाट लावण्यात आली होती. आता कृष्णकक्षाला पूर्वीचे रूप दिले गेले असेल तर ते स्वागतार्हच आहे; मात्र करदात्यांच्या पैशांनी अकादमीचे पूर्ण काम करून घेतले गेल्यानंतरही जर समस्या संपत नसतील व छत गळत असेल तर सरकारचे कान पिळावेच लागतील. हे काम कलाकारांना करावे लागेल. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाचे नाट्यगृह कला अकादमीत आहे. निदान मंगेशकरांच्या नावाचे तरी भान ठेवून सरकारने नाट्यगृह सर्व बाजूंनी निर्दोष ठेवायला हवे. 

नाट्यगृहाच्या छतालाही गळती लागली व त्यामुळे तिथे 'तियात्र' सुरू असताना प्रेक्षकांची तारांबळ उडाली. तासभर नाट्यगृहात पाणी ठिबकत होते. साठ कोटी रुपये खर्च करणाऱ्या सरकारला याबाबत थोडे जरी वाईट वाटले तरी पुरेसे होईल. अर्थात केवळ एकटे मंत्री गोविंद गावडे यांना येथे दोष देता येणार नाही. शेवटी बांधकाम खात्याने काम करून घेतले होते व खात्यात अनेक अभियंत्यांची फौज आहे. 

कंत्राटदाराने जर काम निर्दोष केलेले नसेल, तर त्याला जबाबदार धरून त्याच्या खिशातील खर्चाने उर्वरित काम करून घ्यावे लागेल यापुढे कला अकादमीत कार्यक्रम पाहताना छत्र्या घेऊन बसण्याची वेळ सरकारने प्रेक्षकांवर व कलाकारांवरही आणू नये. अकादमीच्या परिसरातील झाडांची पाने वगैरे छपरावर पडतात व त्यामुळे गळते असे आजच्या काळात सांगणे हा एक क्रूर विनोद आहे. सरकारने आणखी विनोदी बनू नये. थोडे कुट्ट करणारे सामान्य लोकदेखील एवढे विनोदी नसतात.

 

 

टॅग्स :goaगोवा