शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

सर्वात मोठ्या पक्षास प्रथम संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2017 01:45 IST

पणजी : येत्या ११ मार्च रोजी गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. त्रिशंकू विधानसभा जर अस्तित्वात आली, तर राज्यपालांची

सर्वात मोठ्या पक्षास प्रथम संधीसद्गुरू पाटील ल्ल पणजीयेत्या ११ मार्च रोजी गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. त्रिशंकू विधानसभा जर अस्तित्वात आली, तर राज्यपालांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरेल. त्रिशंकू स्थितीत सरकार स्थापनेसाठी बोलविण्याची प्रथम संधी ही सर्वात मोठ्या ठरणाऱ्या पक्षास द्यावी लागते. तसा कायदा नसला तरी, १९९६ सालापासून तशी प्रथा असून अजून तरी तशी प्रथा कुणी राज्यपालांनी किंवा राष्ट्रपतींनीही मोडलेली नाही.गोव्यात कुठल्याच राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, त्रिशंकू विधानसभाच अस्तित्वात येईल, असा प्राथमिक अंदाज काही अभ्यासक व जाणकार काढत आहेत. मात्र, आपल्याला बावीस-तेवीस जागा मिळतील असा भाजपच्या नेत्यांना विश्वास आहे. भाजपला किंवा काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले तर, समस्याच येणार नाही; पण त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली तर, भाजप व काँग्रेस हे दोन्ही पक्ष सरकार स्थापन करण्यासाठी विविध पद्धतीने प्रयत्न करतील. मग अपक्षांचेही मोल वाढेल व छोट्या प्रादेशिक पक्षांचाही भाव वाढेल. त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येते तेव्हा राज्यपालांनी सर्वात मोठ्या पक्षालाच सरकार स्थापनेसाठी प्रथम बोलवायला हवे, अशी सक्ती नाही, असे काही वकिलांचे म्हणणे आहे. जो पक्ष बहुमत सिद्ध करील, असे राज्यपालांना वाटते त्या पक्षाला राज्यपाल प्रथम निमंत्रण देऊ शकतात, असा दावा काहीजणांकडून केला जातो.माजी केंद्रीय कायदा मंत्री तथा कायद्याचे अनुभवी अभ्यासक अ‍ॅड. रमाकांत खलप यांचे म्हणणे मात्र वेगळे आहे. खलप हे मे १९९६ मध्ये अस्तित्वात आलेल्या अकराव्या लोकसभेचे सदस्य होते. ती अकरावी लोकसभा त्रिशंकू होती. कुणालाच त्या वेळी स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. खलप सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, की ९६ साली त्यावेळचे भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन आपल्याला सरकार स्थापनेसाठी बोलवावे; कारण आपल्या पक्षाचे सर्वात जास्त खासदार निवडून आलेले आहेत, असा दावा केला होता. आपण बहुमत सिद्ध करू शकतो, असेही वाजपेयी त्या वेळी म्हणाले होते. भाजपला त्या वेळी निवडणुकीत बहुमत मिळाले नव्हते; पण तो पक्ष सर्वात मोठा ठरला होता. त्या वेळी राष्ट्रपतींनी पहिली संधी वाजपेयी यांना दिली होती; पण वाजपेयी संसदेत बहुमत सिद्ध करू शकले नव्हते हा वेगळा मुद्दा झाला.खलप म्हणाले, की आपले व्यक्तिगत मत असे की, गोव्यात भाजपला बारापेक्षा जास्त जागा मिळू शकणार नाहीत. काँग्रेसला पंधरा किंवा सोळा जागा मिळतील असा आपला प्राथमिक निष्कर्ष आहे.