शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

कृत्रिम टंचाईमुळे मत्स्यप्रेमी संतप्त

By admin | Updated: May 14, 2015 01:43 IST

मडगाव : गोव्यातील बोटमालक संघटना व मासळी बाजारपेठेवर नियंत्रण असलेल्या घाऊक मासळी विक्रेते संघटनेच्या संघर्षात

मडगाव : गोव्यातील बोटमालक संघटना व मासळी बाजारपेठेवर नियंत्रण असलेल्या घाऊक मासळी विक्रेते संघटनेच्या संघर्षात गोमंतकीय मत्स्यप्रेमींना वेठीस धरले जात आहे. दोन दिवस कृत्रिम मासळी बंदी निर्माण करणाऱ्या घाऊक मासळी विक्रेत्यांनी एकतर्फी निर्णय घेऊन बाहेरील राज्यांतून येणाऱ्या मासळीवर तुघलकशाहीने बंदी घातल्याचा परिणाम मासळी बाजारावर झाला आहे. सरकारच्या निष्क्रियतेमुळे घाऊक मासळी विक्रेत्यांची व बोटमालक संघटनेच्या खुलेआम दादागिरीबद्दल मत्स्यप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. घाऊक मासळी विक्रेत्यांची मक्तेदारी मोडून काढण्याची गरज नागरिक व्यक्तकरत आहेत.आजही बाहेरील राज्यांतून मासळी घाऊक बाजारपेठेत आली नसल्यामुळे मासळी बाजारात मासळीचे दर दुपटीने व तिपटीने वाढलेले होते. कुटबण बोटमालक संघटनेने काही प्रमाणात गोव्यातील बोटींनी पकडलेली मासळी घाऊक व किरकोळ बाजारपेठेत आणून पुरवठा करण्याचा प्रयत्न केला. मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्यामुळे मासळीचे दर गगनाला भिडले होते. लहान मासळी बाजारपेठेत उपलब्ध होती. मात्र, मोठी मासळी बाजारपेठेतून गायब होती. घाऊक व किरकोळ मासळी बाजारपेठेत आणलेली मासळी हातोहात नेण्यात आली. गुरुवारपासून परराज्यांतून मासळी येण्याचीशक्यता आहे. सरकारने मासळीवाहू ट्रकांना पोलीस संरक्षण देण्याचे मान्य केले आहे. कुटबण बोटमालक संघटनेच्या बोटीवर मालवणात मालवणच्या मच्छीमारांनी हल्ला करून बोटीचे नुकसान केले होते. त्यांनी खलाशांना मारहाण केली होती. याच्या निषेधार्थ बोटमालकांनी मालवणची मासळी बाजारपेठेत आणण्यास विरोध केला होता. घाऊक मासळी विक्रेत्यांनी कुटबण बोटमालकांना अद्दल घडविण्यासाठी परराज्यांतील सगळ्याच मासळीवर बंदी घातली होती. गोव्यात महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ या राज्यांतून मासळी येते. ती सर्व बंद झाली आहे.घाऊक मासळी विक्रेत्यांनी मासळी बाजारावर दरारा कायम ठेवण्यासाठी हा बनाव केल्याचा आरोप बोटमालकांनी केला आहे. बोटमालक संघटनेने घाऊक मासळी विक्रेते कमिशन संस्कृतीला पोसत असून मासळीचे दर वाढविण्यास घाऊक मासळी विक्रेत्यांची कमिशन संस्कृती जबाबदार असल्याचा आरोप बोटमालक संघटनेने केला आहे. या संघर्षाचे सरकार व गोव्यातील मच्छीमार खाते मुक साक्षीदार बनल्यामुळे मत्स्यप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. बोटमालक संघटना घाऊक मासळी बाजार ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असून मासळी व्यवसायात असलेल्या बोटमालकांची व घाऊक मासळी विक्रेत्यांची मक्तेदारी मोडून काढण्याची गरज नागरिक व्यक्त करीत आहेत. (प्रतिनिधी)