शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

दाभोळकरांसारख्या हिंदुद्वेष्ट्यांशी लढा सुरूच

By admin | Updated: June 21, 2014 01:45 IST

फोंडा : डॉ. नरेंद्र दाभोळकर हिंदुद्वेष्टे होते. त्यांच्या हत्येच्या प्रकरणात सनातनच्या साधकांना गोवण्याचा प्रयत्न झाला. दाभोळकरांप्रमाणेच हिंदुद्वेष्ट्या असलेल्या

फोंडा : डॉ. नरेंद्र दाभोळकर हिंदुद्वेष्टे होते. त्यांच्या हत्येच्या प्रकरणात सनातनच्या साधकांना गोवण्याचा प्रयत्न झाला. दाभोळकरांप्रमाणेच हिंदुद्वेष्ट्या असलेल्या तिस्ता सेटलवाड, कमल पारोखी तसेच असगर अली इंजिनिअर यांच्याविरुद्धचा लढा सुरूच राहील, असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी रामनाथी येथे शुक्रवारी केले. हिंदू जनजागृती समितीतर्फे गोव्यात रामनाथी येथे आयोजिलेल्या तिसऱ्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर भारत सेवाश्रम संघाचे बंगाल व झारखंड प्रमुख स्वामी प्रदीप्तानंद महाराज, सांगली येथील ईश्वरबुवा रामदासी, खंडवा (मध्य प्रदेश) येथील गोरक्षा अभियानप्रमुख १0५ प्रयत्न सागरजी महाराज, तरुण हिंदू संघटना-झारखंडचे नील माधव दास, तसेच सुदर्शन या हिंदी वृत्तवाहिनीचे संचालक सुरेश चव्हाण उपस्थित होते. गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय स्तरावरील निवडणूक प्रचारात हिंदू राष्ट्राचा विषय येत नसल्याबद्दल डॉ. पिंगळे यांनी खेद व्यक्त केला. देशात नुकतेच झालेले सत्तांतर हे हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी पूरक नसल्याचे पिंगळे यांनी सांगितले. ते म्हणाले, देशातील हिंदू संतांची विविध प्रकारे गळचेपी सुरू आहे. करोडो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या आसाराम बापू, जयेंद्र सरस्वती, स्वामी नित्यानंदजी यासारख्या संतांवर लांच्छनास्पद आरोप केले जात आहेत. तरुण हिंदू संघटना-झारखंडचे नील माधव दास यांनी भारतात धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंचा छळ तर मुसलमानांचे लांगूलचालन होत असल्याचा आरोप केला. संपूर्ण जगभरात मुसलमान ही समस्या बनली असताना भारतात मात्र धर्मनिरपेक्षतावादी राजकारण्यांसाठी मुसलमान ही संपत्ती बनली आहे. राजकीय स्वार्थापोटी या मुसलमानांचे चोचले पुरविले जात आहेत. हे सर्व थांबवण्यासाठी हिंदू राष्ट्राची स्थापना होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. स्वामी प्रदीप्तानंद, ईश्वरबुवा रामदासी, १0५ प्रयत्न सागरजी महाराज यांनीही हिंदू राष्ट्र स्थापनेच्या मुद्द्याच्या आधारे मार्गदर्शन केले. तत्पूर्वी शंखनाद आणि मंत्रपठणाने अधिवेशनाची सुरुवात झाली. स्वामी प्रदीप्तानंद यांच्या हस्ते अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच सनातन निर्मित गीतादर्शन आणि बालसंस्कार ग्रंथमालेतील बोधकथा या नूतन ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन विनायक शानभाग आणि अभिजित देशमुख यांनी केले. सहा दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात बांगलादेशातून होणारी घुसखोरी, धर्मांतर, गोहत्या, लव्ह जिहाद, संस्कृती रक्षण, मंदिर रक्षण, हिंदूंमधील धर्मजागृती, हिंदू धर्माचा जगभर प्रसार, विदेशस्थित हिंदूंचे रक्षण यांसारख्या समस्यांवर चर्चा होणार आहे. या समस्यांच्या निवारणासाठी समान कृती कार्यक्रमही निश्चित केला जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)