शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

गोव्याच्या अर्थकारणाला धोका; राज्याचे नियोजन मंडळ सुस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 22:40 IST

पंधराव्या वित्त आयोगाची स्थापना होऊन अकरा महिने उलटे असतानाही राज्याच्या नियोजन मंडळाने या विषयावर कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. वित्त खाते ज्यांच्याकडे आहे ते मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गेले सहा-सात महिने आजारी आहेत.

पणजी : पंधराव्या वित्त आयोगाची स्थापना होऊन अकरा महिने उलटे असतानाही राज्याच्या नियोजन मंडळाने या विषयावर कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. वित्त खाते ज्यांच्याकडे आहे ते मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गेले सहा-सात महिने आजारी आहेत व त्यांचेही कोणतेच भाष्य या विषयावर आलेले नाही. अर्थसंकल्पातही याचा उहापोह झालेला नाही. या पार्श्वभूमीवर गोव्याच्या अर्थकारणाला धोका निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रवक्ते माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांनी केले. 

पत्रकार परिषदेत खलप म्हणाले की, ‘ पंधरावा वित्त आयोग जेव्हा अंतिम अहवाल तयार करील तेव्हा काय बाहेर येईल ही मोठी चिंता आहे. मुख्यमंत्री स्वत: आजारी आहेत आणि त्यांनी दोन आजारी सहकारी मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून राजकीय भूकंप घडवून आणला आहे. या सरकारचे काहीच काम चालत नाहीत. खाणबंदीवर तोडगा निघू शकलेला नाही. २0१२ साली भाजपा सरकार सत्तेवर असतानच खाणबंदी आणली त्यानंतर सहा वर्षे काहीच झाले नाही. राज्यातील स्थिती निदर्शनास आणणारे पत्र आता कोठे मुख्यमंत्र्यांनी केंद्राला लिहिले. खाण अवलंबित भरडले जात आहेत. राज्याचे अर्थकारण पुरते संपले आहे. खाण अवलंबितांना पतपुरवठा करणा-या सहकारी संस्थाही डबघाईला आलेल्या आहेत. राज्य अधोगतीच्या दिशेने चालले आहे.

खलप यांनी या प्रश्नावर राजकीय पक्षविरहित १0 जणांची कोअर टीम स्थापन करण्याचा संकल्प सोडला असून या टीममध्ये अर्थतज्ञ तसेच या विषयाचे जाणकार असतील. ‘गोवा फॉर फिफ्टींथ फायनान्स कमिशन’ या नावाने हा गट स्थापन केला जाणार असून त्याविषयी सूचनाही मागविण्यात आल्या आहेत. पत्रकार परिषदेला पक्षाचे अन्य एक प्रवक्ते ऊर्फान मुल्ला हेही उपस्थित होते. 

टॅग्स :goaगोवा