शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

दहशतवादाची भीती नाही, जमाव बंदीचा आदेश हा सोपस्कार - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 12:27 IST

राज्यात दहशतवादी हल्ला होण्याची भीती नाही. कलम 144 लागू करणे  किंवा जमाव बंदीचा आदेश लागू करणे हा पोलीस खात्याचा एक सोपस्कार आहे.

पणजी - राज्यात दहशतवादी हल्ला होण्याची भीती नाही. कलम 144 लागू करणे  किंवा जमाव बंदीचा आदेश लागू करणे हा पोलीस खात्याचा एक सोपस्कार आहे. ती एक प्रक्रिया आहे व त्यामुळे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनी किंचितही अस्वस्थ होऊ नये किंवा चिंता करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे.

राज्यात 144 कलम लागू केल्याने सरकारवर विरोधी काँग्रेस पक्ष व इतरांनी टीका सुरू केली आहे. उत्तर गोव्यातच जमाव बंदीचा आदेश का लागू केला जात आहे अशीही विचारणा केली जात आहे. राज्याला दहशतवादापासून धोका आहे काय असे पत्रकारांनी मुख्यमंत्री सावंत यांना येथे विचारले असता, ते म्हणाले की धोका नाही. कलम 144 लागू करणे ही प्रक्रिया राज्यात अधूनमधून सुरूच असते. सहा महिन्यांतून एकदा किंवा वर्षातून दोन-तीनवेळा असे कलम लागू केले जात असते. जिल्हाधिकारी व पोलीस मिळून तसा आदेश जारी करत असतात. ती प्रक्रिया सुरूच असते. त्यामुळे कुणी घाबरून जाण्याचे कारण नाही. पर्यटकांनी तर चिंताच करू नये.

मुख्यमंत्री म्हणाले, की यापूर्वीही अनेकदा कलम 144 लागू केले गेले होते. राज्यातील सरकारी सोहळ्य़ांवर किंवा उत्सवांवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. आता लवकरच विविध शहरांत कार्निव्हल साजरा होणार आहे. सध्याही फिश महोत्सव व अन्य सोहळे सुरूच आहेत व त्यानिमित्ताने लोक एकत्र येत आहेत. त्यावर कुणी बंदी लागू केलेली नाही. जमाव बंदीचा आदेश लागू करण्याची जी प्रक्रिया आहे, ती राज्यासाठी नवी नाही. पर्यटकांनी निश्चिंतपणे गोव्यात यावे. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतtourismपर्यटन