शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
5
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
6
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
7
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
8
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
9
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
10
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
11
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
12
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
13
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
14
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
15
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
16
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
17
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
18
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
19
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
20
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?

कृत्रिम टंचाईमुळे मत्स्यप्रेमी संतप्त

By admin | Updated: May 14, 2015 01:43 IST

मडगाव : गोव्यातील बोटमालक संघटना व मासळी बाजारपेठेवर नियंत्रण असलेल्या घाऊक मासळी विक्रेते संघटनेच्या संघर्षात

मडगाव : गोव्यातील बोटमालक संघटना व मासळी बाजारपेठेवर नियंत्रण असलेल्या घाऊक मासळी विक्रेते संघटनेच्या संघर्षात गोमंतकीय मत्स्यप्रेमींना वेठीस धरले जात आहे. दोन दिवस कृत्रिम मासळी बंदी निर्माण करणाऱ्या घाऊक मासळी विक्रेत्यांनी एकतर्फी निर्णय घेऊन बाहेरील राज्यांतून येणाऱ्या मासळीवर तुघलकशाहीने बंदी घातल्याचा परिणाम मासळी बाजारावर झाला आहे. सरकारच्या निष्क्रियतेमुळे घाऊक मासळी विक्रेत्यांची व बोटमालक संघटनेच्या खुलेआम दादागिरीबद्दल मत्स्यप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. घाऊक मासळी विक्रेत्यांची मक्तेदारी मोडून काढण्याची गरज नागरिक व्यक्तकरत आहेत.आजही बाहेरील राज्यांतून मासळी घाऊक बाजारपेठेत आली नसल्यामुळे मासळी बाजारात मासळीचे दर दुपटीने व तिपटीने वाढलेले होते. कुटबण बोटमालक संघटनेने काही प्रमाणात गोव्यातील बोटींनी पकडलेली मासळी घाऊक व किरकोळ बाजारपेठेत आणून पुरवठा करण्याचा प्रयत्न केला. मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्यामुळे मासळीचे दर गगनाला भिडले होते. लहान मासळी बाजारपेठेत उपलब्ध होती. मात्र, मोठी मासळी बाजारपेठेतून गायब होती. घाऊक व किरकोळ मासळी बाजारपेठेत आणलेली मासळी हातोहात नेण्यात आली. गुरुवारपासून परराज्यांतून मासळी येण्याचीशक्यता आहे. सरकारने मासळीवाहू ट्रकांना पोलीस संरक्षण देण्याचे मान्य केले आहे. कुटबण बोटमालक संघटनेच्या बोटीवर मालवणात मालवणच्या मच्छीमारांनी हल्ला करून बोटीचे नुकसान केले होते. त्यांनी खलाशांना मारहाण केली होती. याच्या निषेधार्थ बोटमालकांनी मालवणची मासळी बाजारपेठेत आणण्यास विरोध केला होता. घाऊक मासळी विक्रेत्यांनी कुटबण बोटमालकांना अद्दल घडविण्यासाठी परराज्यांतील सगळ्याच मासळीवर बंदी घातली होती. गोव्यात महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ या राज्यांतून मासळी येते. ती सर्व बंद झाली आहे.घाऊक मासळी विक्रेत्यांनी मासळी बाजारावर दरारा कायम ठेवण्यासाठी हा बनाव केल्याचा आरोप बोटमालकांनी केला आहे. बोटमालक संघटनेने घाऊक मासळी विक्रेते कमिशन संस्कृतीला पोसत असून मासळीचे दर वाढविण्यास घाऊक मासळी विक्रेत्यांची कमिशन संस्कृती जबाबदार असल्याचा आरोप बोटमालक संघटनेने केला आहे. या संघर्षाचे सरकार व गोव्यातील मच्छीमार खाते मुक साक्षीदार बनल्यामुळे मत्स्यप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. बोटमालक संघटना घाऊक मासळी बाजार ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असून मासळी व्यवसायात असलेल्या बोटमालकांची व घाऊक मासळी विक्रेत्यांची मक्तेदारी मोडून काढण्याची गरज नागरिक व्यक्त करीत आहेत. (प्रतिनिधी)