शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

ईसींचे निलंबन कायम

By admin | Updated: February 10, 2015 01:45 IST

पणजी : राज्यातील खनिज खाणींच्या पर्यावरणविषयक दाखल्यांचे (ईसी) सप्टेंबर २०१२ मध्ये करण्यात आलेले निलंबन थेट मागे घेता येणार नाही,

पणजी : राज्यातील खनिज खाणींच्या पर्यावरणविषयक दाखल्यांचे (ईसी) सप्टेंबर २०१२ मध्ये करण्यात आलेले निलंबन थेट मागे घेता येणार नाही, अशा प्रकारची भूमिका केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतली आहे. जावडेकर यांनी गोवा सरकारला व मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनाही तसे कळविले आहे. गोवा सरकारला केंद्रीय मंत्र्यांचे पत्र मिळाले आहे. राज्यातील खनिज खाणी सुरू व्हाव्यात म्हणून मुख्यमंत्री पार्सेकर प्रयत्न करत आहेत. तथापि, केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालय जोपर्यंत खनिज खाणींच्या ईसींच्या निलंबनाचा २०१२ सालचा आदेश मागे घेत नाही, तोपर्यंत खनिज खाणी सुरू होऊ शकणार नाहीत. ईसींबाबतचा निलंबन आदेश मागे घेतला जावा, अशी विनंती मुख्यमंत्री पार्सेकर यांनी गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्री जावडेकर यांना पत्र लिहून केली होती. त्यानंतर जावडेकर यांचे उत्तर गोवा सरकारला मिळाले. गोवा सरकारने राज्यातील ८४ खनिज खाणींच्या लिजांचे नूतनीकरण केले आहे. त्यापैकी ४३ लिज करारांवर सह्याही झाल्या आहेत. ईसींवरील निलंबन मागे न घेतले गेल्याने यापुढे सर्व खनिज लिजांसाठी खाण कंपन्यांना नव्याने ईसी मिळविण्यासाठी अर्ज करावे लागतील. नव्याने ईसी मिळण्यास आणखी किमान पावणे दोन वर्षे लागतील. तत्पूर्वी जनसुनावण्या वगैरे घ्याव्या लागतील, असे खाण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने ईसींचे निलंबन मागे घेण्यास नकार देणे हा गोव्याच्या खाण व्यवसायासाठी धक्का मानला जातो. दरम्यान, मुख्यमंत्री पार्सेकर हे दिल्ली भेटीवर गेले आहेत. केंद्रीय मंत्री जावडेकर यांची सोमवारी ते भेट घेऊन याविषयी चर्चा करणार होते. या प्रतिनिधीने मुख्यमंत्र्यांना विचारले असता, जावडेकर दिल्लीबाहेर असल्याने आपली सोमवारी भेट होऊ शकली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ईसी निलंबन आदेशाविषयी यापूर्वी आपल्याला जावडेकर यांचे पत्र मिळाले असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले. राज्यातील काही खाणी तरी सुरू व्हायला हव्यात. २०१२ साली ईसी केवळ एका आदेशाने निलंबित केल्या गेल्या होत्या. त्यामागे कोणतेही लॉजिक नव्हते. आता ज्या खाणींबाबत कोणतेच प्रश्नचिन्ह नाही, अशा काही खाणींना तरी ईसी दाखले मिळायला हवेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. (खास प्रतिनिधी)