शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

सागरमाला अंतर्गत राज्यात ४० प्रकल्पांसाठी पाच हजार काेटी मंजूर

By समीर नाईक | Updated: August 25, 2023 22:31 IST

गोवा हे तीन्ही बाजूने समुद्राने घेरलेले आहे, त्यामुळे सागरमाला योजना राज्यासाठी सर्वाधिक फायदेशीर ठरणार आहे

पणजी: गोव्यासाठी सागरमाला अंतर्गत ४० प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे पाच हजार कोटी रुपये केंद्रातर्फे मंजूर करण्यात आले आहे. या व्यतिरीक्त राज्यात इतर काही प्रकल्पांची निवडही करण्यात आली आहे, यासाठी सुमारे ५० हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती बंदरे मंत्री आणि जलमार्ग मंत्रालयाचे सल्लागार एच.एन अस्वथ यांनी दिली.

जागतिक सागरी भारतीय परिषदे २०२३च्या पार्श्वभूमीवर रोड शो चे आयोजन मिरामार येथे आयोजन करण्यात आले होते, यावेळी एच.एन अस्वथ बोलत होते.

सागरमाला अंतर्गत जेट्टी, बंदरे, कार्गो वेसल्स, फेरीबोट, जहाज बांधणी यासारख्या गोष्टींचा विकास करण्यात येणार आहे, तसेच यातून समुद्री जीवांचाही अभ्यास करण्यावर, नविन नविन गोष्टी शोधण्याचाही समावेश असणार आहे. एकंदरीत राज्यातील जलमार्ग सुधारणा आहे, त्याचप्रमाणे सागरमाला योजनेमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे, असे अस्वथ यांनी यावेळी पूढे सांगितले.

गोवा हे तीन्ही बाजूने समुद्राने घेरलेले आहे, त्यामुळे सागरमाला योजना राज्यासाठी सर्वाधिक फायदेशीर ठरणार आहे. राज्यातील मासेमारी व्यावसायावर जगणाऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राला ही योजना राबविण्यास मदत करावी. आर्थिकरित्या केंद्र सरकारच खर्च करणार आहे, परंतु आवश्यक परवानगी राज्य सरकारनेच देणे आवश्यक आहे. त्यामुळे ही योजना सफल होण्यासाठी केंद्रासोबत राज्य सरकारचा देखील पाठींबा हवा आहे, असेही अस्वथ यांनी अधिक माहिती देताना सांगितले.