शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
2
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
3
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
4
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
5
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
6
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
7
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
8
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
9
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
10
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
11
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
12
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
13
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
14
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
15
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
16
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
17
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
18
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
19
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
20
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 

वार्षिक अनुदान द्या!

By admin | Updated: February 9, 2015 01:12 IST

‘नीती’ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे केंद्राला साकडे : आर्थिक निकषांमुळे गोवा योजनांपासून वंचित

पणजी : गोव्याला केंद्र सरकारच्या काही योजनांचा लाभ आर्थिक निकषांमुळे किंवा अन्य कारणांमुळे घेता येत नसल्याने वार्षिक एकरकमी अनुदान स्वरूपात निधी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिल्लीत रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत केली. पार्सेकर म्हणाले की, पंतप्रधान ग्रामसडक योजनेसारख्या योजनेचा राज्याला काहीच फायदा होत नाही; कारण येथील गावागावांत रस्ते हॉटमिक्सचे आहेत. केंद्राने वार्षिक अनुदान स्वरूपात निधी दिल्यास राज्य आवश्यकतेनुसार त्याचा वापर करू शकेल. रस्ता चौपदरी असेल तर तो सहापदरी करता येईल. पूल बांधता येईल. इतर राज्यांच्या तुलनेत गोवा प्रगत असल्याने, तसेच आर्थिक निकष पार करीत असल्याने योजनांचा लाभ घेता येत नाही आणि वंचित राहावे लागते. केंद्रीय नियोजन आयोग मोडीत काढून मोदी सरकारने स्थापनलेल्या नीती आयोगाच्या प्रशासकीय मंडळाची ही पहिली बैठक होती. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या बैठकीस हजेरी लावली होती. नीती आयोगाच्या प्रशासकीय मंडळाची बैठक वर्षातून दोनदा घेण्यात यावी, अशी मागणीही पार्सेकर यांनी केली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हेही या बैठकीस उपस्थित होते. आयआयटी तूर्त फर्मागुडीला राज्यात येत्या जूनपासून आयआयटी सुरू करण्याबाबत सरकार गंभीर असून, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे सोमवारी (दि. ९) केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांची भेट घेऊन तात्पुरती व्यवस्था म्हणून फर्मागुडी येथील सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयाची जागा सुचवतील. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिल्लीहून ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, आयआयटीसाठंी तात्पुरती व्यवस्था म्हणून पेडणे येथील सरकारी महाविद्यालयाच्या इमारतीची जागा सुचविण्यात आली होती. त्यादृष्टीने तेथे विस्तारकामही चालू झाले होते; परंतु केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या तज्ज्ञ पथकाने ती जागा फेटाळल्याने आता फर्मागुडी येथे सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयाची जागा सूचविणार आहोत. खाणींना पर्यावरणीय परवान्यांसाठी पाठपुरावा संपुआ सरकारच्या कारकिर्दीत केंद्रात जयंती नटराजन पर्यावरणमंत्री असताना गोव्यातील खाणींचे पर्यावरणीय परवाने निलंबित करण्यात आले होते. राज्य सरकारने खाणींवरील निलंबन उठवले आहे. खाण व्यवसाय सुरू होणे आता केवळ पर्यावरणीय परवान्यांमुळे अडले आहे ते लवकरात लवकर दिले जावेत, अशी राज्य सरकारची मागणी आहे. पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची सोमवारी भेट ठरली होती; परंतु ते आता उपलब्ध नसल्याचे कळल्यावर त्यांच्या मंत्रालयाला राज्य सरकारतर्फे निवेदन देऊनच मुख्यमंत्री गोव्यात परतणार आहेत. (प्रतिनिधी)