शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना तब्बल १९ वर्षांनंतर मिळाला न्याय

By admin | Updated: March 6, 2017 19:59 IST

सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवण्यासाठी वर्षांनुवर्षे द्याव्या लागणाऱ्या लढ्याच्या हजारो कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. पण एका राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनाही

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 6 - भारतीय न्यायव्यवस्थेत सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवण्यासाठी वर्षांनुवर्षे द्याव्या लागणाऱ्या लढ्याच्या हजारो कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. पण  एका राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनाही न्याय मिळवण्यासाठी तब्बल 19 वर्षे न्यायालयीन लढा द्यावा लागल्याचे सांगिल्यास त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण अशी एक घटना समोर आली आहे. विधानसभेत जुलै १९९८ मध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकूनही मुख्यमंत्रिपद सोडावे लागलेले गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांना तब्बल १९ वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळाला. तत्कालीन राज्यपाल जे. एफ. आर. जेकब यांनी राणे यांचे सरकार बरखास्त करून डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा केला होता. या बाबतीत राज्यपालांचा निर्णय अंतिम असू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी त्या वेळी काँग्रेसमध्ये फूट पाडून राणे यांचे सरकार अल्पमतात आणले, तेव्हा राणे यांना विश्वासदर्शक ठराव घेणे भाग पडले. हा ठराव ते जिंकलेही; परंतु त्याने राज्यपालांचे समाधान झाले नाही. त्यांनी राणे यांना हटवून विली यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याचा मार्ग सुकर केला होता. राज्यपालांच्या या कृतीला राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. उच्चन्यायालयाने राज्यपालांचा निर्णय कायम ठेवला. घटनेच्या कलम १६३ (२) अन्वये राज्यपालांनी वापरलेले अधिकार अंतिम असून न्यायालयाला त्यात हस्तक्षेप करता येणार नाही, असे उच्चन्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथे अनेक वर्षे हा खटला चालला. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी मुख्यमंत्र्यांकडे आमदारांचे पुरेसे संख्याबळ असल्यास आणि राज्यपालांनी त्यांचे सरकार बरखास्त केले तर त्यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याची गरज नाही. घटनेच्या कलमातील तरतुदींच्या कक्षेबाहेर जात राज्यपालांनी अधिकारांचा वापर केला तर त्यात हस्तक्षेपाचा किंवा फेरविचार करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने निवाड्यात म्हटले आहे. (प्रतिनिधी)