शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

शेतकऱ्यांना बळ देऊ, राज्य १०० टक्के साक्षर करू!: मुख्यमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2024 11:24 IST

गावातील शेतकऱ्यांची संख्या फलकावर नमूद करण्याची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यातील शेतकऱ्यांना व शेतीला प्रोत्साहन तसेच कृषिकार्डाची सुविधा देण्यासाठी शेतकऱ्यांची संख्या कळणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व पंचायतींनी आपापल्या भागांतील शेतकऱ्यांची संख्या नमूद करणारे फलक लावावेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. यावेळी त्यांनी नव्या वर्षात राज्य १०० टक्के साक्षर करण्यात करण्याचे लक्ष्य असल्याचा मनोदयही व्यक्त केला.

शनिवारी 'स्वयंपूर्ण गोवा' विषयावरील वेबिनारला संबोधित करताना ते बोलत होते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, केंद्र सरकारच्या किसान क्रेडिट कार्ड, किसान सॉइल कार्ड आणि किसान विमा कार्ड अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना कव्हर करण्याचे राज्याचे लक्ष्य आहे. केंद्र सरकारच्या योजनांची राज्यात १०० टक्के पूर्तता करण्यात मदत केल्याबद्दल सावंत यांनी स्वयंपूर्ण मित्रांचे (स्वयंपूर्ण गोवा योजनेतील अधिकारी) कौतुक केले.

दरम्यान, पुढील वर्षी १९ डिसेंबरपर्यंत साक्षरता दर १०० टक्के करण्याचे लक्ष्य आहे. सर्व पंचायतींना हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काम करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. आपल्या कार्यक्षेत्रात एकही व्यक्ती निरक्षर राहणार नाही, ही खबरदारी प्रत्येकाने घ्यावी, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, केरळने १०० टक्के साक्षरता गाठल्याचा दावा केला आहे; परंतु प्रत्यक्षात तसे दिसत नाही. गोव्याने खऱ्या अर्थाने शंभर टक्के साक्षरतेसाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे ते म्हणाले. 

शेतकऱ्यांबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, किसान क्रेडिट कार्ड, किसान सॉइल कार्ड आणि किसान विमा कार्ड यांसारख्या केंद्र सरकारच्या उपक्रमांसाठी सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के कव्हरेज मिळायला हवे.

सन १९६१ मध्ये ४५० वर्षे जुन्या वसाहतवादातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर साक्षरता मोहीम ही सर्वच राज्यांत हाती घेण्यात आली. गोव्याला उशिरा स्वातंत्र्य मिळाले तरी गोवा यात मागे पडणार नाही, असे ते म्हणाले. २०११ च्या जनगणनेनुसार, गोव्याचा साक्षरता दर ८८.७० टक्के आहे. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत