शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

ईसींचे निलंबन कायम

By admin | Updated: February 10, 2015 01:45 IST

पणजी : राज्यातील खनिज खाणींच्या पर्यावरणविषयक दाखल्यांचे (ईसी) सप्टेंबर २०१२ मध्ये करण्यात आलेले निलंबन थेट मागे घेता येणार नाही,

पणजी : राज्यातील खनिज खाणींच्या पर्यावरणविषयक दाखल्यांचे (ईसी) सप्टेंबर २०१२ मध्ये करण्यात आलेले निलंबन थेट मागे घेता येणार नाही, अशा प्रकारची भूमिका केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतली आहे. जावडेकर यांनी गोवा सरकारला व मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनाही तसे कळविले आहे. गोवा सरकारला केंद्रीय मंत्र्यांचे पत्र मिळाले आहे. राज्यातील खनिज खाणी सुरू व्हाव्यात म्हणून मुख्यमंत्री पार्सेकर प्रयत्न करत आहेत. तथापि, केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालय जोपर्यंत खनिज खाणींच्या ईसींच्या निलंबनाचा २०१२ सालचा आदेश मागे घेत नाही, तोपर्यंत खनिज खाणी सुरू होऊ शकणार नाहीत. ईसींबाबतचा निलंबन आदेश मागे घेतला जावा, अशी विनंती मुख्यमंत्री पार्सेकर यांनी गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्री जावडेकर यांना पत्र लिहून केली होती. त्यानंतर जावडेकर यांचे उत्तर गोवा सरकारला मिळाले. गोवा सरकारने राज्यातील ८४ खनिज खाणींच्या लिजांचे नूतनीकरण केले आहे. त्यापैकी ४३ लिज करारांवर सह्याही झाल्या आहेत. ईसींवरील निलंबन मागे न घेतले गेल्याने यापुढे सर्व खनिज लिजांसाठी खाण कंपन्यांना नव्याने ईसी मिळविण्यासाठी अर्ज करावे लागतील. नव्याने ईसी मिळण्यास आणखी किमान पावणे दोन वर्षे लागतील. तत्पूर्वी जनसुनावण्या वगैरे घ्याव्या लागतील, असे खाण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने ईसींचे निलंबन मागे घेण्यास नकार देणे हा गोव्याच्या खाण व्यवसायासाठी धक्का मानला जातो. दरम्यान, मुख्यमंत्री पार्सेकर हे दिल्ली भेटीवर गेले आहेत. केंद्रीय मंत्री जावडेकर यांची सोमवारी ते भेट घेऊन याविषयी चर्चा करणार होते. या प्रतिनिधीने मुख्यमंत्र्यांना विचारले असता, जावडेकर दिल्लीबाहेर असल्याने आपली सोमवारी भेट होऊ शकली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ईसी निलंबन आदेशाविषयी यापूर्वी आपल्याला जावडेकर यांचे पत्र मिळाले असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले. राज्यातील काही खाणी तरी सुरू व्हायला हव्यात. २०१२ साली ईसी केवळ एका आदेशाने निलंबित केल्या गेल्या होत्या. त्यामागे कोणतेही लॉजिक नव्हते. आता ज्या खाणींबाबत कोणतेच प्रश्नचिन्ह नाही, अशा काही खाणींना तरी ईसी दाखले मिळायला हवेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. (खास प्रतिनिधी)