शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
2
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
3
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
4
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
5
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
6
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
7
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
8
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
9
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
10
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
11
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
12
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
13
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
14
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
15
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
16
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
17
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
18
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
19
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
20
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका

मिशन बायपाससाठी मोर्चा

By admin | Updated: May 28, 2016 02:37 IST

पणजी : खनिज वाहतुकीमुळे केपे, सांगे भागात अपघातांचे सत्र सुरूच झाल्याने २०१२ साली उगे येथे तत्कालीन मुख्यमंत्री

पणजी : खनिज वाहतुकीमुळे केपे, सांगे भागात अपघातांचे सत्र सुरूच झाल्याने २०१२ साली उगे येथे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पायाभरणी केलेल्या बगलरस्त्याचे काम पूर्ण करावे, या मागणीसाठी केपे व सांगेतील नागरिकांनी शुक्रवारी येथे मोर्चा काढला. त्यानंतर आझाद मैदानावर झालेल्या सभेत खनिज व्यवसायप्रश्नी गोवा फाउंडेशनने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेत मिशन बायपासच्या वतीने येत्या दोन आठवड्यांत हस्तक्षेप याचिका सादर करण्यात येईल, असा इशारा या वेळी आंदोलकांनी दिला. २०१२ मध्ये उगे येथे खनिज व्यवसायासाठी वेगळ्या बगलरस्त्याची पायाभरणी केली होती. सुमारे अर्धा किलोमीटर रस्ता बांधण्यात आला होता. मात्र, नंतर ते काम तसेच ठेवण्यात आले. त्या पायभरणीच्या दगडाच्या प्रतिमेला आंदोलकांनी फुलांचा हार घालून श्रध्दांजली वाहिली. तसेच पणजी बसस्थानक ते आझाद मैदानपर्यंत मोर्चा काढला. या मोर्चात महिला व लहान मुलेही सहभागी झाली होती. आंदोलकांनी या वेळी ‘विकास नाका हाय क्लास, पयली करात बायपास’ अशा घोषणा दिल्या. या वेळी इतिहासतज्ज्ञ प्रजल साखरदांडे, शिक्षक मिनिन फर्नांडिस, मिशन बायपासचे निमंत्रक प्रदीप काकोडकर आदी मान्यवर उपस्थित होते. २००८ पासून आम्ही हे मिशन बायपास आंदोलन छेडले आहे. आतापर्यंत सरकारला भरपूर मुदत दिली आहे. आता आणखी थांबणार नाही, असे प्रदीप काकोडकर यांनी सांगितले. शेकडो लोकांचा बळी या खनिज वाहतुकीमुळे गेला आहे. खनिज व्यवसाय सुरू करण्यापूर्वी सरकारने पूरक साधनसुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत. हे सरकार फक्त खजिन व्यावसायिक लॉबीचाच विचार करत आहे, असा आरोप त्यांनी केला. हा बगलरस्ता लोकांच्या पैशातून नव्हे तर खनिज व्यावसायिकांकडून पैसे घेऊन बांधण्यात यावा. नाही तर या रस्त्यासाठी खनिज वाहतूक करणाऱ्यांना टोल लावून निधी उभा करावा, असे काकोडकर म्हणाले. सरकारची आशा वाढली असून या सरकारला फक्त खनिज व्यावसायिकांचे पडले आहे. सामान्य लोकांचा विचार हे सरकार करीत नाही. किती तरी लोकांचे प्राण या वाहतुकीमुळे गेले आहेत. मात्र, सरकारला लोकांच्या जीवनाचे पडलेले नाही. आमची सहनशीलता संपली असून आम्ही आणखी बळी जाऊ देणार नाही, असे काकोडकर यांनी सांगितले. आणखी किती मरणांची हे सरकार वाट बघणार, असा प्रश्न मार्टिन्स फर्नांडिस यांनी केला. लोकांचे प्राण आणखी संकटात न टाकता या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)