शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

कोरोना महामारीत पालिका निवडणूक म्हणजे लोकांना धोक्याच्या खाईत लोटणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 16:26 IST

विजय सरदेसाई : सरकारला लोकांच्या आरोग्याचे पडून गेलेले नाही हे पुन्हा सिद्ध

मडगाव: गोव्यात कोरोना फैलावलेला असताना सरकार नगरपालिका निवडणूक घेण्याची तयारी करते ते पाहिल्यास हे सरकार जनतेला धोक्याच्या खाईत लोटू पाहते हे सिद्ध होते असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला असून आपल्या राजकीय आरोग्यापुढे या सरकारला सार्वजनिक आरोग्याचे फारसे पडून गेलेले नाही हे परत एकदा सिद्ध झाले आहे असे त्यांनी म्हटले आहे.

गोवा सरकारने ऑक्टोबर महिन्यात नगरपालिका निवडणूक घेण्याची शिफारस राज्य निवडणूक आयोगाला केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सरदेसाई यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. सध्या कोरोना गोव्यातील नगरपालिका क्षेत्रात पसरू लागला आहे, त्यावर सरकारला नियंत्रण मिळविता आलेले नाही. सध्या स्थगित ठेवलेली जिल्हा पंचायत निवडणूक कधी होणार हेही सरकार निश्चित करू शकलेले नाही. अशा परिस्थितीत ऑक्टोबर महिन्यापर्यंत गोव्यातील कोविड स्थिती पूर्ण आटोक्यात आलेली असेल याची ग्वाही सरकार देऊ शकते का असा सवाल त्यांनी केला आहे.

 

पालिकांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपतो. हा कार्यकाळ संपण्यापूर्वी निवडणूक घेणे आवश्यक असले तरी आणीबाणीच्यावेळी निवडणुका पुढे ढकलता येतात असे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सूचित केलेले आहे याकडे लक्ष वेधताना कोविड असताना निवडणूक घेतल्यास उमेदवार प्रचारासाठी लोकांच्या दारात पोहोचू शकतील का असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले, गृहखात्याच्या निर्देशाप्रमाणे राजकीय एकत्रीकरणाला बंदी आहे. अशा परिस्थितीत निवडणूक कशी होऊ शकेल असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

भाजपाकडे गोव्यात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आहेत . त्यांच्या जोरावर सरकारला कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायची आहे. त्यासाठीच त्यांनी आपल्या कार्यकात्याद्वारे सगळीकडे होमिओपॅथी औषधांचे वाटप सुरू केले आहे. सध्याच्या नगरमंडळांना लोकांनी नाकारावे यासाठी सरकारी नोकरांच्या वापर करून शहरातील कचरा व्यवस्थापन कोलमडून पाडले आहे. आता लवकरच पर्यटन प्रचाराच्या नावाखाली मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा उदो उदो करण्याची मोहीम सुरू होणार असल्याचे समजते. हे सारे पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केले जाते पण हे करताना सरकार आपल्याच कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालत आहे  याची जाणीव त्यांना आहे का असा सवाल करीत या असंवेदनशील सरकारला जनताच वेळ आली की योग्य धडा शिकवेल असे त्यांनी म्हटले आहे.