शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

राज्यात पंधरा नवे उद्योग मंजूर; १८९४ नोकऱ्या देणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2024 13:23 IST

मुक्तिदिन सोहळ्यात हुतात्म्यांना आदरांजली

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सांगे येथे कुणबी ग्रामचे काम सुरू झाले आहे. १० कोटी रुपये त्यावर खर्च केले जातील. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने राज्यात आणखी १५ उद्योग मंजूर केले असून त्याद्वारे १,८९४ नोकऱ्या निर्माण होतील, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केले.

गोवा विद्यापीठाच्या मैदानावर गुरुवारी आयोजित ६३ व्या मुक्तिदिनाच्या सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध पदके बहाल करण्यात आली. कार्यक्रमास वीजमंत्री सुदिन ढवळीकर, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, आमदार जेनिफर मोन्सेरात, आमदार रुडॉल्फ फर्नाडिस, मुख्य सचिव व्ही. कांडावेलू, प्रशासनातील सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, नव्या पंधरा उद्योगांमधून राज्यात १,४५९ कोटी रुपयांची गुंतवणूक येईल. 'हर घर नल से जल' योजना तसेच विद्युतीकरण, हर ग्राम सडक व हर घर शौचालय योजना शंभर टक्के राबविणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. राज्यातील सर्व आयटीआयना आयएसओ प्रमाणपत्र मिळाल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. पुढील वर्षांपर्यंत १७ हजार 'लखपती दीदी' तयार करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. पाच हजार सेल्फ हेल्प ग्रुप असून तब्बल ५० हजार महिला जोडल्या गेल्या आहेत. 'लखपती दीदींची' संख्या सध्या आठ ते दहा हजार असून ती १७ हजारपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

कार्यक्रमाआधी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकडून मानवंदना स्वीकारली. डीजीपी अलोक कुमार व परेड कमांडंट अधीक्षक विश्वेश कर्पे मुख्यमंत्र्यांसोबत वाहनात होते. शाळकरी विद्यार्थ्यांनीही यावेळी मानवंदना दिली.

'हर घर नल' योजनेखाली ४० टक्के जनतेला मोफत पाणी मिळत आहे. मत्स्यसंपदा योजनेचा ५०० हून अधिक मच्छीमारांना लाभ झाला आहे. राज्यात १,१३० कोटींची भूमिगत वीजवहिन्यांची कामे सुरू आहेत.

कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी ४ जी बीएसएनएल टॉवरचे जाळे विणले जात आहे. यंदा 'आयपीबी'कडून १,०५९ कोटींच्या १५ प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून, त्यातून १,८९४ जणांना रोजगार मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

१० वर्षे आधी विकसित गोवाचे उद्दिष्ट साध्य करू 

ग्रामीण भागातही ४-जी नेटवर्क टॉवरमुळे कनेक्टिव्हिटीची समस्या दूर झाली आहे. भारत संचार निगमच्या सहकायनि टॉवर उभारले जात आहेत. माझे सरकार २०३७ पर्यंत 'विकसित गोवा'चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काम करत आहे. 'विकासित भारत २०४७' उद्दिष्टाच्या १० वर्षे आधीच आम्ही हे लक्ष्य पूर्ण करणार आहोत. डबल इंजिन सरकारमुळेच विकास शक्य झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत