शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

सागरमाला अंतर्गत राज्यात ४० प्रकल्पांसाठी पाच हजार काेटी मंजूर

By समीर नाईक | Updated: August 25, 2023 22:31 IST

गोवा हे तीन्ही बाजूने समुद्राने घेरलेले आहे, त्यामुळे सागरमाला योजना राज्यासाठी सर्वाधिक फायदेशीर ठरणार आहे

पणजी: गोव्यासाठी सागरमाला अंतर्गत ४० प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे पाच हजार कोटी रुपये केंद्रातर्फे मंजूर करण्यात आले आहे. या व्यतिरीक्त राज्यात इतर काही प्रकल्पांची निवडही करण्यात आली आहे, यासाठी सुमारे ५० हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती बंदरे मंत्री आणि जलमार्ग मंत्रालयाचे सल्लागार एच.एन अस्वथ यांनी दिली.

जागतिक सागरी भारतीय परिषदे २०२३च्या पार्श्वभूमीवर रोड शो चे आयोजन मिरामार येथे आयोजन करण्यात आले होते, यावेळी एच.एन अस्वथ बोलत होते.

सागरमाला अंतर्गत जेट्टी, बंदरे, कार्गो वेसल्स, फेरीबोट, जहाज बांधणी यासारख्या गोष्टींचा विकास करण्यात येणार आहे, तसेच यातून समुद्री जीवांचाही अभ्यास करण्यावर, नविन नविन गोष्टी शोधण्याचाही समावेश असणार आहे. एकंदरीत राज्यातील जलमार्ग सुधारणा आहे, त्याचप्रमाणे सागरमाला योजनेमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे, असे अस्वथ यांनी यावेळी पूढे सांगितले.

गोवा हे तीन्ही बाजूने समुद्राने घेरलेले आहे, त्यामुळे सागरमाला योजना राज्यासाठी सर्वाधिक फायदेशीर ठरणार आहे. राज्यातील मासेमारी व्यावसायावर जगणाऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राला ही योजना राबविण्यास मदत करावी. आर्थिकरित्या केंद्र सरकारच खर्च करणार आहे, परंतु आवश्यक परवानगी राज्य सरकारनेच देणे आवश्यक आहे. त्यामुळे ही योजना सफल होण्यासाठी केंद्रासोबत राज्य सरकारचा देखील पाठींबा हवा आहे, असेही अस्वथ यांनी अधिक माहिती देताना सांगितले.