शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Goa: गोव्यात अनुकंपा नोकरीसाठी उत्पन्न मर्यादा ३ लाख रुपयांवरुन ५ लाख रुपये, गोवा सरकारचा निर्णय

By किशोर कुबल | Updated: July 12, 2023 13:58 IST

Goa Government: गोवा मंत्रिमंडळाने अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरीसाठी अर्ज करणाय्रांना वार्षीक उत्पन्न मर्यादा वाढवून ३ लाख रुपयांवरुन ५ लाख रुपये केली आहे. १ एप्रिल २०१७ पासून पूर्वलक्षी प्रभावाने ती लागू झाली आहे.

- किशोर कुबल पणजी : गोवा मंत्रिमंडळाने अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरीसाठी अर्ज करणाय्रांना वार्षीक उत्पन्न मर्यादा वाढवून ३ लाख रुपयांवरुन ५ लाख रुपये केली आहे. १ एप्रिल २०१७ पासून पूर्वलक्षी प्रभावाने ती लागू झाली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, ३ लाख रुपये उत्पन्न मर्यादेमुळे अनेकांना अर्ज करता आले नाहीत. त्यांना आता अर्ज सादर करता येतील. सरकारी नोकरीत असताना मृत्यू पावल्यास संबंधित व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला सरकारी खात्यामध्ये नोकरीसाठी अर्ज करता येतो. वरील निर्णयाचा सुमारे ३५० जणांना लाभ होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री एका प्रश्नावर म्हणाले कि,‘ सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेणाय्रांना त्यांचे बॅंक खाते आधार कार्डशी लिंक करणे सक्तीचे आहे. गृह आधार, लाडली लक्ष्मी, दयानंद सामाजिक सुरक्षा तसेच अन्य कल्याणकारी योजनांसाठीही हे लागू आहे. त्यामुळे लाभार्थींनी आधार कार्ड आपल्या खात्याशी लिंक करावे.’ दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत विद्यालयांसाठीच्या विद्या साहाय्य योजनेला मंजुरी देण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती मदत सेवा विभागाला २५ हजार चौरस मिटर जमीन प्रदान करणे, दक्षिण गोव्यात चार ठिकाणी बॅायलर ॲापरेटरचे पद भरणे, जागतिक टेनिस स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप आदी गोष्टींना मंजुरी देण्यात आली. पत्रकार परिषदेस वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो हेही उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवाGovernmentसरकार