शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

मिशन बायपाससाठी मोर्चा

By admin | Updated: May 28, 2016 02:37 IST

पणजी : खनिज वाहतुकीमुळे केपे, सांगे भागात अपघातांचे सत्र सुरूच झाल्याने २०१२ साली उगे येथे तत्कालीन मुख्यमंत्री

पणजी : खनिज वाहतुकीमुळे केपे, सांगे भागात अपघातांचे सत्र सुरूच झाल्याने २०१२ साली उगे येथे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पायाभरणी केलेल्या बगलरस्त्याचे काम पूर्ण करावे, या मागणीसाठी केपे व सांगेतील नागरिकांनी शुक्रवारी येथे मोर्चा काढला. त्यानंतर आझाद मैदानावर झालेल्या सभेत खनिज व्यवसायप्रश्नी गोवा फाउंडेशनने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेत मिशन बायपासच्या वतीने येत्या दोन आठवड्यांत हस्तक्षेप याचिका सादर करण्यात येईल, असा इशारा या वेळी आंदोलकांनी दिला. २०१२ मध्ये उगे येथे खनिज व्यवसायासाठी वेगळ्या बगलरस्त्याची पायाभरणी केली होती. सुमारे अर्धा किलोमीटर रस्ता बांधण्यात आला होता. मात्र, नंतर ते काम तसेच ठेवण्यात आले. त्या पायभरणीच्या दगडाच्या प्रतिमेला आंदोलकांनी फुलांचा हार घालून श्रध्दांजली वाहिली. तसेच पणजी बसस्थानक ते आझाद मैदानपर्यंत मोर्चा काढला. या मोर्चात महिला व लहान मुलेही सहभागी झाली होती. आंदोलकांनी या वेळी ‘विकास नाका हाय क्लास, पयली करात बायपास’ अशा घोषणा दिल्या. या वेळी इतिहासतज्ज्ञ प्रजल साखरदांडे, शिक्षक मिनिन फर्नांडिस, मिशन बायपासचे निमंत्रक प्रदीप काकोडकर आदी मान्यवर उपस्थित होते. २००८ पासून आम्ही हे मिशन बायपास आंदोलन छेडले आहे. आतापर्यंत सरकारला भरपूर मुदत दिली आहे. आता आणखी थांबणार नाही, असे प्रदीप काकोडकर यांनी सांगितले. शेकडो लोकांचा बळी या खनिज वाहतुकीमुळे गेला आहे. खनिज व्यवसाय सुरू करण्यापूर्वी सरकारने पूरक साधनसुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत. हे सरकार फक्त खजिन व्यावसायिक लॉबीचाच विचार करत आहे, असा आरोप त्यांनी केला. हा बगलरस्ता लोकांच्या पैशातून नव्हे तर खनिज व्यावसायिकांकडून पैसे घेऊन बांधण्यात यावा. नाही तर या रस्त्यासाठी खनिज वाहतूक करणाऱ्यांना टोल लावून निधी उभा करावा, असे काकोडकर म्हणाले. सरकारची आशा वाढली असून या सरकारला फक्त खनिज व्यावसायिकांचे पडले आहे. सामान्य लोकांचा विचार हे सरकार करीत नाही. किती तरी लोकांचे प्राण या वाहतुकीमुळे गेले आहेत. मात्र, सरकारला लोकांच्या जीवनाचे पडलेले नाही. आमची सहनशीलता संपली असून आम्ही आणखी बळी जाऊ देणार नाही, असे काकोडकर यांनी सांगितले. आणखी किती मरणांची हे सरकार वाट बघणार, असा प्रश्न मार्टिन्स फर्नांडिस यांनी केला. लोकांचे प्राण आणखी संकटात न टाकता या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)