शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

कर्नाटकातील हिंसाचाराचे गोवा विधानसभेत पडसाद

By admin | Updated: July 29, 2016 17:33 IST

म्हादईच्या प्रश्नावर लवादाने दिलेल्या अंतरिम निवाड्यानंतर कर्नाटकात जो हिंसाचार उसळलेला आहे. तेथील गोमंतकीयांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. २९ : म्हादईच्या प्रश्नावर लवादाने दिलेल्या अंतरिम निवाड्यानंतर कर्नाटकात जो हिंसाचार उसळलेला आहे. तेथील गोमंतकीयांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक यांना येथून संदेश गेलेला आहे. दंडुकेशाही, दादागिरी, तोडफोड या गोष्टींना लोकशाहीत थारा नाही याची जाणीव तेथील राज्यकर्ते ठेवणार आणि कलह निर्माण करणार नाही अशी अपेक्षा आहे, असे निवेदन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी विधानसभेत केले.

आमदार रोहन खंवटे यांनी कर्नाटकातील गोवेकरांमध्ये तसेव कामा-धंद्यानिमित्त बेळगांव, धारवाडला जाणाऱ्या गोवेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. गोव्यातील लोक तेथे असुरक्षित आहेत याकडे त्यानी लक्ष वेधले व याबाबतीत सरकारने कोणती पावले उचलली आहेत, असा प्रश्न उपस्थित केला.

मुख्यमंत्री यावर उत्तर देताना म्हणाले की, कर्नाटक गोव्याचा मोठा भाऊ आहे. एकमेकांकडे आम्ही दुष्मन म्हणून पाहू शकत नाही. हिंसाचाराचे प्रकार अज्ञानातून घडत आहेत. गोवा सरकारने कर्नाटककडे जाणाऱ्या आंतरराज्य बसगाड्या घाबरुन नव्हे तर तर खबरदारी म्हणून दोन तीन दिवस बंद ठेवलेल्या आहेत. गोमंतकीय कर्नाटकात आहेत तसेच कर्नाटकचे लोकही येथे आहेत. कर्नाटकचे लोक येथे सुरक्षित आहेत. गोवेकरांना कर्नाटकात कोणताही त्रास होऊ नये आणि त्यांनी घाबरुनही जाऊ नये.