शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादाची भीती नाही, जमाव बंदीचा आदेश हा सोपस्कार - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 12:27 IST

राज्यात दहशतवादी हल्ला होण्याची भीती नाही. कलम 144 लागू करणे  किंवा जमाव बंदीचा आदेश लागू करणे हा पोलीस खात्याचा एक सोपस्कार आहे.

पणजी - राज्यात दहशतवादी हल्ला होण्याची भीती नाही. कलम 144 लागू करणे  किंवा जमाव बंदीचा आदेश लागू करणे हा पोलीस खात्याचा एक सोपस्कार आहे. ती एक प्रक्रिया आहे व त्यामुळे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनी किंचितही अस्वस्थ होऊ नये किंवा चिंता करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे.

राज्यात 144 कलम लागू केल्याने सरकारवर विरोधी काँग्रेस पक्ष व इतरांनी टीका सुरू केली आहे. उत्तर गोव्यातच जमाव बंदीचा आदेश का लागू केला जात आहे अशीही विचारणा केली जात आहे. राज्याला दहशतवादापासून धोका आहे काय असे पत्रकारांनी मुख्यमंत्री सावंत यांना येथे विचारले असता, ते म्हणाले की धोका नाही. कलम 144 लागू करणे ही प्रक्रिया राज्यात अधूनमधून सुरूच असते. सहा महिन्यांतून एकदा किंवा वर्षातून दोन-तीनवेळा असे कलम लागू केले जात असते. जिल्हाधिकारी व पोलीस मिळून तसा आदेश जारी करत असतात. ती प्रक्रिया सुरूच असते. त्यामुळे कुणी घाबरून जाण्याचे कारण नाही. पर्यटकांनी तर चिंताच करू नये.

मुख्यमंत्री म्हणाले, की यापूर्वीही अनेकदा कलम 144 लागू केले गेले होते. राज्यातील सरकारी सोहळ्य़ांवर किंवा उत्सवांवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. आता लवकरच विविध शहरांत कार्निव्हल साजरा होणार आहे. सध्याही फिश महोत्सव व अन्य सोहळे सुरूच आहेत व त्यानिमित्ताने लोक एकत्र येत आहेत. त्यावर कुणी बंदी लागू केलेली नाही. जमाव बंदीचा आदेश लागू करण्याची जी प्रक्रिया आहे, ती राज्यासाठी नवी नाही. पर्यटकांनी निश्चिंतपणे गोव्यात यावे. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतtourismपर्यटन