शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

क्वारंटाईनच्या नावाखाली खंडणी वसूल करू नका- विजय सरदेसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 10:54 IST

आखाती देश, यूरोप आणि अमेरिका या भागात कित्येक गोमंतकीय आहेत त्यांना गोव्यात यायचे आहे.

मडगाव: खलाशी आणि विदेशस्थ गोवेकर यांच्याबाबत निर्णय घेताना माणुसकी दाखवा त्यांच्याकडून क्वारंटाईनच्या नावाखाली खंडणी वसूल करू नका असा सल्ला गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सरकारला दिला आहे. सध्या पेड क्वारंटाईन निर्णयाला सगळीकडून विरोध होत असताना सरदेसाई यांनी हा सल्ला दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या 2005 च्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे जगात कुणीही अडकून पडले आणि त्याला मायभूमीत यायला पाहिजे असेल तर त्याला पैशासाठी अडवून ठेवता कामा नये. महामारी सारख्या परिस्थितीत नागरिकांना पुरेशा सोयीनुसार आसरा देणे हे सरकारचे कर्तव्य आहे, हे सरकारने विसरता कामा नये. गोव्यात येणाऱ्या खलाशाना आणि लोकांना क्वारंटाईनची सोय करून देणे गोवा सरकारचे कर्तव्य आहे हे विसरता कामा नये असे त्यांनी म्हटले आहे.

आखाती देश, यूरोप आणि अमेरिका या भागात कित्येक गोमंतकीय आहेत त्यांना गोव्यात यायचे आहे. कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशा लोकांकडून सरकार पैसे वसूल करणार का असा सवाल करून यापूर्वी जे नेते  यापूर्वी आपण या खलाशांचे त्राते म्हणून मिरवीत होते ते आता गप्प का असा सवाल त्यांनी केला आहे.

टॅग्स :goaगोवाcorona virusकोरोना वायरस बातम्या