शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

गोव्याच्या अर्थकारणाला धोका; राज्याचे नियोजन मंडळ सुस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 22:40 IST

पंधराव्या वित्त आयोगाची स्थापना होऊन अकरा महिने उलटे असतानाही राज्याच्या नियोजन मंडळाने या विषयावर कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. वित्त खाते ज्यांच्याकडे आहे ते मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गेले सहा-सात महिने आजारी आहेत.

पणजी : पंधराव्या वित्त आयोगाची स्थापना होऊन अकरा महिने उलटे असतानाही राज्याच्या नियोजन मंडळाने या विषयावर कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. वित्त खाते ज्यांच्याकडे आहे ते मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गेले सहा-सात महिने आजारी आहेत व त्यांचेही कोणतेच भाष्य या विषयावर आलेले नाही. अर्थसंकल्पातही याचा उहापोह झालेला नाही. या पार्श्वभूमीवर गोव्याच्या अर्थकारणाला धोका निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रवक्ते माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांनी केले. 

पत्रकार परिषदेत खलप म्हणाले की, ‘ पंधरावा वित्त आयोग जेव्हा अंतिम अहवाल तयार करील तेव्हा काय बाहेर येईल ही मोठी चिंता आहे. मुख्यमंत्री स्वत: आजारी आहेत आणि त्यांनी दोन आजारी सहकारी मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून राजकीय भूकंप घडवून आणला आहे. या सरकारचे काहीच काम चालत नाहीत. खाणबंदीवर तोडगा निघू शकलेला नाही. २0१२ साली भाजपा सरकार सत्तेवर असतानच खाणबंदी आणली त्यानंतर सहा वर्षे काहीच झाले नाही. राज्यातील स्थिती निदर्शनास आणणारे पत्र आता कोठे मुख्यमंत्र्यांनी केंद्राला लिहिले. खाण अवलंबित भरडले जात आहेत. राज्याचे अर्थकारण पुरते संपले आहे. खाण अवलंबितांना पतपुरवठा करणा-या सहकारी संस्थाही डबघाईला आलेल्या आहेत. राज्य अधोगतीच्या दिशेने चालले आहे.

खलप यांनी या प्रश्नावर राजकीय पक्षविरहित १0 जणांची कोअर टीम स्थापन करण्याचा संकल्प सोडला असून या टीममध्ये अर्थतज्ञ तसेच या विषयाचे जाणकार असतील. ‘गोवा फॉर फिफ्टींथ फायनान्स कमिशन’ या नावाने हा गट स्थापन केला जाणार असून त्याविषयी सूचनाही मागविण्यात आल्या आहेत. पत्रकार परिषदेला पक्षाचे अन्य एक प्रवक्ते ऊर्फान मुल्ला हेही उपस्थित होते. 

टॅग्स :goaगोवा