शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कामाक्षी फोरेक्स प्रकरण सीबीआयकडे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2016 16:40 IST

कोट्यावधी रुपयांच्या फसवणुकीचे कामाक्षी फोरेक्स प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात यावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने राज्य सरकारला दिला

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 24 - कोट्यावधी रुपयांच्या फसवणुकीचे कामाक्षी फोरेक्स प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात यावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे. 
सहाशेहून अधिक लोकांची 5 कोटीहून अधिक रुपयांना फसवणूक केलेलेल्या कामाक्षी फोरेक्स प्रकरणात खंडपीठाने सोमवारी अंतीम निवाडा सुनावला. राज्य पोलीसांच्या तपास पद्धतीवर नाखूश होऊन न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यासाठी सोपस्कार सुरू करण्यास सांगितले आहेत. 
या प्रकरणात फसवणूक झालेल्यांपैकी नऊ जणांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. पोलिसांच्या अार्थिक गुन्हा विभागाकडून या प्रकरणात योग्य पद्धतीने आणि योग्य गतीने तपास होत नाही, असा दावा याचिकादारांच्या वकिलाकडून करण्यात आला होता. प्रत्येक फसवणुकीच्या प्रकरणात एक तक्रार या पद्धतीने सुमारे 600 तक्रारी आणि तितकेच गुन्हे नोंदविण्यात यावेत असा दावा केला होता. या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन ते सीबीआयकडे सोपविण्यात यावे असेही याचिकेत म्हटले होते. 
या प्रकरणात अनेक सुनावण्या झाल्या होत्या. सुनावणी दरम्यान सरकारी अतिरिक्त वकिल प्रवीण फळदेसाई यांनी युक्तीवाद करताना तूर्त 9 याचिकादारांच्या मिळून 9 तक्रारींवर  9 गुन्हे आणि राज्यातर्फे एक असे एकूण दहा गुन्हे नोंदविण्यात यावेत खंडपीठाला सांगितले होते. न्यायालयाने हा युक्तीवाद विचारात घेताना तसा आदेशही दिला होता आणि या आदेशाची अंमलबजावणीही करण्यात आली होती. 
पोलिसांचा तपास समाधानकारक नसल्याचा दावा करून याचिकाकर्त्याच्या वकिलाने हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. सोमवारी झालेलया निवाड्यात न्या. एफ एम रेईश आणि नूतन सरदेसाई यांच्या खंडपीठाने हे प्रकरण सीबीआयकडे देणयात यावे असा आदेश राज्य सरकारला दिला आहे. 
दरम्यान, या प्रकरणात तपास करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्य बळ आणि इतर साधन सुविधा सीबीआयकडे नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे या प्रकरणातील  तपासासाठी सीबीआयला राज्य सरकारतर्फे आवश्यक मनुष्य बळ आणि साधन सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात असेही आदेशात म्हटले आहे.