शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

राज्यात पंधरा नवे उद्योग मंजूर; १८९४ नोकऱ्या देणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2024 13:23 IST

मुक्तिदिन सोहळ्यात हुतात्म्यांना आदरांजली

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सांगे येथे कुणबी ग्रामचे काम सुरू झाले आहे. १० कोटी रुपये त्यावर खर्च केले जातील. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने राज्यात आणखी १५ उद्योग मंजूर केले असून त्याद्वारे १,८९४ नोकऱ्या निर्माण होतील, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केले.

गोवा विद्यापीठाच्या मैदानावर गुरुवारी आयोजित ६३ व्या मुक्तिदिनाच्या सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध पदके बहाल करण्यात आली. कार्यक्रमास वीजमंत्री सुदिन ढवळीकर, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, आमदार जेनिफर मोन्सेरात, आमदार रुडॉल्फ फर्नाडिस, मुख्य सचिव व्ही. कांडावेलू, प्रशासनातील सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, नव्या पंधरा उद्योगांमधून राज्यात १,४५९ कोटी रुपयांची गुंतवणूक येईल. 'हर घर नल से जल' योजना तसेच विद्युतीकरण, हर ग्राम सडक व हर घर शौचालय योजना शंभर टक्के राबविणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. राज्यातील सर्व आयटीआयना आयएसओ प्रमाणपत्र मिळाल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. पुढील वर्षांपर्यंत १७ हजार 'लखपती दीदी' तयार करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. पाच हजार सेल्फ हेल्प ग्रुप असून तब्बल ५० हजार महिला जोडल्या गेल्या आहेत. 'लखपती दीदींची' संख्या सध्या आठ ते दहा हजार असून ती १७ हजारपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

कार्यक्रमाआधी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकडून मानवंदना स्वीकारली. डीजीपी अलोक कुमार व परेड कमांडंट अधीक्षक विश्वेश कर्पे मुख्यमंत्र्यांसोबत वाहनात होते. शाळकरी विद्यार्थ्यांनीही यावेळी मानवंदना दिली.

'हर घर नल' योजनेखाली ४० टक्के जनतेला मोफत पाणी मिळत आहे. मत्स्यसंपदा योजनेचा ५०० हून अधिक मच्छीमारांना लाभ झाला आहे. राज्यात १,१३० कोटींची भूमिगत वीजवहिन्यांची कामे सुरू आहेत.

कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी ४ जी बीएसएनएल टॉवरचे जाळे विणले जात आहे. यंदा 'आयपीबी'कडून १,०५९ कोटींच्या १५ प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून, त्यातून १,८९४ जणांना रोजगार मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

१० वर्षे आधी विकसित गोवाचे उद्दिष्ट साध्य करू 

ग्रामीण भागातही ४-जी नेटवर्क टॉवरमुळे कनेक्टिव्हिटीची समस्या दूर झाली आहे. भारत संचार निगमच्या सहकायनि टॉवर उभारले जात आहेत. माझे सरकार २०३७ पर्यंत 'विकसित गोवा'चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काम करत आहे. 'विकासित भारत २०४७' उद्दिष्टाच्या १० वर्षे आधीच आम्ही हे लक्ष्य पूर्ण करणार आहोत. डबल इंजिन सरकारमुळेच विकास शक्य झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत