शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

कृत्रिम टंचाईमुळे मत्स्यप्रेमी संतप्त

By admin | Updated: May 14, 2015 01:43 IST

मडगाव : गोव्यातील बोटमालक संघटना व मासळी बाजारपेठेवर नियंत्रण असलेल्या घाऊक मासळी विक्रेते संघटनेच्या संघर्षात

मडगाव : गोव्यातील बोटमालक संघटना व मासळी बाजारपेठेवर नियंत्रण असलेल्या घाऊक मासळी विक्रेते संघटनेच्या संघर्षात गोमंतकीय मत्स्यप्रेमींना वेठीस धरले जात आहे. दोन दिवस कृत्रिम मासळी बंदी निर्माण करणाऱ्या घाऊक मासळी विक्रेत्यांनी एकतर्फी निर्णय घेऊन बाहेरील राज्यांतून येणाऱ्या मासळीवर तुघलकशाहीने बंदी घातल्याचा परिणाम मासळी बाजारावर झाला आहे. सरकारच्या निष्क्रियतेमुळे घाऊक मासळी विक्रेत्यांची व बोटमालक संघटनेच्या खुलेआम दादागिरीबद्दल मत्स्यप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. घाऊक मासळी विक्रेत्यांची मक्तेदारी मोडून काढण्याची गरज नागरिक व्यक्तकरत आहेत.आजही बाहेरील राज्यांतून मासळी घाऊक बाजारपेठेत आली नसल्यामुळे मासळी बाजारात मासळीचे दर दुपटीने व तिपटीने वाढलेले होते. कुटबण बोटमालक संघटनेने काही प्रमाणात गोव्यातील बोटींनी पकडलेली मासळी घाऊक व किरकोळ बाजारपेठेत आणून पुरवठा करण्याचा प्रयत्न केला. मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्यामुळे मासळीचे दर गगनाला भिडले होते. लहान मासळी बाजारपेठेत उपलब्ध होती. मात्र, मोठी मासळी बाजारपेठेतून गायब होती. घाऊक व किरकोळ मासळी बाजारपेठेत आणलेली मासळी हातोहात नेण्यात आली. गुरुवारपासून परराज्यांतून मासळी येण्याचीशक्यता आहे. सरकारने मासळीवाहू ट्रकांना पोलीस संरक्षण देण्याचे मान्य केले आहे. कुटबण बोटमालक संघटनेच्या बोटीवर मालवणात मालवणच्या मच्छीमारांनी हल्ला करून बोटीचे नुकसान केले होते. त्यांनी खलाशांना मारहाण केली होती. याच्या निषेधार्थ बोटमालकांनी मालवणची मासळी बाजारपेठेत आणण्यास विरोध केला होता. घाऊक मासळी विक्रेत्यांनी कुटबण बोटमालकांना अद्दल घडविण्यासाठी परराज्यांतील सगळ्याच मासळीवर बंदी घातली होती. गोव्यात महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ या राज्यांतून मासळी येते. ती सर्व बंद झाली आहे.घाऊक मासळी विक्रेत्यांनी मासळी बाजारावर दरारा कायम ठेवण्यासाठी हा बनाव केल्याचा आरोप बोटमालकांनी केला आहे. बोटमालक संघटनेने घाऊक मासळी विक्रेते कमिशन संस्कृतीला पोसत असून मासळीचे दर वाढविण्यास घाऊक मासळी विक्रेत्यांची कमिशन संस्कृती जबाबदार असल्याचा आरोप बोटमालक संघटनेने केला आहे. या संघर्षाचे सरकार व गोव्यातील मच्छीमार खाते मुक साक्षीदार बनल्यामुळे मत्स्यप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. बोटमालक संघटना घाऊक मासळी बाजार ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असून मासळी व्यवसायात असलेल्या बोटमालकांची व घाऊक मासळी विक्रेत्यांची मक्तेदारी मोडून काढण्याची गरज नागरिक व्यक्त करीत आहेत. (प्रतिनिधी)