शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

खाणप्रश्नी सरकारला गोव्याच्या एजींचा सल्ला सरकारला अमान्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 12:41 IST

गोव्यातील अनेक वकिलांनाही यामुळे थोडा आश्चर्याचाच धक्का बसला आहे.

पणजी : गोव्याचे अॅडव्हकेट जनरल (एजी) दत्तप्रसाद लवंदे यांनी गोवा सरकारला खनिज खाण लिजांचा लिलावच पुकारायला हवा आणि सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करणो योग्य नव्हे, ते निष्फळ ठरेल अशा प्रकारचा सल्ला दिलेला असला तरी, काही लोकांना खूष करण्याच्या नादात सरकारने राजकीय कारणास्तव एजींचा सल्ला मान्य न करण्याची भूमिका घेतल्याचे तूर्त दिसून येत आहे. सरकारमधील तीन मंत्र्यांच्या समितीने तरी सर्वोच्च न्यायालयाच्या गेल्या दि. 7 फेब्रुवारीच्या आदेशाच्या अनुषंगाने न्यायालयात फेरविचार याचिका सादर करण्याचे ठरवले आहे. गोव्यातील अनेक वकिलांनाही यामुळे थोडा आश्चर्याचाच धक्का बसला आहे.देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी हे 2015 सालापर्यंत गोव्याचे अॅडव्हकेट जनरल होते. आता दत्तप्रसाद लवंदे हे अॅडव्हकेट जनरल आहेत. नाडकर्णी व लवंदे या दोघांचेही सल्ले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सरकार कायम ऐकत आले. त्यांचे सल्ले कधी अमान्य केले गेले नाहीत. खनिज खाणप्रश्नी मात्र नाडकर्णी व लवंदे या दोन्ही तज्ज्ञांचे सल्ले पूर्णपणे स्वीकारण्याच्या मनस्थितीत सध्या गोवा सरकारमधील तीन मंत्र्यांची समिती नाही. मुख्यमंत्री मनोहर पर्कीकर सध्या अमेरिकेत उपचार घेत आहेत. ते तिथे इस्पितळात दाखल झालेले असताना गोव्यात खनिज खाण बंदी गुरुवारपासून लागू झाली आहे. गोव्यातील सगळ्य़ा खनिज खाणी बंद झाल्या आहेत. पाच वर्षात दुस:यांदा 1क्क् टक्के खनिज खाणी बंद होण्याची वेळ गोव्यात आली आहे. यामुळे खाणींवर अवलंबून असलेल्या लोकांचा सरकारवर आणि तीन मंत्र्यांच्या सल्लागार समितीवर दबाव येत आहे. या दबावाच्या पाश्र्वभूमीवरच एजी लवंदे यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून  सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करण्याच्या विचाराप्रत सरकार आले आहे. खाणपट्टय़ातील जे लोक खाण बंदीमुळे अस्वस्थ झालेले आहेत, त्यांच्यासाठी आपण काही तरी करतो आहोत हे सरकार दाखवू पाहत आहे व त्यासाठीच फेरविचार याचिका सादर करण्याचा निर्णय तीन मंत्र्यांच्या समितीने घेतला आहे असा निष्कर्ष राजकीय विश्लेषक काढत आहेत.गेल्या 7 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिला व गोव्यातील सर्व 88 खनिज लिजेस रद्द केली. तसेच खनिज लिजांचा लिलाव पुकारण्याची सूचना केली. काही मंत्री अगोदर लिलाव पुकारण्याशी सहमत नव्हते. याविषयी खाण खात्याने अॅडव्हकेट जनरलांचा सल्ला मागितला. एजींनी सल्ला देताना लिजांचा लिलाव पुकारणो हाच एकमेव उपाय ठरेल असे स्पष्टपणो लेखी स्वरुपात सरकारला कळवले. तसेच लिलाव वगळता अन्य कोणता मार्ग जर स्वीकारला गेला तर ते गोवा सरकारविषयी चुकीचा समज निर्माण करणारे ठरेल आणि सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करण्याची प्रक्रिया देखील निष्फळ ठरेल, असे एजींनी बजावले. मात्र तीन मंत्र्यांच्या समितीने फेरविचार याचिका सादर करण्याचे ठरवले आहे. तशी शिफारस समितीने मुख्यमंत्री र्पीकर यांच्या मंजुरीसाठी पाठवून दिली आहे. लिजांचा लिलाव करण्याचा सल्ला मात्र मंत्र्यांच्या समितीला तत्त्वत: मान्य आहे, असे सुत्रांनी सांगितले.