शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मिशन बायपाससाठी मोर्चा

By admin | Updated: May 28, 2016 02:37 IST

पणजी : खनिज वाहतुकीमुळे केपे, सांगे भागात अपघातांचे सत्र सुरूच झाल्याने २०१२ साली उगे येथे तत्कालीन मुख्यमंत्री

पणजी : खनिज वाहतुकीमुळे केपे, सांगे भागात अपघातांचे सत्र सुरूच झाल्याने २०१२ साली उगे येथे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पायाभरणी केलेल्या बगलरस्त्याचे काम पूर्ण करावे, या मागणीसाठी केपे व सांगेतील नागरिकांनी शुक्रवारी येथे मोर्चा काढला. त्यानंतर आझाद मैदानावर झालेल्या सभेत खनिज व्यवसायप्रश्नी गोवा फाउंडेशनने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेत मिशन बायपासच्या वतीने येत्या दोन आठवड्यांत हस्तक्षेप याचिका सादर करण्यात येईल, असा इशारा या वेळी आंदोलकांनी दिला. २०१२ मध्ये उगे येथे खनिज व्यवसायासाठी वेगळ्या बगलरस्त्याची पायाभरणी केली होती. सुमारे अर्धा किलोमीटर रस्ता बांधण्यात आला होता. मात्र, नंतर ते काम तसेच ठेवण्यात आले. त्या पायभरणीच्या दगडाच्या प्रतिमेला आंदोलकांनी फुलांचा हार घालून श्रध्दांजली वाहिली. तसेच पणजी बसस्थानक ते आझाद मैदानपर्यंत मोर्चा काढला. या मोर्चात महिला व लहान मुलेही सहभागी झाली होती. आंदोलकांनी या वेळी ‘विकास नाका हाय क्लास, पयली करात बायपास’ अशा घोषणा दिल्या. या वेळी इतिहासतज्ज्ञ प्रजल साखरदांडे, शिक्षक मिनिन फर्नांडिस, मिशन बायपासचे निमंत्रक प्रदीप काकोडकर आदी मान्यवर उपस्थित होते. २००८ पासून आम्ही हे मिशन बायपास आंदोलन छेडले आहे. आतापर्यंत सरकारला भरपूर मुदत दिली आहे. आता आणखी थांबणार नाही, असे प्रदीप काकोडकर यांनी सांगितले. शेकडो लोकांचा बळी या खनिज वाहतुकीमुळे गेला आहे. खनिज व्यवसाय सुरू करण्यापूर्वी सरकारने पूरक साधनसुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत. हे सरकार फक्त खजिन व्यावसायिक लॉबीचाच विचार करत आहे, असा आरोप त्यांनी केला. हा बगलरस्ता लोकांच्या पैशातून नव्हे तर खनिज व्यावसायिकांकडून पैसे घेऊन बांधण्यात यावा. नाही तर या रस्त्यासाठी खनिज वाहतूक करणाऱ्यांना टोल लावून निधी उभा करावा, असे काकोडकर म्हणाले. सरकारची आशा वाढली असून या सरकारला फक्त खनिज व्यावसायिकांचे पडले आहे. सामान्य लोकांचा विचार हे सरकार करीत नाही. किती तरी लोकांचे प्राण या वाहतुकीमुळे गेले आहेत. मात्र, सरकारला लोकांच्या जीवनाचे पडलेले नाही. आमची सहनशीलता संपली असून आम्ही आणखी बळी जाऊ देणार नाही, असे काकोडकर यांनी सांगितले. आणखी किती मरणांची हे सरकार वाट बघणार, असा प्रश्न मार्टिन्स फर्नांडिस यांनी केला. लोकांचे प्राण आणखी संकटात न टाकता या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)