शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शेतकऱ्यांना बळ देऊ, राज्य १०० टक्के साक्षर करू!: मुख्यमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2024 11:24 IST

गावातील शेतकऱ्यांची संख्या फलकावर नमूद करण्याची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यातील शेतकऱ्यांना व शेतीला प्रोत्साहन तसेच कृषिकार्डाची सुविधा देण्यासाठी शेतकऱ्यांची संख्या कळणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व पंचायतींनी आपापल्या भागांतील शेतकऱ्यांची संख्या नमूद करणारे फलक लावावेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. यावेळी त्यांनी नव्या वर्षात राज्य १०० टक्के साक्षर करण्यात करण्याचे लक्ष्य असल्याचा मनोदयही व्यक्त केला.

शनिवारी 'स्वयंपूर्ण गोवा' विषयावरील वेबिनारला संबोधित करताना ते बोलत होते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, केंद्र सरकारच्या किसान क्रेडिट कार्ड, किसान सॉइल कार्ड आणि किसान विमा कार्ड अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना कव्हर करण्याचे राज्याचे लक्ष्य आहे. केंद्र सरकारच्या योजनांची राज्यात १०० टक्के पूर्तता करण्यात मदत केल्याबद्दल सावंत यांनी स्वयंपूर्ण मित्रांचे (स्वयंपूर्ण गोवा योजनेतील अधिकारी) कौतुक केले.

दरम्यान, पुढील वर्षी १९ डिसेंबरपर्यंत साक्षरता दर १०० टक्के करण्याचे लक्ष्य आहे. सर्व पंचायतींना हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काम करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. आपल्या कार्यक्षेत्रात एकही व्यक्ती निरक्षर राहणार नाही, ही खबरदारी प्रत्येकाने घ्यावी, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, केरळने १०० टक्के साक्षरता गाठल्याचा दावा केला आहे; परंतु प्रत्यक्षात तसे दिसत नाही. गोव्याने खऱ्या अर्थाने शंभर टक्के साक्षरतेसाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे ते म्हणाले. 

शेतकऱ्यांबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, किसान क्रेडिट कार्ड, किसान सॉइल कार्ड आणि किसान विमा कार्ड यांसारख्या केंद्र सरकारच्या उपक्रमांसाठी सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के कव्हरेज मिळायला हवे.

सन १९६१ मध्ये ४५० वर्षे जुन्या वसाहतवादातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर साक्षरता मोहीम ही सर्वच राज्यांत हाती घेण्यात आली. गोव्याला उशिरा स्वातंत्र्य मिळाले तरी गोवा यात मागे पडणार नाही, असे ते म्हणाले. २०११ च्या जनगणनेनुसार, गोव्याचा साक्षरता दर ८८.७० टक्के आहे. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत