शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

कोरोना महामारीत पालिका निवडणूक म्हणजे लोकांना धोक्याच्या खाईत लोटणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 16:26 IST

विजय सरदेसाई : सरकारला लोकांच्या आरोग्याचे पडून गेलेले नाही हे पुन्हा सिद्ध

मडगाव: गोव्यात कोरोना फैलावलेला असताना सरकार नगरपालिका निवडणूक घेण्याची तयारी करते ते पाहिल्यास हे सरकार जनतेला धोक्याच्या खाईत लोटू पाहते हे सिद्ध होते असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला असून आपल्या राजकीय आरोग्यापुढे या सरकारला सार्वजनिक आरोग्याचे फारसे पडून गेलेले नाही हे परत एकदा सिद्ध झाले आहे असे त्यांनी म्हटले आहे.

गोवा सरकारने ऑक्टोबर महिन्यात नगरपालिका निवडणूक घेण्याची शिफारस राज्य निवडणूक आयोगाला केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सरदेसाई यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. सध्या कोरोना गोव्यातील नगरपालिका क्षेत्रात पसरू लागला आहे, त्यावर सरकारला नियंत्रण मिळविता आलेले नाही. सध्या स्थगित ठेवलेली जिल्हा पंचायत निवडणूक कधी होणार हेही सरकार निश्चित करू शकलेले नाही. अशा परिस्थितीत ऑक्टोबर महिन्यापर्यंत गोव्यातील कोविड स्थिती पूर्ण आटोक्यात आलेली असेल याची ग्वाही सरकार देऊ शकते का असा सवाल त्यांनी केला आहे.

 

पालिकांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपतो. हा कार्यकाळ संपण्यापूर्वी निवडणूक घेणे आवश्यक असले तरी आणीबाणीच्यावेळी निवडणुका पुढे ढकलता येतात असे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सूचित केलेले आहे याकडे लक्ष वेधताना कोविड असताना निवडणूक घेतल्यास उमेदवार प्रचारासाठी लोकांच्या दारात पोहोचू शकतील का असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले, गृहखात्याच्या निर्देशाप्रमाणे राजकीय एकत्रीकरणाला बंदी आहे. अशा परिस्थितीत निवडणूक कशी होऊ शकेल असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

भाजपाकडे गोव्यात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आहेत . त्यांच्या जोरावर सरकारला कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायची आहे. त्यासाठीच त्यांनी आपल्या कार्यकात्याद्वारे सगळीकडे होमिओपॅथी औषधांचे वाटप सुरू केले आहे. सध्याच्या नगरमंडळांना लोकांनी नाकारावे यासाठी सरकारी नोकरांच्या वापर करून शहरातील कचरा व्यवस्थापन कोलमडून पाडले आहे. आता लवकरच पर्यटन प्रचाराच्या नावाखाली मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा उदो उदो करण्याची मोहीम सुरू होणार असल्याचे समजते. हे सारे पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केले जाते पण हे करताना सरकार आपल्याच कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालत आहे  याची जाणीव त्यांना आहे का असा सवाल करीत या असंवेदनशील सरकारला जनताच वेळ आली की योग्य धडा शिकवेल असे त्यांनी म्हटले आहे.