शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना तब्बल १९ वर्षांनंतर मिळाला न्याय

By admin | Updated: March 6, 2017 19:59 IST

सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवण्यासाठी वर्षांनुवर्षे द्याव्या लागणाऱ्या लढ्याच्या हजारो कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. पण एका राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनाही

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 6 - भारतीय न्यायव्यवस्थेत सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवण्यासाठी वर्षांनुवर्षे द्याव्या लागणाऱ्या लढ्याच्या हजारो कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. पण  एका राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनाही न्याय मिळवण्यासाठी तब्बल 19 वर्षे न्यायालयीन लढा द्यावा लागल्याचे सांगिल्यास त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण अशी एक घटना समोर आली आहे. विधानसभेत जुलै १९९८ मध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकूनही मुख्यमंत्रिपद सोडावे लागलेले गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांना तब्बल १९ वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळाला. तत्कालीन राज्यपाल जे. एफ. आर. जेकब यांनी राणे यांचे सरकार बरखास्त करून डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा केला होता. या बाबतीत राज्यपालांचा निर्णय अंतिम असू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी त्या वेळी काँग्रेसमध्ये फूट पाडून राणे यांचे सरकार अल्पमतात आणले, तेव्हा राणे यांना विश्वासदर्शक ठराव घेणे भाग पडले. हा ठराव ते जिंकलेही; परंतु त्याने राज्यपालांचे समाधान झाले नाही. त्यांनी राणे यांना हटवून विली यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याचा मार्ग सुकर केला होता. राज्यपालांच्या या कृतीला राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. उच्चन्यायालयाने राज्यपालांचा निर्णय कायम ठेवला. घटनेच्या कलम १६३ (२) अन्वये राज्यपालांनी वापरलेले अधिकार अंतिम असून न्यायालयाला त्यात हस्तक्षेप करता येणार नाही, असे उच्चन्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथे अनेक वर्षे हा खटला चालला. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी मुख्यमंत्र्यांकडे आमदारांचे पुरेसे संख्याबळ असल्यास आणि राज्यपालांनी त्यांचे सरकार बरखास्त केले तर त्यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याची गरज नाही. घटनेच्या कलमातील तरतुदींच्या कक्षेबाहेर जात राज्यपालांनी अधिकारांचा वापर केला तर त्यात हस्तक्षेपाचा किंवा फेरविचार करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने निवाड्यात म्हटले आहे. (प्रतिनिधी)