शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

व्याघ्र राखीव क्षेत्रातून धारबांदोडा तालुक्याला सूट द्या; पंच सदस्यांची मागणी

By आप्पा बुवा | Updated: August 20, 2023 18:00 IST

पंच सदस्याची सरकारकडे मागणी 

फोंडा - महावीर अभयारण्य, बोंडला अभयारण्य,म्हादई ह्या नावाखाली  धारबांदोडा तालुक्यातील काही जंगले अगोदरच राखीव झाली आहेत. त्यात परत व्याघ्र साठी जंगले राखीव झाल्यास तर इथला शेतकरी मेटाकुटीस येईल व त्याचे जगणे असह्य होईल. तेव्हा या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून सरकारने होऊ घातलेले  व्याघ्र राखीव क्षेत्र प्रकल्प टाळावे , धारबांदोडयातील शेतकर्यांना मोकळीक  द्यावी असे निवेदन साकोर्डा ग्रामपंचायतीचे सदस्य महादेव शेटकर यांनी सरकारला केली आहे. या संदर्भात एक लेखी निवेदन त्याने उपजिल्हाधिकारी निलेश धायगोडकर यांना दिले आहे. 

सदर निवेदनात ते असे म्हणतात की ह्या परिसरातील लोक हे मुख्यतः शेती व बागायतीवर अवलंबून आहेत. उत्पन्नाचे ते एकमेव स्तोत्र त्या लोकांकडे आहे. सदरचे क्षेत्र राखीव झाल्यास लोकांना आपल्या शेतात व बागायतीमध्ये मोकळेपणाने फिरण्यास मिळणार नाही. पावलो पावले सरकारच्या वनखात्याची परवानगी घ्यावे लागेल. ह्या अगोदरच महावीर अभयारण्य खाली मोले भागातील  काही लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. परंतु त्यांचे अजून योग्य असे पुनर्वसन झालेले नाही. ग्रामीण भागातील खनिज व्यवसाय बंद झाल्यानंतर लोक पुन्हा एकदा कृषी क्षेत्राकडे वळले आहेत. आताच कुठे त्यांच्या मेहनतीला फळ येत आहे. अशातच सदरक्षेत्र  राखीव झाल्यास लोकांनी वर आणलेल्या बागायतीवर पाणी सोडावे लागणार. परिणामी त्यांच्यावर रस्त्यावर येण्याची पाळी येईल. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी इथे येऊन इथल्या लोकांचे संगनमत करावे. लोकांच्या भावना समजून घ्याव्यात व त्यासंबंधीचा रीतसर पत्र व्यवहार केंद्राकडे करावा अशी मागणी ही ते करत आहेत.

टॅग्स :goaगोवाTigerवाघ