शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

“छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांमुळे गोमंतकात हिंदू संस्कृती टिकली”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 15:58 IST

गोव्यातील हिंदूंच्या रक्षणासाठी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी पोर्तुगीजांशी दोन होत केले, असे डॉ. विनय मडगावकर म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पोर्तुगीज काळात हिंदूवर धर्मपरिवर्तनासाठी अनन्वित अत्याचार केले जात होते. गोव्यातील हिंदूंच्या रक्षणासाठी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी पोर्तुगीजांशी दोन होत केले. त्यांच्यामुळेच गोमंतकात हिंदू आणि हिंदू संस्कृती टिकू शकली, असे प्रतिपादन गोवा विद्यापीठातील मराठी विभागाचे डॉ. विनय मडगावकर यांनी केले.

मेरशी येथील स्वराज्य युवा फाऊंडेशनच्या पेरीभाट येथील सातेरी मंदिरात शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस, देवस्थानचे विश्वस्त अॅड. प्रशांत वेंगुर्लेकर, फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय पाटील उपस्थित होते.

छत्रपती शिवरायांनी नार्वे येथील सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. तेथे आजही शिवरायांचे नाव असलेला संस्कृत शिलालेख पाहायला मिळतो. असा संस्कृत शिलालेख रायगडानंतर सप्तकोटेश्वर मंदिरातच आहे. मंदिराच्या उंबरठ्यावर छत्रपती शिवरायांची पावले आणि हातांचे ठसे आहेत, असे डॉ. मडगावकर यांनी यावेळी सांगितले.

भारतातील हिंदू समाज मोगलांच्या गुलामगिरीत पिचला असताना छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवले. स्वतःचे कायदे बनवले. स्वतःची मुद्रा चलनात आणली. हिंदवी स्वराज्य स्थापन केले, असे राजहंस यांनी सांगितले.

दरम्यान, या निमित्ताने फर्मागुढी- फोंडा ते सातेरी मंदिर मेरशीपर्यंत शिवज्योतीची मिरवणूक काढण्यात आली. शिवरायांच्या मूर्तीला हार घालून आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. सकाळी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे परीक्षण संजना रेडकर व सागर मांगले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नीता तोरणे यांनी केले, तर अमित गावडे यांनी आभार मानले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज