शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

गोव्यात उद्या मध्यरात्री मासेमारीबंदी उठणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 17:50 IST

गोव्यात ६१ दिवसांची मच्छीमारीबंदी उद्या सोमवारी मध्यरात्री उठणार असली तरी पावसाळ्यात गावी गेलेले खलाशी अजून परतलेले नसल्याने बहुतांश ट्रॉलर्स सोमवारी किना-यावरच राहण्याची शक्यता आहे

पणजी, दि. 30 - गोव्यात ६१ दिवसांची मच्छीमारीबंदी उद्या सोमवारी मध्यरात्री उठणार असली तरी पावसाळ्यात गावी गेलेले खलाशी अजून परतलेले नसल्याने बहुतांश ट्रॉलर्स सोमवारी किना-यावरच राहण्याची शक्यता आहे. मालिम जेट्टीवरील बहुतांश खलाशी अजून फिरकलेले नाहीत, त्यामुळे खरा मोसम दहा ते पंधरा दिवसांनीच सुरू होणार आहे. मांडवी फिशरमेन्स को. ऑप सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा ट्रॉलरमालक मिनीन आफोंसो म्हणाले की, पावसाळ्यात गावी गेलेले ओडिशा, झारखंड, कर्नाटकचे खलाशी अजून परतलेले नाहीत, त्यांना आणखी पंधरवडा तरी जाईल. यंदा या खलाशांच्या गावात उशिरा पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे त्यांची शेतीची कामे अजून पूर्ण झालेली नाहीत. ती पूर्ण झाल्यानंतरच येणार असल्याचा निरोप काही खलाशांनी दिला आहे. मिनीन म्हणाले की, समुद्रात मासेमारीसाठी जाण्याकरिता अत्यंत चांगले हवामाने आहे, परंतु खलाशी गावाहून परतलेले नाहीत. मालिम जेटी ही गोव्यातील सर्वात मोठी मच्छिमारी जेट्टी असून, येथे ३२0 ट्रॉलर्स आहेत. खलाशांअभावी ९५ टक्के ट्रॉलर्स सोमवारी किना-यावरच राहतील. अवघ्या १0 ते १५ ट्रॉलर्सनीच मासेमारीसाठी जाण्याची सज्जता केली आहे. गोव्यात ट्रॉलर्सवर परराज्यातील खलाशांचा भरणा आहे. मान्सून सुरू होण्याआधी ट्रॉलर्स किना-यांवर आणले की हे खलाशी आपापल्या गावी जातात आणि ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यानंतरच परततात. खलाशांची समस्या ही ट्रॉलरमालकांसाठी नेहमीचीच झालेली आहे. त्यामुळे कायद्याने ३१ जुलै रोजी मासेमारीवरील बंदी उठली तरी प्रत्यक्ष मासेमारीला नारळी पौर्णिमेनंतरच वेग येतो. शेजारी महाराष्ट्र, कर्नाटकमधून बंदीकाळातही ट्रॉलर्स गोव्याच्या सागरी हद्दीत येतात आणि मच्छीमारी करतात, असा आरोप स्थानिक मच्छीमारांकडून नेहमीच केला जातो, त्यामुळे या शेजारी राज्यांमध्येही मासेमारी बंदीचा काळ समान असावा, अशी मागणी आहे.