शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मंत्री मांद्रेकरांची भीती व्यर्थ

By admin | Updated: May 28, 2016 02:44 IST

पणजी : सांस्कृतिक ग्रेस मार्कांच्या बाबतीत कला व संस्कृतीमंत्री दयानंद मांद्रेकर यांनी केलेले विधान वादाचा विषय ठरले आहे.

पणजी : सांस्कृतिक ग्रेस मार्कांच्या बाबतीत कला व संस्कृतीमंत्री दयानंद मांद्रेकर यांनी केलेले विधान वादाचा विषय ठरले आहे. निकाल जास्त लागणार आणि अ‍ॅडमिशनच्या अडचणी आणखी वाढणार, ही त्यांची भीती व्यर्थ आहे. तसेच सर्वांना शिक्षण ही संकल्पना पुढे न्यायची असेल तर शिक्षणाच्या सुविधा वाढल्या पाहिजेत, असे मत व्यक्त केले जात आहे. शिक्षणतज्ज्ञ नारायण देसाई म्हणाले की, प्रत्येकाला शिक्षण मिळावे यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करणे ही सरकारची जबाबदारी आहे तेथे हात झटकून चालणार नाही. शिक्षणविषयक जे राष्ट्रीय धोरण आहे त्यात विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्याचा अंतर्भाव आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी नैसर्गिक गुण असतात त्याला शिक्षणाच्या माध्यमातून वाव मिळावा, असा याचा अर्थ आहे. खेळाडूंना जर क्रीडा गुण दिले जात असतील तर कला व सांस्कृतिक क्षेत्रात कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सांस्कृतिक ग्रेस मार्क मिळायला हवेत. माजी प्राचार्य सुरेंद्र सिरसाट म्हणाले की, निकाल जास्त लागेल याची भीती सरकारने बाळगण्याचे कारण नाही. मुलांच्या अंगात असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना किती सवलती देता येतील हे पाहावे. क्रीडा गुणांच्या धर्तीवर सांस्कृतिक क्षेत्रात चमकणाऱ्या मुलांचीही कदर व्हायला हवी, त्यांना ग्रेस मार्क मिळायला हवेत. निकाल जास्त लागण्यास अन्य कारणेही आहेत. अनेकदा मुलांना अंतर्गत २0 गुण पैकीच्या पैकी दिले जातात, त्यामुळेही निकाल वाढतो. दुसरी बाब म्हणजे सरकार सर्वांनाच नोकऱ्या देऊ शकत नाही. कलेत करिअर करून एखादा जर पोट भरू शकत असेल तर त्याला उत्तेजन देणे सरकारचे कर्तव्य आहे. त्याची सुरुवात कला, सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देऊनच व्हावी. करिअर मार्गदर्शक तथा मुख्याध्यापक रामदास केळकर म्हणाले की, सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचा ग्रेस मार्कांसाठी विचार व्हायला हवा. रेमोसारखा कलाकार आज नाव कमावून ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर बनतो. क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाही हा लाभ मिळायला हवा. (प्रतिनिधी)